आयपीएलमध्ये एकाही बांगलादेशी खेळाडूला खेळू देणार नाही

मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांचा इशारा


मुंबई : ज्याप्रकारे हिंदूंवर बांगलादेशात अत्याचार होत आहेत. हिंदूंना जिवंत जाळलं जात आहे आणि ज्याप्रकारे बांगलादेश भारतविरोधी भूमिका घेत आहे. हे पाहता बांगलादेशच्या कोणत्याही खेळाडूला आम्ही आयपीएलमध्ये खेळू देणार नाही. ही राष्ट्रवादाची बाब आहे, राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर कोणतीही तडतोज केली जाणार नाही. एकाही बांगलादेशी खेळाडूस मुंबईत खेळू देणार नाही, असा इशारा मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी इशारा दिला आहे.


बांगलादेशात मागील काही दिवसांपासून सातत्याने अल्पसंख्यांकांवर विशेषकरून हिंदूंवर जीवघेण्या हल्ल्याच्या आणि त्यांच्या निर्घृण हत्येच्या घटना घडत आहेत. यावरून बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षितेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. भारत सरकारने या घटनांवर तीव्र नाराजी व्यक्त करत बांगलादेश सरकारला जाब विचारला आहे. शिवाय, आंतरराष्ट्रीय पातळीवरही या घटनांवरून बांगलादेश सरकारवर टीका सुरू आहे.


मात्र असे जरी असले तरीही अद्यापपर्यंत या घटना थांबल्याचे दिसत नाही. हिंदूंवर अत्याचाराच्या नवनवीन घटना समोर येत आहेत. अमित साटम म्हणाले की, हेच कारण आहे की बीसीसीआयने हे फर्मांन काढले आहे. मग तो शाहरुख खानच्या संघामधील असेल किंवा आणखी एका संघाचा, बांगलादेशी खेळाडूंना कोणत्याही आयपीएल संघात खेळू देणार नाही. असेही साटम यांनी म्हटले आहे.


न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांनी उमर खालीद बाबत केलेल्या विधानावर बोलताना अमित साटम म्हणाले, काही आंतरराष्ट्रीय शहरांमध्ये ज्याप्रकारे इस्लामी जिहादींनी कब्जा करून तेथील रंग बदलला आहे. त्याचप्रकारे मुंबईचा रंग बदलण्याचे प्रयत्न सुरू आहे आणि हा एक आंतरराष्ट्रीय षडयंत्राचा भाग आहे. ते म्हणाले, ‘काँग्रेस, सपा, एमआयएम, ठाकरे देशविरोधी शक्तींना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत आहेत. ते मुंबईचा रंग बदलण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु मुंबईकर जागरूक आहेत. मुंबईचा रंग बदलण्याचे असे प्रयत्न आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. आम्ही मुंबईचे मोमडियेनाइजेशन होऊ देणार नाही’.

Comments
Add Comment

Pune Crime: पुणे पोलिसांच्या सर्च मोहिमेला मोठे यश; ११ बांगलादेशी महिलांना अटक

पुणे: पुणे शहरातील बुधवार पेठ परिसरात पोलिसांनी बुधवार १८ फेब्रुवारीच्या रात्री विशेष सर्च मोहीम राबवत मोठी

Cotton Procurement Scheme: मुख्यमंत्र्यांकडून कापूस खरेदी योजनेला मुदतवाढ; खुल्या बाजारात दर कोसळण्याची भीती

अकोला: शेतकऱ्यांच्या प्रश्नांना सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या आमदार रणधीर सावरकर यांनी केंद्र आणि राज्य

ST Bus: वर्षाअखेर एसटी आर्थिकदृष्ट्या सुदृढ होणार; तब्बल ८,३०० नवीन बसेस ताफ्यात होणार दाखल

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा ठाम विश्वास दैनंदिन १ ते १.५ कोटी रुपयांची तूट सहन करत आर्थिक दडपणाखाली

AI for Agri 2026: एआय फार ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

२२ आणि २३ फेब्रुवारी रोजी होणार मुंबईत एआय फॉर अॅग्री २०२६ जागतिक परिषद “कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून

Mumbai Metro: मुंबई मेट्रोसंदर्भातील मोठी अपडेट समोर; तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांना...

मुंबई: मुंबई मेट्रोसंदर्भातील मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई मेट्रोमध्ये मोठा तांत्रिक बिघाड झाल्याने वाहतूक

India AI Impact Summit 2026: मोठा दृष्टीकोन ठेवत एआयचा जबाबदारीने वापर करणे आवश्यक - पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली: देशाची नवीन पिढी वेगाने कृत्रिम बुद्धीमत्तेला म्हणजेच 'एआय'ला स्वीकारत असून ही अत्यंत अभिमानाची बाब