बस पेटल्याने समृद्धी महामार्गावर चालकाचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) : समृद्धी महामार्गावर वैजापूरहून, मुंबईहून येणाऱ्या दिशेच्या मार्गावर ट्रॅकची बसला धडक बसल्याने भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत बस चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बसमध्ये चालकासह ३२ जण प्रवास करीत होते, त्यातील काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून, एकाची प्रकृती चिंताजनक आहे. साईराम ट्रॅव्हल्स कंपनीची ही बस मुंबईहून बुलढाण्याच्या दिशेने जात असताना पहाटे ३.३० च्या सुमारास ट्रकची धडक लागताच बसला आग लागली, सर्व प्रवाशांनी बसमधून तातडीने बाहेर पडण्याचा मार्ग शोधला. चालक आतच गुदमरून गेल्याने त्यांना बाहेर पडता आले नाही, त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले आहे.



ओव्हरटेक करताना ट्रकला धडक, ट्रकसह बसही पेटली


अपघातात २१ जण किरकोळ जखमी आहेत, त्यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघात झाला त्यावेळी सर्व प्रवासी झोपलेले होते, अचानक आग लागल्याने आपत्कालीन दरवाजा उघडून, तर काही लोकांनी काचा फोडून बाहेर पडत स्वतःचा जीव वाचवला. बसची ट्रकला जबर धडक बसल्याने चालक अडकला होता. त्यामुळे त्याला बाहेर पडता आले नाही. सदरील बस लेन क्रमांक दोनमधून तीनवर जात असताना, ओव्हरटेक करत असताना धडक बसल्याने बससह ट्रकने पेट घेतला होता. सदरील वाहनांमधील आग विझववण्यात आली, पुढील तपासाची माहिती शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक गणेश काळे यांनी दिली.

Comments
Add Comment

TET exam : टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक

टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक बुरखा, दुपट्टा किंवा ओढणीला बंदी नाही- राज्य परीक्षा

Vilas Ghule : विलास घुले हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंचा सवाल; निष्पक्ष तपासाची मागणी

बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील केज तालुक्यातील विलास घुले (Vilas Ghule) हत्या प्रकरणावरून (Murder) माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे

Monsoon Update : जून महिन्यात पाऊस पडणार नाही ; या तारखेपासून कोसळणार मुसळधार पाऊस

महाराष्ट्र : महाराष्ट्रामध्ये काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. २३ आणि २५ जूनला मुंबईसह इतर शहरात मुसळधार

Ketan Agarwal Murder Case: "म्हणून मी त्याला लोहगडावरून खाली ढकललं..." सियाने पोलिसांसमोर सर्वचं सांगितलं

केतनच्या हत्येमागचं सर्वात भयंकर कारण आलं समोर Ketan Agarwal Murder Case : पुणे : पुण्यातील उद्योगपती केतन अग्रवाल (Ketan Agarwal Murder)

आषाढी वारीसाठी रेल्वेची खास भेट; पंढरपूरसाठी धावणार विशेष गाड्या, जाणून घ्या वेळापत्रक

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्यांची घोषणा केली

Maharashtra Infrastructure : मुंबई आणि नागपूरसाठी मोठा निर्णय; दोन महत्त्वाच्या वाहतूक प्रकल्पांना राज्य सरकारची मंजुरी

राज्यातील वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने दोन महत्त्वाच्या पायाभूत सुविधा