ऑरेंज गेट ते मरिन ड्राईव्ह बोगद्याचे काम डिसेंबर २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

केंद्राकडून ६८ कोटींचा निधी उपलब्ध


मुंबई : मुंबईतील वाहतूक कोंडी फोडण्यासह जलद प्रवासासाठी ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह दुहेरी बोगद्याचे काम हाती घेतले आहे. डिसेंबर २०२८ पर्यंत काम पूर्ण करण्याचे राज्य सरकारचे उद्दीष्ट असून केंद्र सरकारने या कामासाठी ६८ कोटींचा निधी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला उपलब्ध करुन दिला आहे.


सन २०२५-२६ च्या भांडवली गुंतवणुकीसाठी राज्यांना विशेष सहाय्य योजनेअंतर्गत विशेष सहाय्य (कर्ज) च्या भाग-१ अंतर्गत ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भुयारी मार्ग प्रकल्पासाठी २०० कोटींच्या निधी उपलब्ध करुन देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर करण्यात आला होता. त्यानुसार केंद्र शासनाने ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भुयारी मार्ग प्रकल्पासाठी एकूण २०० कोटींचा निधी मंजूर केला असून मंजूर रकमेपैकी ६८ कोटींचा निधी उपलब्ध करुन दिला आहे.


शहरातील पूर्व मुक्तमार्गाजवळील ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह दरम्यान वाहतुकीच्या दळणवळणासाठी भुयारी मार्गाचे बांधकामासाठी १३५४ कोटी रकमेचे बिनव्याजी दुय्यम कर्ज सहाय्य प्राधिकरणाला उपलब्ध करुन देण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. या प्रकल्पाच्या मंजूर वित्तीय आराखड्यानुसार प्रकल्पावरील केंद्रीय कराच्या ५० टक्के रक्कम ३०७.२२ कोटी, राज्य स्तरीय करांसाठी ६१४.४४ कोटी आणि खाजगी व शासकीय जमीन कायमस्वरुपी व तात्पुरत्या स्वरुपातील जागा उपलब्ध करुन देण्याबाबतचा खर्चाची तरतूद ४३३ कोटी असे एकूण १३५४.६६ कोटी बिनव्याजी दुय्यम कर्ज सहाय्य राज्य शासनाकडून प्राधिकरणाला उपलब्ध करुन द्यावयाचे आहे.


मुंबई शहरातील पूर्व मुक्तमार्गाजवळील ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह दरम्यान वाहतुकीच्या दळणवळणासाठी भुयारी मार्गाचे बांधकाम प्रकल्पासाठी केंद्र सरकारने ६८ कोटींचा निधी उपलब्ध करुन दिला आहे.

Comments
Add Comment

Rashmi Sukhla : माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट!

प्रदीर्घ आणि यशस्वी कारकिर्दीनंतर घेतली निवृत्ती मुंबई : महाराष्ट्र राज्याच्या माजी पोलीस महासंचालक रश्मी

दिल्लीकरांसाठी महाराष्ट्र सदनात ग्रामीण संस्कृतीची मेजवाणी

९ ते ११ जानेवारीदरम्यान ‘हुरडा पार्टी’ आणि ‘मकर संक्रांत नवी दिल्ली : दिल्लीकरांना महाराष्ट्राच्या ग्रामीण

मुंबई उपनगरीय रेल्वेवर आज आणि उद्या मेगा ब्लॉक

मध्य व पश्चिम रेल्वेवरील सेवांमध्ये बदल मुंबई : प्रवाशांच्या सुरक्षिततेसह रेल्वे पायाभूत सुविधांची देखभाल व

नको सुट्ट्या पैशाची कटकट... तिकीट काढा झटपट...!

एसटीच्या यूपीआयमार्फत तिकीट विक्रीला प्रवाशांची वाढती पसंती मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी)

दहिसर-काशीगाव ‘मेट्रो ९’ टप्पा लवकरच सुरू होणार

सीएमआरएस चाचण्या अंतिम टप्प्यात मुंबई : 'दहिसर -भाईंदर मेट्रो ९' मार्गिकेतील दहिसर–काशीगाव टप्प्यातील सुरक्षा

राज्यातील २९ लाख विद्यार्थी अपार आयडी नोंदणीविना

मुंबई : राज्यातील सुमारे २९ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची अद्याप अपार आयडी नोंदणी झालेली नाही. त्यामुळे या