ठाण्यात मनसे, उबाठा उमेदावारांचे अर्ज बाद

आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात


ठाणे : ठाणे महानगरपालिका निवडणुकीत राज ठाकरे यांच्या मनसेला आणि उबाठाला मोठा धक्का बसला आहे. उमेदवारी अर्जांच्या छाननीदरम्यान दोन्ही पक्षांच्या प्रत्येकी एका उमेदवाराचा अर्ज अवैध ठरवण्यात आला आहे. यानंतर दोन्ही पक्षांनी निवडणूक प्रक्रियेवर संशय व्यक्त करत गंभीर आरोप केले आहेत. ठाण्यातील प्रभाग क्रमांक १७ मधून शिंदे गटाचे उमेदवार मनोज शिंदे यांच्याविरोधात निवडणूक लढवणाऱ्या उबाठाच्या उमेदवाराचा अर्ज बाद ठरवण्यात आला.


सही नसणे आणि बँक स्टेटमेंट न सादर केल्याचे कारण देत अर्ज अवैध ठरवण्यात आल्याचे संबंधित उमेदवाराने सांगितले. तसेच, छाननीवेळी नवीन प्रतिज्ञापत्र सादर करण्याची संधी देण्यात आली नसल्याचा आरोप त्यांनी केला. “अर्ज भरण्याची मुदत संपायला अवघे दहा मिनिटे असताना मला कागदपत्रे आणायला सांगण्यात आले. मी गरीब घरातून आलो असून माझ्यावर अन्याय झाला,” असा आरोप उमेदवाराने केला. दरम्यान, प्रभाग क्रमांक १८ मधून मनसेच्या उमेदवार प्राची घाडगे यांचाही उमेदवारी अर्ज बाद ठरवण्यात आला आहे. आवश्यक कागदपत्रे उशिरा असल्याचे कारण देत अर्ज अवैध ठरवण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. “आम्ही कागदपत्रे वेळेत आणली होती, मात्र पोलिसांनी आत प्रवेश नाकारला. नंतर आत सोडल्यावर निवडणूक अधिकाऱ्यांनी आमचे म्हणणे ऐकून न घेता अर्ज बाद केला,” असे प्राची घाडगे यांनी सांगितले. या प्रकारावर मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करत त्यांनी संबंधित आरओवर कारवाईची मागणी केली आहे. “फॉर्म डिस्प्ले करण्याची वेळ पाळण्यात आली नाही. जाणून-बुजून आमच्या उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात आले,” असा आरोप जाधव यांनी केला.


तसेच, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी या प्रकरणात खुलासा करावा आणि संबंधित निवडणूक अधिकाऱ्यावर एफआयआर दाखल करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. या घडामोडींमुळे ठाणे मनपा निवडणुकीतील वातावरण चांगलेच तापले आहे.

Comments
Add Comment

Nashik Simhastha Kumbh Mela : सिंहस्थातील बस वाहतूक आणि नियोजनासंदर्भात आढावा बैठक संपन्न

Nashik Simhastha Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणात बुधवारी

Nitesh Rane : रत्नागिरीला मिळणार जागतिक ओळख! भगवती बंदरात अत्याधुनिक क्रुझ टर्मिनलला गती; पर्यटन, रोजगाराला मोठी चालना

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील भगवती बंदर (Bhagwati Port) येथे उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक क्रुझ टर्मिनल (cruise terminal)

Dabur India FSSAI action : डाबर इंडियाला FSSAI चा मोठा दणका! ‘१००% शुद्धतेचे’ दावे करणाऱ्या मध, तुपासह अनेक उत्पादनांच्या विक्रीवर बंदी

नवी दिल्ली : ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आणि दाव्यांविरोधात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक

Nashik Crime : नाशिकरोड-उपनगर हद्दीतील गोळीबार प्रकरणी दोघे ताब्यात

Nashik Crime : नाशिकरोड (Nashik Road Police Station) आणि उपनगर पोलीस ठाण्याच्या (Upnagar Police Station) हद्दीत गोळीबार करून दहशत निर्माण करणाऱ्या दोन

Tuljabhavani Temple Land Case : तुळजाभवानीच्या १,६६८ हेक्टर जमिनींच्या कथित घोटाळ्यावर समिती आक्रमक; 'तातडीने ताबा घ्या, नाहीतर कोर्टात भेटू!'

पुणे : श्री तुळजाभवानी देवस्थानच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील

Devendra Fadnavis : गतिमान भूसंपादन करून औद्योगिक विकासाला चालना द्यावी

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; मुख्यमंत्र्यांनी घेतला एमआयडीसीअंतर्गत प्रकल्पांच्या भूसंपादनाचा आढावा मुंबई