बुलेट ट्रेनच्या मुहूर्ताची घोषणा!

१५ ऑगस्ट २०२७ ला धावणार, रेल्वे मंत्र्यांची घोषणा


नवी दिल्ली : भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनच्या लोकार्पणाचा मुहूर्त ठरवण्यात आला आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी देशाची पहिली बुलेट ट्रेनची सेवा १५ ऑगस्ट २०२७ पासून सुरू होईल, अशी घोषणा केली आहे.


बुलेट ट्रेनमुळे मुंबईहून अहमदाबाद हे अंतर २ तास ७ मिनिटांत कापता येणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर दर ३० मिनिटांनी ट्रेन पकडता येणार आहे. या प्रकल्पासाठी बीकेसी व शिळफाटादरम्यानच्या २१ किमी लांबीचा बोगदा तयार करण्यात येत आहे. या बोगद्यापैकी ५ किमी लांबीचा बोगदा शिळफाटा व घणसोलीदरम्यान न्यू ऑस्ट्रियन टनलिंग मेथड वापरून बांधला जात आहे, तर उर्वरित १६ किमी लांबीचा बोगदा टनेल बोरिंग मशीन वापरून बांधला जात आहे.


व्यापार, गुंतवणूक, पर्यटनाला चालना मिळणार


या प्रकल्पात जपानचे शिंकान्सेन हाय-स्पीड ट्रेन तंत्रज्ञान वापरले जात आहे. या मार्गावरील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथील मुंबई बुलेट ट्रेन स्टेशन हे मुंबई-अहमदाबाद एचएसआर कॉरिडॉरवरील एकमेव भूमिगत स्टेशन आहे. यासाठी जमिनीखाली ३२.५० मीटर (अंदाजे १०६ फूट) खोलीपर्यंत खोदकाम केले जात असून, या स्टेशनमध्ये प्लॅटफॉर्म, कॉन्कोर्स आणि सर्व्हिस फ्लोअरसह तीन मजले असतील. या बुलेट ट्रेनमुळे मुंबई-अहमदाबादमधील व्यापार, गुंतवणूक व पर्यटनाला चालना मिळणार आहे.


३२०च्या गतीने ५०८ किमी अंतर २ तास ७ मिनिटात पूर्ण होणार


नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या माहितीनुसार, हा बुलेट ट्रेन प्रोजेक्ट ५०८ किमी लांबीचा आहे. यापैकी ३०८ किमीचा भाग हा गुजरातमध्ये आहे, तर १५६ किमीचा भाग हा महाराष्ट्रामध्ये, तर ४ किमीचा भाग हा दादरा नगर हवेली इथे असणार आहे. अहमदाबाद-बुलेट ट्रेनच्या मार्गावर १२ स्टेशन असणार आहेत. या मार्गाचे पहिले स्टेशन हे साबरमती राहील आणि शेवटचे स्टेशन महाराष्ट्रातील मुंबई असेल.

Comments
Add Comment

Tariff Refund : अमेरिकेचा मोठा निर्णय : भारताला मिळू शकतो तब्बल ₹1 लाख कोटींचा टॅरिफ रिफंड!

अमेरिकेत सुरू असलेल्या व्यापार चर्चांदरम्यान भारतासाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. अमेरिकेचे

US-India Trade Deal : अमेरिका-भारत व्यापार करारासाठी भारतीय शिष्टमंडळ या आठवड्यात वॉशिंग्टनला भेट देणार

भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय व्यापार करारासंदर्भातील प्रयत्न आता अंतिम आणि सर्वात महत्त्वाच्या

Manipur Earthquake : मणिपुरमध्ये ५.२ रिश्टर तीव्रतेचा भूकंप; नागरिकांमध्ये घबराट

मणिपुरच्या अनेक भागांमध्ये आज म्हणजेच मंगळवार २१ एप्रिल रोजी पहाटे भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. रिश्टर

Operation Sindoor : “मर्यादा ओलांडू नका, भारत विसरत नाही”; पहलगाम हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्ताने भारतीय लष्कराचे सूचक ट्विट

- भारतीय लष्कराकडून ‘ऑपरेशन सिंदूर’ची आठवण मुंबई : जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ रोजी पाकिस्तानी

Chhattisgarh Plane crashes : डोंगराला धडकून विमानाचा अपघात; वैमानिकांचा मृत्यू

छत्तीसगडच्या जशपूर जिल्ह्यात आज, (सोमवार, २० एप्रिल) भीषण विमान अपघात झाला. नारायणपूर पोलीस ठाणे क्षेत्रातील

India - South Korea Relations : चिप्सपासून जहाजांपर्यंत, भारत-कोरिया मिळून नवीन संधी साकार करतील: पंतप्रधान नरेंद्र मोदी

भारत आणि दक्षिण कोरिया यांनी त्यांच्या व्यापक आर्थिक भागीदारी कराराला (सीईपीए) अद्ययावत करण्यासाठी चर्चा सुरू