बस पेटल्याने समृद्धी महामार्गावर चालकाचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) : समृद्धी महामार्गावर वैजापूरहून, मुंबईहून येणाऱ्या दिशेच्या मार्गावर ट्रॅकची बसला धडक बसल्याने भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत बस चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बसमध्ये चालकासह ३२ जण प्रवास करीत होते, त्यातील काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून, एकाची प्रकृती चिंताजनक आहे. साईराम ट्रॅव्हल्स कंपनीची ही बस मुंबईहून बुलढाण्याच्या दिशेने जात असताना पहाटे ३.३० च्या सुमारास ट्रकची धडक लागताच बसला आग लागली, सर्व प्रवाशांनी बसमधून तातडीने बाहेर पडण्याचा मार्ग शोधला. चालक आतच गुदमरून गेल्याने त्यांना बाहेर पडता आले नाही, त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले आहे.



ओव्हरटेक करताना ट्रकला धडक, ट्रकसह बसही पेटली


अपघातात २१ जण किरकोळ जखमी आहेत, त्यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघात झाला त्यावेळी सर्व प्रवासी झोपलेले होते, अचानक आग लागल्याने आपत्कालीन दरवाजा उघडून, तर काही लोकांनी काचा फोडून बाहेर पडत स्वतःचा जीव वाचवला. बसची ट्रकला जबर धडक बसल्याने चालक अडकला होता. त्यामुळे त्याला बाहेर पडता आले नाही. सदरील बस लेन क्रमांक दोनमधून तीनवर जात असताना, ओव्हरटेक करत असताना धडक बसल्याने बससह ट्रकने पेट घेतला होता. सदरील वाहनांमधील आग विझववण्यात आली, पुढील तपासाची माहिती शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक गणेश काळे यांनी दिली.

Comments
Add Comment

Crime News : आधी कार आता दुचाकी जळून खाक, अहिल्यानगरात काय घडतंय ? CCTV तील 'ते' दृश्य पाहून संशय बळावला

Crime News :  अहिल्यानगर शहरात वाहनांना लक्ष्य करून आग लावण्याच्या घटना सुरूच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Jalgaon : भीषण अपघातामुळे वाटेतच काळाची झडप, १ वर्षाच्या चिमुकलीसह चौघांचा हृदयद्रावक अंत

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील वरणगावजवळ मुंबई-नागपूर महामार्गावरील (Mumbai-Nagpur Highway) बायपासवर थरारक अशी भीषण रस्ते अपघाताची

Crime News : शिट्टी वाजवली, उसाच्या शेतातून 10 ते 12 जण बाहेर आले, अन.... स्वस्तात सोने मिळण्याचे आमिष महागात पडले

अहिल्यानगर : स्वस्तात सोने मिळणार असल्याचं आमिष दाखवत रायगडच्या जिल्हा परिषद सदस्यालाच सापळ्यात ओढून तब्बल 52

Kolhapur News : कोल्हापूरात कोल्ह्याची दहशत! साडेतीन वर्षांच्या चिमुकल्यासह ११ जण जखमी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांच्या (Attack) घटना सातत्याने समोर येत असताना आता

Yavatmal Murder Case : ‘गिफ्ट लवकरच पाठवतो’... स्टेटस ठेवला अन् घरात घुसून सपासप वार; तरुणाची निर्घृण हत्या

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारांचे प्रमाण वाढत चालले आहे. अशातच आणखी एका हत्येची घटना समोर आली

Navi Mumbai Airport Shivaji Maharaj Statue : नवी मुंबई विमानतळावर शिवरायांचा भव्य पुतळा! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते १२ फूट उंच कांस्य अर्धपुतळ्याचे अनावरण

नवी मुंबई : महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य १२ फूट उंच कांस्य