Maha Budget 2026 : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा या लोकांना मिळणार लाभ

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत राज्याचा २०२६ - २७ आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात राज्याची अर्थव्यवस्था ७.९ टक्क्यांच्या वेगाने वाढत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेची घोषणा केली. या योजनेच्या माध्यमातून आता शेतमजुरांना लाभ मिळणार आहे.


शेतात काम करताना दुर्घटना झाली आणि त्यात जखमी झाल्यामुळे उपचार करण्याची वेळ आली तर पात्र असलेल्या शेतकरी तसेच शेतमजूर यांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ मिळेल. या अंतर्गत संबंधित व्यक्तीला दुर्घटना झाली तर आर्थिक संरक्षण मिळणार असून ग्रामीण कुटुंबांना मोठा आधार मिळणार आहे. राज्यातील ३० लाख शेतकऱ्यांना 'महाविस्तार' या एआय तंत्रज्ञानाद्वारे शेतीविषयक सर्व तांत्रिक आणि बाजारपेठेतील माहिती त्वरित उपलब्ध करून दिली जाईल. ज्या शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन नाहीत, त्यांच्यासाठी 'वसुधा' ही विशेष मेसेज सेवा सुरू करण्यात येणार आहे. याद्वारे सरकारी योजनांची माहिती थेट त्यांच्या फोनवर पाठवली जाईल.


महिला शेतकऱ्यांच्या उद्योजकतेसाठी विशेष कार्यक्रम राबवून त्यांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. तसेच शासनाच्या सर्व योजना डिजिटल माध्यमांतून थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत.

Comments
Add Comment

Nashik TCS Case : “धर्मांतरासाठी दबाव, बुरखा-नमाजचे प्रशिक्षण”, सरकारी वकिलांनी केले अनेक धक्कादायक दावे

- निदा खानला ११ मेपर्यंत पोलिस कोठडी नाशिक : नाशिकमधील TCS कंपनीतील धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणात अटक करण्यात

Decision of State Govt : जिल्हा बँकांतील ७० टक्के जागा यापुढे स्थानिकांसाठी राखीव

राज्य सरकारचा निर्णय; ३१ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना नियम लागू मुंबई : राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा

Devendra Fadnavis : एल निनोच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणाची कामे युद्धपातळीवर पूर्ण करा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; भूजल पातळी वाढविण्यासाठी कामे करण्याचे निर्देश मुंबई : एल निनोच्या पार्श्वभूमीवर

WhatsApp Business AI : व्हॉट्सअॅपने भारतात सुरू केली ‘बिझनेस एआय’ सेवा

- छोट्या व्यवसायांना मिळणार २४ तास ग्राहक सेवा देण्याची ताकद मुंबई : व्हॉट्सअॅप या लोकप्रिय मेसेजिंग

Nashik TCS Case : निदा खानच्या आजच्या पहिल्या सुनावणीत न्यायालयात घडलं ?

Nashik TCS Case : टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खान हिला अखेर छत्रपती संभाजी नगरमधून अटक करण्यात आली. गेले 25 दिवस निदा खान

TVK crosses 118 mark : तमिळनाडूत थलपती विजय यांचा मास्टरस्ट्रोक! एका झटक्यात फिरवला गेम, सत्तास्थापनेचा पेच अखेर सुटला

तमिळनाडू : तमिळनाडूच्या राजकीय मैदानातून एक अत्यंत महत्त्वपूर्ण घडामोड समोर येत आहे. अनेक दिवसांपासून सुरू