सूर्या कालव्यातून शेतीसाठी पाणी

डहाणू-पालघरमधील शेतीला आधार


कासा : डहाणू आणि पालघर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची वार्ता आहे. सूर्या प्रकल्पाच्या डाव्या तीर कालव्यातून उन्हाळी हंगामासाठी ३० डिसेंबरपासून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. तसेच, दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात असल्याने उजव्या कालव्यातूनही येत्या दोन दिवसांत पाणी सोडले जाणार आहे.


पाटबंधारे विभागाने हाती घेतलेल्या कालव्यांच्या दुरुस्ती आणि अस्तरीकरणाच्या कामाचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. डाव्या कालव्याच्या पहिल्या सात किलोमीटरचे काम पूर्ण झाल्याने पाण्याच्या प्रवाहाला गती मिळाली आहे. यामुळे आता कालव्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचवणे शक्य झाले असून, शेतकऱ्यांची पाण्याची प्रतीक्षा संपली आहे.


कालव्यांची सद्यस्थिती :


डावा कालवा : एकूण लांबी २९ किमी असून, १ ते ७ किमीपर्यंतचे अस्तरीकरण पूर्ण झाले आहे.


उजवा कालवा : एकूण लांबी ३३ किमी आहे. येथेही पहिल्या ७ किमीचे काम पूर्ण झाले असून, पुढील टप्प्यासाठी काम प्रस्तावित आहे. सध्या सुरू असलेल्या डागडुजीमुळे पाणी बंद असले तरी दोन दिवसांत ते पूर्ववत होईल.


शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचणार पाणी


मुख्य कालव्यासोबतच लघु कालव्यांची दुरुस्ती आणि त्यातील गाळ काढण्याचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे. लघु कालवे स्वच्छ झाल्यामुळे शेतीसाठी पाणीपुरवठा अधिक सुरळीत होईल आणि शेवटच्या शेतापर्यंत पाणी पोहोचेल, असा विश्वास पाटबंधारे विभागाने व्यक्त केला आहे. या निर्णयामुळे पालघर आणि डहाणू पट्ट्यातील उन्हाळी पिकांना जीवदान मिळणार असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.


Comments
Add Comment

Bullet Train : बुलेट ट्रेनचे राज्यातील काम जोरात, तंत्रज्ञांनी पालघर जिल्ह्यात केली कमाल

पालघर : मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम प्रगतीपथावर आहे. केंद्रातल्या मोदी सरकार आणि राज्यातल्या फडणवीस

Mumbai-Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन: पालघरमध्ये तिसऱ्या डोंगराळ बोगद्याचे काम फत्ते; अवघ्या ५ महिन्यांत महाराष्ट्रातील 'हे' मोठे आव्हान पूर्ण

पालघर : देशातील पहिल्या हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पाच्या (high-Speed Railway Project) म्हणजेच 'मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन'च्या

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अपघातात ठार १३ जणांवर अंत्यसंस्कार, पीडित कुटुंबांचे पालकत्व शासन स्वीकारणार

डहाणू : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील धनिवरी येथे १८ मे रोजी झालेल्या भीषण अपघातातील १३ मृतांवर आज अत्यंत

Palghar Accident : काळजाचा ठोका चुकवणारं दृश्य! एकाच रांगेत १२ मृतदेह, बापूगावात महिलांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश

पालघर : आनंदाने नटलेले घर, साखरपुड्याच्या निमित्ताने जमलेले सर्व नातेवाईक आणि उत्साहाचे वातावरण... पण नियतीच्या

Palghar Accident : साखरपुड्याच्या वऱ्हाडावर काळाचा घाला, १३ जणांचा मृत्यू; मृतांच्या वारसांना मदत जाहीर

डहाणू : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणू तालुक्यातील धानोरी येथे रविवारी दुपारी एक अत्यंत भीषण आणि

Mumbai- Ahemdabad Expressway Accident : डहाणूमध्ये 100 वऱ्हाड्यांनी भरलेल्या ट्रकला भरधाव कंटेनरची धडक; 12 जणांचा जागीच मृत्यू, 25 हून अधिक गंभीर

डहाणू : साखरपुड्याचा आनंद साजरा करण्यासाठी निघालेल्या एका कुटुंबावर आणि त्यांच्या पाहुण्यांवर काळाने अचानक