भारत सरकारच्या BHEL मध्ये नोकरीची मोठी संधी; महिन्याला १ लाखांपर्यंत पगार, वाचा सविस्तर

मुंबई : इंजिनिअरिंग क्षेत्रातील उमेदवारांसाठी भारत सरकारच्या नामांकित सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीत नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. भारत हॅव्ही इलेक्ट्रिकल्स लिमिटेड अर्थात BHEL मार्फत प्रोजेक्ट इंजीनिअर आणि प्रोजेक्ट सुपरवायझर पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इलेक्ट्रिकल, सिव्हिल, मॅकेनिकलसह विविध तांत्रिक शाखांमध्ये ही भरती होणार असून अनुभवी उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी मानली जात आहे.


या भरतीसाठी इच्छुक उमेदवार १२ जानेवारी २०२६ पर्यंत BHEL च्या अधिकृत careers.bhel.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करू शकतात. प्रोजेक्ट इंजीनिअर पदासाठी उमेदवारांकडे फुलटाइम इंजीनिअरिंग किंवा टेक्नोलॉजीमधील पदवी किंवा संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. जनरल आणि OBC उमेदवारांसाठी किमान ६० टक्के गुणांची अट असून SC आणि ST उमेदवारांसाठी ५० टक्के गुण ग्राह्य धरले जातील. यासोबतच किमान पाच वर्षांचा कामाचा अनुभव अनिवार्य आहे.


प्रोजेक्ट सुपरवायझर पदासाठी संबंधित शाखेतील इंजीनिअरिंग पदवी आवश्यक असून उमेदवारांकडे किमान दोन वर्षांचा कामाचा अनुभव असावा. या दोन्ही पदांसाठी उमेदवारांची वयोमर्यादा २५ ते ३२ वर्षांदरम्यान निश्चित करण्यात आली आहे.


पगाराच्या बाबतीत ही भरती आकर्षक मानली जात आहे. प्रोजेक्ट इंजीनिअर पदासाठी दरमहा ९५ हजार ते १ लाख रुपयांपर्यंत वेतन दिले जाणार आहे, तर प्रोजेक्ट सुपरवायझर पदासाठी ४५ हजार ते ४८ हजार रुपये मासिक पगार मिळणार आहे. अर्ज करताना उमेदवारांना २३६ रुपये अर्ज शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरावे लागणार आहे.


या भरती प्रक्रियेबाबतची सविस्तर माहिती आणि अधिकृत जाहिरात BHEL च्या वेबसाइटवर उपलब्ध असून उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी ती काळजीपूर्वक वाचण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Prasad Lad : "नारायण राणे कधीच निवृत्त होऊ शकत नाहीत, ते आमची ऊर्जा!" प्रसाद लाड यांनी स्पष्टच सांगितलं

मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार नारायण राणे यांच्या निवृत्तीच्या चर्चांवर त्यांचे निकटवर्तीय आणि भाजप

Tata Hospital Bomb Threat : परळच्या टाटा रुग्णालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; रुग्णालय परिसर रिकामा

बॉम्ब शोधक पथक आणि पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल मुंबई : मुंबईतील परळ भागात असलेल्या जगप्रसिद्ध टाटा मेमोरियल

राज्यात ढगाळ हवामानाचा मुक्काम

आंबा-काजू उत्पादक शेतकरी संकटात? मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कडाक्याची थंडी पडल्यानंतर आता

गरजू रुग्णांना उपचार नाकारल्यास कारवाई

मुंबई :राज्यातील प्रत्येक गरजू रुग्णाला सरकारी आरोग्य योजनेअंतर्गत मोफत, दर्जेदार आणि त्रासमुक्त उपचार मिळणे

आश्रमशाळेतील शिक्षकांनाही टीईटी बंधनकारक

आदिवासी विभागाकडून शासन निर्णय जारी दोन वर्षांत उत्तीर्ण न झाल्यास सेवासमाप्ती मुंबई : राज्यातील शाळांतील

अनिल परब यांनी राडा करूनही निकटवर्तीयाची उबाठातून हकालपट्टी

मुंबई : ज्या कार्यकर्त्याला तिकीट मिळवून देण्यासाठी अनिल परब यांनी मातोश्रीत मध्यरात्री राडा घातला होता, त्याची