Maharashtra Government Update: अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी सौरऊर्जेचा मोठा निर्णय, घराघरांत स्वयंपूर्ण वीज, खर्चात बचत शक्य

प्रतिनिधी: सर्वांगीण व शाश्वत विकासासाठी सरकार आग्रही असताना नव्या निर्णयात अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे .आता जिल्हा वार्षिक योजना (अनुसूचित जाती उपाययोजना) अंतर्गत अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांच्या घराच्या छतावर १ केडब्ल्यू (1 KW) क्षमतेचे सौरऊर्जा संयंत्र बसवणे या नवीन योजनेस राज्य सरकारने मान्यता दिली आहे. यासोबतच केंद्र शासनाच्या अनुदानाव्यतिरिक्त राज्य शासनाकडून अतिरिक्त १५००० अनुदान देण्यासही शासनाने मंजुरी दिली आहे. याबाबतचा अधिकृत शासन आदेश पारित झालेला आहे.


या निर्णयाबाबत बोलताना राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सांगितले की,'अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील अनेक कुटुंबांना घरकुल योजना मिळाल्या असल्या तरी सुरुवातीचा खर्च परवडत नसल्याने सौरऊर्जेचा लाभ घेता येत नव्हता. ही अडचण दूर करण्यासाठी मी सातत्याने मुख्यमंत्री याना पत्रव्यवहार करून सातत्याने पाठपुरावा केला.' त्यामुळे आज आज मंत्री आशिष जयस्वाल याच्या प्रयत्नांना यश मिळाल्याचे सांगितले जात आहे.


मंत्री जयस्वाल यांच्या मते, या निर्णयामुळे लाभार्थ्यांना स्वच्छ, शाश्वत आणि किफायतशीर वीज उपलब्ध होणार असून मासिक वीजबिलातही मोठी बचत होईल. उपलब्ध माहितीनुसार, या योजनेअंतर्गत इंदिरा आवास, रमाई आवास तसेच प्रधानमंत्री आवास योजनेतील अनुसूचित जातीचे पात्र लाभार्थी केंद्र शासनाच्या पीएम–सूर्यघर: मोफत वीज योजना अंतर्गत मधून ३०००० रूपयांचे अनुदान घेऊ शकतील तसेच त्यासोबत राज्य शासनाकडून मिळणाऱ्या १५००० अतिरिक्त अनुदानाच्या मदतीने १ केडब्ल्यू सौरऊर्जा संयंत्र बसवू शकणार आहेत असे सरकारने यावेळी स्पष्ट केले.


परिणामी, दरमहा सुमारे १०० युनिटपर्यंत वीज उपलब्ध होऊन पर्यावरणपूरक ऊर्जेला चालना मिळेल, तसेच कुटुंबांच्या आर्थिक भारातही लक्षणीय घट होईल. याविषयी पुढे बोलताना, 'सामाजिक न्यायासोबत पर्यावरणीय न्याय साधण्याचा हा प्रयत्न आहे. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांना ऊर्जा स्वयंपूर्ण बनवणे, त्यांचे जीवनमान उंचावणे आणि हरित ऊर्जेच्या दिशेने महाराष्ट्राला पुढे नेणे, हाच या निर्णयाचा खरा उद्देश आहे' असेही आशिष जयस्वाल यांनी यावेळी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

Indian Railways : लोणावळा - कर्जत मार्गावर दरड कोसळल्यामुळे दिनांक १७ जुलै २०२६ पर्यंत काही गाड्यांच्या मार्गात बदल

लोणावळा - कर्जत मार्गावर दरड कोसळल्यामुळे दिनांक १७ जुलै २०२६ पर्यंत काही गाड्या शॉर्ट टर्मिनेट/ शॉर्ट ओरीजनेट/

Moshi Incident : मोशी दुर्घटनेतील मृतांचा आकडा सहावर; १७ जणांना बाहेर काढण्यात यश

पिंपरी  : मोशी येथील कचरा डेपो परिसरात कचऱ्याचा प्रचंड ढिगारा कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत मृतांचा आकडा सहावर

Donald Trump : हजार क्षेपणास्त्रे तयार;इराणला ट्रम्प यांचा इशारा

वॉशिंग्टन : अमेरिका आणि इराण यांच्यातील संबंध पुन्हा एकदा तणावपूर्ण वळणावर आले असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष

Traffic Congestion : वाहतूक कोंडीचा अर्थव्यवस्थेला फटका;चार शहरांना दरवर्षी ₹१.४७ लाख कोटींचे नुकसान

नवी दिल्ली: देशातील प्रमुख महानगरांमधील वाढती वाहतूक कोंडी ही केवळ नागरिकांच्या गैरसोयीचा विषय राहिलेली नसून,

Heatwave in India : उष्णतेच्या विळख्यात भारतातील १४ शहरे

जागतिक धोकादायक ५० शहरांच्या यादीत पुणे, नागपूरचा समावेश; अहमदाबाद दुसऱ्या क्रमांकावर नवी दिल्ली : शहरातील सतत

Ashish Shelar : लोककलांच्या धोरणाच्या बळकटीकरणासाठी समिती स्थापन करणार

सांस्कृतिक कार्यमंत्री अँड आशिष शेलार राज्याचे सांस्कृतिक धोरण तयार झाले आहे, त्यामध्ये लोककलांचा विचार