Heavy Rain In Palghar : घोणसई गावाला पाण्याचा वेढा; मुख्य पूल पाण्याखाली

- मुख्य पूल बुडाल्याने गावाचा बाहेरील संपर्क खंडित


वाडा : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पालघर जिल्ह्यातील वाडा (Heavy Rain In Palghar) तालुक्यातील घोणसई गावातील मुख्य रस्त्यावरील पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला असून गावाचा बाहेरील संपर्क तुटला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.


सततच्या पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला असून घोणसई गावातील मुख्य ओहोळावरील पूल जलमय झाला आहे. यामुळे कामानिमित्त गावाबाहेर गेलेले अनेक नागरिक गावात परतू शकत नसल्याने बाहेरच अडकून पडले आहेत. तसेच गावातील नागरिकांनाही अत्यावश्यक कामासाठी किंवा आपत्कालीन परिस्थितीत गावाबाहेर जाता येत नसल्याने गंभीर अडचणी निर्माण झाल्या आहेत. (Heavy Rain In Palghar)



या मार्गाला पर्यायी रस्ता उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांची गैरसोय अधिकच वाढली आहे. अवघ्या काही दिवसांच्या पावसात निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून प्रशासनाने तातडीने पाहणी करून सुरक्षित पर्यायी व्यवस्था करावी, तसेच कायमस्वरूपी उपाययोजना करून ग्रामस्थांना दिलासा द्यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. (Heavy Rain In Palghar)

Comments
Add Comment

CJP : सीजेपी आंदोलनकाळात महाराष्ट्रात दाखल गुन्हे रद्द होणार

मुंबई : वैद्यकीय प्रवेश परीक्षा 'नीट'मधील अनियमिततेविरोधात आणि कॉकरोच जनता पार्टीच्या (सीजेपी) समर्थनार्थ

  Quick Breakfast Recipes : फक्त १५ मिनिटांत तयार होणारे ८ झटपट नाश्त्याचे पदार्थ

सकाळी उठल्यानंतर आपल्याला खूप भूक लागलेली असते. (Easy & Quick Snack Recipes For Breakfast). यातच सकाळी सकाळी ऑफिसला जाण्याची घाईगडबड तसेच

AAFA 2026 : अल्लू अर्जुन ने जिंकली चाहत्यांची मने; भारतीय संस्कृती जपत काढली पादत्राणे

अल्लू अर्जुन आज देशातील सर्वात मोठ्या पॅन-इंडिया सुपरस्टार्सपैकी एक आहेत. पुष्पा फ्रँचायझीच्या अभूतपूर्व

High Protein Fruits : कोणत्या फळात किती प्रोटीन? रोजच्या आहारात फळांचा समावेश कसा करावा?

रोजच्या आहारातील प्रथिनांचे प्रमाण वाढवण्यासाठी अनेक जण "हाय-प्रोटीन फळे" शोधण्याचा प्रयत्न करतात. फळे ही

Guru Purnima : गुरुपौर्णिमा नेमकी कधी ? जाणून घ्या गुरुपौर्णिमेचे महत्त्व

मुंबई : हिंदू धर्मामध्ये गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. आपल्या गुरुबद्दल असलेला आदर, कृतज्ञता व्यक्त

Solo Trip : सोलो ट्रीपला जाण्याचा प्लॅन करताय ? मग या ठिकाणांचा नक्की विचार करा

मुंबई : एकट्याने प्रवास करण्याचा ट्रेंड दिवसेंदिवस वाढत आहे. सोलो ट्रिपमुळे (Solo Trip) नवीन ठिकाणं अनुभवता येतात,