Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर पहाटे अग्नितांडव! ट्रक आणि ट्रॅव्हल्सच्या धडकेनंतर बस जळून खाक; एकाचा मृत्यू, ३१ प्रवाशांचा थरारक बचाव

छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना असून पहाटेच्या सुमारास झालेल्या एका भीषण अपघातात 'साईराम ट्रॅव्हल्स' या बसला भीषण आग लागली. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या या बसने समोरून येणाऱ्या ट्रकला जोराची धडक दिल्यानंतर हा प्रकार घडला. या दुर्घटनेत एका प्रवाशाचा होरपळून मृत्यू झाला असून, १ जण गंभीर जखमी झाला.



नेमकं काय घडलं?


साईराम ट्रॅव्हल्सची (Bharat Benz MH19 CX 3015) बस मुंबईकडे जात असताना पहाटे ३ वाजेच्या सुमारास माळीवाडा टोलनाक्यापासून १५-१६ किमी अंतरावर हा अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने किंवा अचानक समोर ट्रक (CG04 M 8711) आल्याने ट्रॅव्हल्सची ट्रकला पाठीमागून जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की, काही क्षणांतच बसने पेट घेतला.


मृत्यूचा थरार आणि बचावकार्य


घटनेच्या वेळी बसमध्ये २ चालक, १ कंडक्टर आणि २९ प्रवासी असे एकूण ३२ जण होते. आग लागताच प्रवाशांमध्ये मोठी पळापळ झाली. सुदैवाने ३१ जण बसमधून बाहेर पडण्यात यशस्वी झाले, मात्र खामगाव (बुलढाणा) येथील रहिवासी अमोल सुरेश शेलकर (वय ३८) यांचा या आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात आणखी एक प्रवासी गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


अग्निशमन दलाची तत्परता


घटनेची माहिती मिळताच मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांनी ताफा घेऊन घटनास्थळ गाठले. आगीने रौद्ररूप धारण केले होते, मात्र जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग विझवली. दुर्दैवाने, तोपर्यंत बसचा सांगाडाच उरला होता. सध्या माळीवाडा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून, अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.

Comments
Add Comment

Vande Bharat : पुण्यात वंदे भारतचा डबा घसरला

पुणे : पुणे स्टेशनजवळ संध्याकाळी २२२२५ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसचा चौथा डबा

Land Scam : अमरावती भूखंड घोटाळ्याची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी

मुंबई : अमरावती शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आरक्षित असलेले भूखंड अन्य व्यक्तींना बेकायदेशीरपणे

Agriculture Minister Dattatray Bharne : "बोगस बियाणे ओळखण्यासाठी बियाण्यांची डीएनए फिंगर प्रिंट टेस्ट केली जाणार" : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

"बियाण्यांची डिजिटल नोंद ठेवण्यासाठी ‘साथी’ पोर्टलचा वापर बंधनकारक : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे बियाणे उत्पादक

लक्ष द्या ! लग्नपत्रिकेवर वधू-वराची जन्मतारीख टाकणे अनिवार्य होणार ? नेमकी शिफारस काय ?

लग्न म्हणजे दोन व्यक्तींचे , दोन कुटुंबाचे मिलन. पण वयोमर्यादा अपूर्ण असली तरी अनेक लग्न होतात, अर्थात बालविवाह

Crime : पत्नीचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल, मित्रावर संशय गेला; पारा चढला अन मित्रानंच मित्राचा काटा काढला

Beed Crime : बीड जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोके वर काढल्याचं चित्र आहे. बीडमध्ये मैत्रीला काळिमा

Pratap Sarnaik : रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी बंधनकारकच; परिवहन मंत्र्यांची ठाम भूमिका; आजच्या बैठकीत काय घडलं ?

(Marathi Language Compulsory Taxi-Auto ) : आगामी 1 मे महाराष्ट्र दिनापासून परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणे अनिवार्य