भाजपकडून नगर परिषद गटनेत्यांची निवड

पालघर : जिल्ह्यातील तीन नगर परिषद व एका नगरपंचायतीच्या उपाध्यक्ष, सभापती आणि स्वीकृत सदस्य निवडणुकीच्या आनुषंगाने भारतीय जनता पक्षाने चारही गटनेत्यांची निवड केली आहे.


पालघर, डहाणू, जव्हार या नगर परिषद आणि वाडा या नगरपंचायतीची निवडणूक २ डिसेंबर रोजी पार पडली. या निवडणुकीचा निकाल जाहीर २१ डिसेंबर रोजी झाला आहे. नवनिर्वाचित नगरसेवकांसह थेट जनतेतून नगराध्यक्ष सुद्धा निवडण्यात आले आहेत. दरम्यान, नगर परिषद आणि नगरपंचायती मधील कामकाज आपल्या राजकीय पक्षाच्या ध्येय धोरणानुसार करण्यासाठी गट नेत्यांची भूमिका महत्त्वाची राहते. आता लवकरच चारही ठिकाणी नगर परिषद उपाध्यक्ष, विषय समिती सभापती आणि स्वीकृत सदस्यांची निवड करावी लागणार आहे. या निवडणुकीसाठी सुद्धा राजकीय पक्षातील गटनेत्याची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. त्या अानुषंगाने भाजप गटनेत्यांची निवड केलेली आहे. भाजप जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांनी खासदार डॉ. हेमंत सवरा यांच्या मार्गदर्शनात चारही गटनेत्यांची निवड केली आहे. याप्रसंगी आमदार हरिश्चंद्र भोये, वाडा नगराध्यक्ष रिमा गंधे, जवाहर नगराध्यक्ष पूजा उदावंत, कैलाश म्हात्रे, निवडणूक प्रमुख बाबाजी काठोळे तसेच पक्षाचे इतर वरिष्ठ पदाधिकारी व प्रमुख मान्यवर उपस्थित होते.


असे आहेत गटनेते


डहाणू नगर परिषद -जगदीश राजपूत.


पालघर नगर परिषद - भावानंद संखे.


जव्हार नगर परिषद -कुणाल उदावंत.


 वाडा नगरपंचायत -रामचंद्र भोईर.

Comments
Add Comment

धक्राकादायक! १५ वर्षाच्या भाच्याकडून आत्याचा खून

वसई : वसई परिसरामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रागाच्या भरात एका १५ वर्षीय मुलाने आपल्या आत्याचा खून

सत्तेचे गणित बिघडले; बेरजेचे गणित जमले

गणेश पाटील, विरार : वसई-विरारमध्ये एकापेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणण्याची राजकीय शक्ती नसलेल्या भाजपने यावेळी

पाण्याच्या टाकीत मानवी हाडांचा सापळा

वसईच्या माणिकपूर गावातील घटना वसई : वसईच्या माणिकपूर येथील एका चाळीच्या रिकाम्या पाण्याच्या टाकीत पुरुषाच्या

अर्थसंकल्पातून पालघरसाठी विकासाची ‘महा-भेट’ : खासदार डॉ. सवरा

पालघर : केंद्रीय अर्थसंकल्पात पालघर जिल्ह्यासाठी विकासाचे नवीन दरवाजे उघडले आहेत. या बजेटमध्ये पालघरच्या

कोट्यवधींचा शिक्षण कर वसूल; शाळा हस्तांतरण मात्र रखडलेलेच

महापालिकेत शिक्षण समिती व सभापती नसण्याची परंपरा कायम राहणार गणेश पाटील विरार : महापालिकेची स्थापना होऊन १६

मुंबई-बडोदरा आणि भिवंडी-मनोर मार्गांचे काम युद्धपातळीवर

रस्त्यांच्या जाळ्यांमुळे विकासाची कोंडी फुटणार वसंत भोईर वाडा : गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्थेचा सामना