नवजात बालकांची विक्री रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकार करणार कठोर कायदा; गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची विधानपरिषदेत घोषणा

मुंबई: मुंबई शहर आणि उपनगरातील दाट लोकवस्तीच्या भागांमध्ये नवजात बालकांची विक्री करणाऱ्या टोळ्या मोठ्या प्रमाणावर सक्रिय झाल्या असून, या गंभीर प्रकरणाची दखल आता राज्य सरकारने घेतली आहे. विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला शिवसेना (ठाकरे गट) आमदार मिलिंद नार्वेकर यांनी गोवंडी आणि मानखुर्द परिसरातील अशा टोळ्यांवर होणाऱ्या कारवाईबाबत प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट केले की, काही टोळ्या खासगी व सरकारी प्रसूतीगृहे तसेच आयव्हीएफ (IVF) केंद्रांमधून बालकांच्या जन्माची माहिती मिळवून, आर्थिक आमिष दाखवून पालकांना बालकांची विक्री करण्यास प्रवृत्त करतात. यामध्ये काही रुग्णालयीन कर्मचाऱ्यांचाही सहभाग असल्याचे निदर्शनास आले आहे.



या अनैतिक व्यापाराला पूर्णपणे आळा घालण्यासाठी सरकार आता एका कठोर कायद्याचा विचार करत असल्याचे आश्वासन मंत्री कदम यांनी दिले. या योजनेचा एक भाग म्हणून, प्रसूतीगृहांमधील नोंदणी प्रक्रियेत अधिक गोपनीयता राखली जाईल आणि यासाठी एक स्वतंत्र पोर्टल विकसित केले जाईल, जेणेकरून माहितीची गळती होणार नाही. विशेष म्हणजे, आमदार नार्वेकर यांनी मांडलेल्या सूचनेनुसार, जर एखादा मुख्य आरोपी अटक झाल्यानंतरही त्याचे कुटुंबीय हाच बेकायदेशीर व्यवसाय पुढे चालू ठेवत असतील, तर केवळ आरोपीवरच नाही तर त्याच्या संपूर्ण कुटुंबावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याबाबत सरकार कायद्याचा सखोल अभ्यास करून निर्णय घेईल, असेही मंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

10 वी पास दाम्पत्याचं कांड ऐकून तुम्हालांही बसेल धक्का, निवृत्त न्यायाधीशाचं घर भाड्यानं घेतलं आणि...

छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही वर्षांपूर्वी राज्यात बीडमधील मुंडे दाम्पत्याकडून होत असलेल्या गर्भपात घटनेचा

महिला आरक्षण विधेयकासाठी महायुती सरकार मैदानात, घेतला मोठा निर्णय

महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा देण्यासाठी महायुती सरकार आता मैदानात उतरले आहे. लवकरच महायुती सरकार महिला

Pune Crime : पुण्यात दहशत कायम; भाजप कार्यकर्त्यावर ९ राऊंड फायर

मावळ : पुण्याची वाढती गुन्हेगारी आता पुणेकरांसाठी धोक्याची घंटा बनत चालली आहे. गुंडांची दहशत मोठ्या प्रमाणात

Ashok Kharat : भोंदू खरातच्या कार्यालयात मिळाल्या महिलांच्या नावाने चेक आणि अंगठीच्या रिंगा

सिन्नर मध्ये रूपाली चाकणकरांनी घेतली कार्यकर्त्यांची बैठक नाशिक :  भोंदू बाबा अशोक खरात याच्या कार्यालयाची

Heatstroke : लातूर - उष्माघातामुळे बळींची संख्या ४ वर

लातूर :  निलंगा तालुक्यातील पानचिंचोली येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. स्वतःच्या शेतात काम करत असताना ७५

Nashik : महापौर-उपमहापौरांकडून रस्ते व विकासकामांची पाहणी

नाशिक : नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील प्रलंबित आणि सुरू असलेल्या विकासकामांचा दर्जा व वेग तपासण्यासाठी आज