भारतात वर्षभरात १६६ वाघांचा मृत्यू

३१ बछड्यांचा समावेश


नागपूर : राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, जगातील जवळपास तीन-चतुर्थांश वाघांचे घर असलेल्या भारतात, २०२५ मध्ये तब्बल १६६ वाघांचा मृत्यू झाला. २०२४ च्या तुलनेत ही संख्या ४० ने वाढली आहे. २०२४ जेव्हा १२६ मृत्यूंची नोंद झाली होती. अधिवासावरील दबाव, प्रादेशिक स्पर्धा आणि संवर्धनातील आव्हाने यांसारख्या समस्यांबाबत नवीन चिंता निर्माण झाली आहे.


मध्यप्रदेशात सर्वाधिक ५५ मृत्यूंची नोंद झाली, तर इतर प्रमुख मृत्यू महाराष्ट्र ४०, केरळ १३ आणि आसाम १२ वाघांचे मृत्यू नोंदवले गेले. देशभरात मृत्यू झालेल्या एकूण वाघांपैकी ३१ बछडे होते. यापैकी बहुतेक मृत्यूंमागे प्रादेशिक संघर्ष हे एक प्रमुख कारण म्हणून समोर येत आहे. जागेच्या कमतरतेमुळे होणारी प्रादेशिक भांडणे हे वाघांच्या मृत्यूमागील प्रमुख कारणांपैकी एक आहे.


विशेषतः  मध्यप्रदेशात गेल्या दशकात वाघांच्या संख्येत अभूतपूर्व वाढ झाली आहे. राज्यातील वाघांच्या संख्येत २०१४ पासून २०२२ पर्यंत ७० टक्क्यांनी वाढ झाली. या जलद वाढीमुळे स्पर्धा तीव्र झाली आहे. २०२५ मधील पहिला वाघाचा मृत्यू २ जानेवारीला महाराष्ट्रातील ब्रह्मपुरी वनविभागात नोंदवला गेला, जिथे एका प्रौढ नर वाघाचा मृतदेह आढळला. त्यानंतर, तीन दिवसांनी मध्य प्रदेशातील पेंच व्याघ्र प्रकल्पात एका प्रौढ मादी वाघाचा मृत्यू झाला.


वाघ संवर्धन प्रकल्पांना जगभरात मान्यता


वाघाच्या मृत्यूची शेवटची नोंद २८ डिसेंबरला मध्यप्रदेशातील उत्तर सागर येथे आढळलेल्या एका प्रौढ नर वाघाच्या स्वरूपात झाली. बहूतांश मृत्यू हे संरक्षित क्षेत्राव्यतिरिक्त बाहेर झाले आहेत तर अनेक मृत्यू हे संशयास्पद, शिकार यातून झाले आहेत. वन्यजीवांसाठी असणारे कॉरिडॉर विकासात्मक प्रकल्पांमुळे तुटत आहेत आणि मानवी वस्ती असलेल्या अधिवासांमुळे त्यांच्या मुक्त हालचालींवरही मर्यादा येत आहेत. भारतातील वाघ संवर्धन प्रकल्पांना जगभरात ओळख आणि मान्यता मिळाली आहे. २०२३ मध्ये आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त झालेल्या शेवटच्या अधिकृत अखिल भारतीय व्याघ्रगणनेनुसार, भारतातील वाघांची संख्या २०१८ मधील २,९६७ वरून २०२२ मध्ये ३,६८२ पर्यंत वाढली आहे. भारत जगभरातील एकूण वाघांच्या लोकसंख्येपैकी जवळपास ७५ टक्के वाघांचे संरक्षण करतो.

Comments
Add Comment

Crime News : आधी कार आता दुचाकी जळून खाक, अहिल्यानगरात काय घडतंय ? CCTV तील 'ते' दृश्य पाहून संशय बळावला

Crime News :  अहिल्यानगर शहरात वाहनांना लक्ष्य करून आग लावण्याच्या घटना सुरूच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Jalgaon : भीषण अपघातामुळे वाटेतच काळाची झडप, १ वर्षाच्या चिमुकलीसह चौघांचा हृदयद्रावक अंत

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील वरणगावजवळ मुंबई-नागपूर महामार्गावरील (Mumbai-Nagpur Highway) बायपासवर थरारक अशी भीषण रस्ते अपघाताची

Crime News : शिट्टी वाजवली, उसाच्या शेतातून 10 ते 12 जण बाहेर आले, अन.... स्वस्तात सोने मिळण्याचे आमिष महागात पडले

अहिल्यानगर : स्वस्तात सोने मिळणार असल्याचं आमिष दाखवत रायगडच्या जिल्हा परिषद सदस्यालाच सापळ्यात ओढून तब्बल 52

Kolhapur News : कोल्हापूरात कोल्ह्याची दहशत! साडेतीन वर्षांच्या चिमुकल्यासह ११ जण जखमी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांच्या (Attack) घटना सातत्याने समोर येत असताना आता

Yavatmal Murder Case : ‘गिफ्ट लवकरच पाठवतो’... स्टेटस ठेवला अन् घरात घुसून सपासप वार; तरुणाची निर्घृण हत्या

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारांचे प्रमाण वाढत चालले आहे. अशातच आणखी एका हत्येची घटना समोर आली

Navi Mumbai Airport Shivaji Maharaj Statue : नवी मुंबई विमानतळावर शिवरायांचा भव्य पुतळा! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते १२ फूट उंच कांस्य अर्धपुतळ्याचे अनावरण

नवी मुंबई : महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य १२ फूट उंच कांस्य