मुंबईत मनसेने दिले सहा अमराठी उमेदवार, मराठी इच्छुकांवर अन्याय

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी उबाठा सोबत मनसेने युती केल्यानंतर मराठी भाषा आणि मराठी माणूस या मुद्दयावर निवडणूक लढवत आहे. एका बाजुला भाजपाला अमराठी उमेदवार दिल्याने आरोप केले जात असतानाच मराठीच्या मुद्दयावर निवडणूक लढवायला निघालेल्या मनेसेने सहा अमराठी नगरसेवकांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे मराठीच्या गप्पा मारायच्या आणि दुसरीकडे अमराठी माणसांना उमेदवारी द्यायची यामुळे मनसेचा खरा चेहराच समोर येत आहे.


मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उबाठा आणि मनसे युती झाली असून मराठीच्या मुद्दयावर हे दोन्ही भाऊ एकत्र आले आहे. दोन्ही ठाकरे एकत्र आल्याने मराठी माणसांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे, मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदोत्सव साजरा केला गेला अशाप्रकारचे चित्र दोन्ही पक्षांकडून निर्माण केले गेले. परंतु एका बाजुला भाजपावर अमराठी उमेदवारांना तिकीट दिल्याचा आरोप करणाऱ्या मनसेकडून अमराठी व्यक्तींना उमेदवारी देण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे.


मनसेच्या वाट्याला ५३ जागा आल्या असून त्यातील प्रभाग क्रमांक २१मधून सोनाली देव मिश्रा, प्रभाग क्रमांक७४मधून विद्या भरत आर्य, प्रभाग क्रमांक ८१मधून शबनम शेख, प्रभाग क्रमांक ११० हरिनाक्षी मोहन चिराथ,ज्योती राजभोज, प्रभाग १८८ आरीफ शेख,प्रभाग २०९मधून हसीना माहिमकर आदींना उमेदवारी दिली आहे.


त्यामुळे यासर्व ठिकाणी मनसेला मराठी चेहऱ्यांना संधी देता आली असती, परंतु आता अमराठी चेहऱ्यांना संधी देत अमराठी माणसांना उमेदवारी दिली जात असताना मराठी माणसांनी नक्की काय विश्वास ठेवावा असा प्रश्न उपस्थित होत आहे. भांडुपमधील ११४ हा मनसेचा गड असताना तिथे मराठी अनिषा माजगावकर यांचा पत्ता कापला आणि ही जागा उबाठाने आपल्याकडे ठेवली,दुसरीकडे ११० हा मतदार संघ उबाठाने मनसेला सोडला आणि तिथे अमराठी चेहऱ्याला संधी देण्यात आली. त्यामुळे मराठी माणसांना संधी देण्यात येणारे प्रभाग सोडून अमराठी उमेदवारांना संधी देणारे प्रभाग राज ठाकरे यांच्या मनसेने स्वीकारल्याने मनसेला मराठी माणसांवर बोलण्याचा अधिकार आहे काय असा सवाल उपस्थित केला जात आहे. मराठी पदाधिकाऱ्याला उमेदवारी मिळावी म्हणून भांडुपमध्ये प्रभाग ११४करता मनसेने हट्ट का धरला नाही असाही सवाल केला जात आहे.

Comments
Add Comment

Central Government Operation Trishul : मोदी सरकारची मोठी कारवाई! 7 वर्षांत 36 देशांतून 274 फरार गुन्हेगार भारतात परत; 'ऑपरेशन त्रिशूल'ने वाढवली तपास यंत्रणांची ताकद

नवी दिल्ली : देशातून पळून गेलेल्या फरार गुन्हेगारांविरोधात केंद्र सरकारने मोठी मोहीम हाती घेतली असून, 2019 ते 2026 या

Analog Paneer : पनीरच्या ३२ टक्के नमुन्यांमध्ये भेसळ, 'ॲनालॉग पनीर'मध्ये वनस्पती चरबीचा वापर

मुंबई : राज्यात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) बाजारपेठेतून घेतलेल्या पनीरच्या नमुन्यांपैकी तब्बल ३२ टक्के नमुने

Mark Zuckerberg Apology : मेटाला PM मोदींचा व्हिडिओ हटवणे भोवले; केंद्र सरकार आक्रमक, झुकरबर्ग यांनी मागितली माफी

NEET परीक्षा पेपर लीक प्रकरणी दिल्लीतील जंतरमंतर येथे देशभरातून आंदोलनाचा भडका उडाला होता. या गंभीर पार्श्वभूमीवर

Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांनी घेतला करंजा मत्स्य बंदर प्रकल्पाचा आढावा

- ४ हजार ५०० मेट्रिक टन मत्स्य उत्पादन हाताळण्याची क्षमता; अत्याधुनिक यंत्रणेसह अनुभवी मनुष्यबळाचा वापर

ICC ODI World Cup : आयसीसी वन डे वर्ल्ड कपच्या पात्रता फेरीच्या तारखा जाहीर

नवी दिल्ली : पुरुषांच्या आयसीसी वन डे वर्ल्ड कपच्या पात्रता फेरीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. स्पर्धा सुरू

Foreigners Banned In Indian City : इंग्रजांनी वसवलेलं 'हे' निसर्गरम्य शहर; पण आज तिथेच परदेशी पर्यटकांना बंदी का ? कारण काय ?

देवभूमी म्हणून ओळखले जाणारे उत्तराखंड हे राज्य आपल्या निसर्गरम्य दऱ्या, शांत पर्वत आणि अप्रतिम निसर्ग