Virar Rename as Dwarkadhish: विरारच होणार नामांतर?? सोशल मीडियावर समर्थन आणि संतापाची लाट

पालघर : मागील काही वर्षांपासून राज्यात शहरांची व जिल्ह्यांची नावे बदलण्याचे प्रकार वाढताना दिसत आहेत. तसाच मुंबईत अनेक स्थानकांची ही नावे बदलण्यात आली आहेत. अशातच आता विरार शहराच्या नामांतराचा मुद्दा ऐरणीवर आला असून, विरारचे नाव बदलण्याचा प्रस्ताव चर्चेत आल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. या संभाव्य नामांतराच्या चर्चेमुळे शहरात तसेच सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.


विरार परिसरात ठिकठिकाणी ‘जय द्वारकाधीश’ असा मजकूर असलेले पिवळ्या आणि निळ्या रंगाचे फ्लेक्स झळकू लागले असून, या नामांतराच्या मागणीने अधिकच लक्ष वेधले आहे. सोशल मीडियावरही हा विषय वेगाने व्हायरल होत असून फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅपवर विविध पोस्ट्स, व्हिडिओ क्लिप्स आणि प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. काही व्हिडिओंमध्ये थेट विरारचे नाव बदलून ‘द्वारकाधीश’ करण्याची मागणी केली जात असल्याचे दिसून येत आहे.


दरम्यान, या कथित नामांतराच्या चर्चेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये आणि विशेषतः मराठी भाषिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. अनेकांनी सोशल मीडियावरून या प्रस्तावाला कडाडून विरोध केला आहे. विरार हे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि भौगोलिक ओळख असलेले नाव असून, ते बदलण्यामागे नेमका उद्देश काय, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.


या संपूर्ण वादाच्या पार्श्वभूमीवर विरारमध्ये नुकतीच उभारण्यात आलेली गुजरातमधील प्रसिद्ध द्वारकाधीश मंदिराची भव्य प्रतिकृती चर्चेत आली आहे. मागील महिन्यात या मंदिराचे उद्घाटन झाले असून, हे मंदिर वसई-विरार परिसरातील एक नवे धार्मिक आणि पर्यटन स्थळ म्हणून ओळख निर्माण करत आहे. विशेष म्हणजे, पारंपरिक स्थापत्यशैलीत उभारण्यात आलेले हे मंदिर सिमेंट किंवा आधुनिक साहित्याचा वापर न करता केवळ कोरलेल्या दगडांच्या साहाय्याने बांधण्यात आले आहे.


याच मंदिराच्या पार्श्वभूमीवर विरारचे नाव बदलण्याची मागणी पुढे येत असल्याची चर्चा आहे. मात्र, या मागणीला मोठ्या प्रमाणावर विरोध होत असून, हा विषय येत्या काळात राजकीय आणि सामाजिक पातळीवर अधिक तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

दादरमध्ये सलग चौथ्या दिवशी कारवाई जोरात

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्यावतीने सध्या फेरीवाल्यांविरोधात प्रत्येक विभागात धडक कारवाई सुरु

मुंबईची खड्डेमुक्तीच्या दिशेने वाटचाल, आतापर्यंत ६३ टक्के सिमेंट काँक्रिटच्या रस्त्याची कामे पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : ‘खड्डेमुक्त मुंबई’ या महत्त्वाकांक्षी ध्येयाकडे वाटचाल करत मुंबई महानगरपालिकेच्या

पालकमंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे सादर केला सिंधुदुर्ग जिल्ह्याचा ६०० कोटींचा प्रारूप आराखडा

मुंबई : राज्याच्या वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२६-२७ च्या प्रारूप आराखड्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी माननीय

भारताने अमेरिकेनंतर नामिबियालाही हरवले, आता प्रतिक्षा रविवारच्या लढतीची

नवी दिल्ली : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये भारताने अमेरिकेविरुद्धच्या सामना २९ धावांनी जिंकला. पाठोपाठ

सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन निधीत भरीव वाढ करण्याची पालकमंत्री नितेश राणे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

जिल्हा वार्षिक योजना २०२६-२७ च्या राज्यस्तरीय बैठकीत सिंधुदुर्गातील विकासकामांचा मुख्यमंत्र्यांसमोर

भारताने ओलांडला २०० चा टप्पा, नामिबियाला दिले मोठे आव्हान

नवी दिल्ली : अरुण जेटली स्टेडियममध्ये सुरू असलेल्या नामिबिया विरुद्धच्या सामन्यात भारताने २० षटकांत नऊ बाद २०९