बस पेटल्याने समृद्धी महामार्गावर चालकाचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) : समृद्धी महामार्गावर वैजापूरहून, मुंबईहून येणाऱ्या दिशेच्या मार्गावर ट्रॅकची बसला धडक बसल्याने भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत बस चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बसमध्ये चालकासह ३२ जण प्रवास करीत होते, त्यातील काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून, एकाची प्रकृती चिंताजनक आहे. साईराम ट्रॅव्हल्स कंपनीची ही बस मुंबईहून बुलढाण्याच्या दिशेने जात असताना पहाटे ३.३० च्या सुमारास ट्रकची धडक लागताच बसला आग लागली, सर्व प्रवाशांनी बसमधून तातडीने बाहेर पडण्याचा मार्ग शोधला. चालक आतच गुदमरून गेल्याने त्यांना बाहेर पडता आले नाही, त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले आहे.



ओव्हरटेक करताना ट्रकला धडक, ट्रकसह बसही पेटली


अपघातात २१ जण किरकोळ जखमी आहेत, त्यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघात झाला त्यावेळी सर्व प्रवासी झोपलेले होते, अचानक आग लागल्याने आपत्कालीन दरवाजा उघडून, तर काही लोकांनी काचा फोडून बाहेर पडत स्वतःचा जीव वाचवला. बसची ट्रकला जबर धडक बसल्याने चालक अडकला होता. त्यामुळे त्याला बाहेर पडता आले नाही. सदरील बस लेन क्रमांक दोनमधून तीनवर जात असताना, ओव्हरटेक करत असताना धडक बसल्याने बससह ट्रकने पेट घेतला होता. सदरील वाहनांमधील आग विझववण्यात आली, पुढील तपासाची माहिती शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक गणेश काळे यांनी दिली.

Comments
Add Comment

FDA Inspections : गणेशोत्सवात महाप्रसादासाठी लागणार परवाना

- भंडाऱ्यावरही असणार ‘एफडीए’ची नजर मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांततर्फे

Pratap Sarnaik : ‘रॅपिडो’शी व्यावसायिक संबंधांचे पुरावे द्या!

- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर; प्रत्येक गोष्टीला राजकीय रंग देणे योग्य

Nepal floods : नेपाळमधील पूरपरिस्थितीत नांदेडचे पर्यटक अडकले; मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने जारी केले तात्काळ संपर्क क्रमांक

नांदेड : नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या भीषण पूरस्थितीमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले

CM Devendra Fadnavis : गडचिरोलीच्या विकासाला नवी दिशा; ‘ग्रीन स्टील हब’ म्हणून उदयास येणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : गडचिरोली जिल्हा निर्मितीला २६ ऑगस्ट रोजी ४४ वर्षे पूर्ण होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

CM Devendra Fadnavis : चाकण ‘एमआयडीसी’मध्ये ४९ उद्योगांसोबत सामंजस्य करार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती; २ हजार ३२० कोटींची गुंतवणूक प्रस्तावित मुंबई : चाकण-भोसरीच्या

Sunetra Pawar : चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे निर्देश

पुणे : चाकण परिसरातील अनेक समस्या वर्षानुवर्षे प्रलंबित असून, त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सर्व