ठाण्यात मनसे, उबाठा उमेदावारांचे अर्ज बाद

आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात


ठाणे : ठाणे महानगरपालिका निवडणुकीत राज ठाकरे यांच्या मनसेला आणि उबाठाला मोठा धक्का बसला आहे. उमेदवारी अर्जांच्या छाननीदरम्यान दोन्ही पक्षांच्या प्रत्येकी एका उमेदवाराचा अर्ज अवैध ठरवण्यात आला आहे. यानंतर दोन्ही पक्षांनी निवडणूक प्रक्रियेवर संशय व्यक्त करत गंभीर आरोप केले आहेत. ठाण्यातील प्रभाग क्रमांक १७ मधून शिंदे गटाचे उमेदवार मनोज शिंदे यांच्याविरोधात निवडणूक लढवणाऱ्या उबाठाच्या उमेदवाराचा अर्ज बाद ठरवण्यात आला.


सही नसणे आणि बँक स्टेटमेंट न सादर केल्याचे कारण देत अर्ज अवैध ठरवण्यात आल्याचे संबंधित उमेदवाराने सांगितले. तसेच, छाननीवेळी नवीन प्रतिज्ञापत्र सादर करण्याची संधी देण्यात आली नसल्याचा आरोप त्यांनी केला. “अर्ज भरण्याची मुदत संपायला अवघे दहा मिनिटे असताना मला कागदपत्रे आणायला सांगण्यात आले. मी गरीब घरातून आलो असून माझ्यावर अन्याय झाला,” असा आरोप उमेदवाराने केला. दरम्यान, प्रभाग क्रमांक १८ मधून मनसेच्या उमेदवार प्राची घाडगे यांचाही उमेदवारी अर्ज बाद ठरवण्यात आला आहे. आवश्यक कागदपत्रे उशिरा असल्याचे कारण देत अर्ज अवैध ठरवण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. “आम्ही कागदपत्रे वेळेत आणली होती, मात्र पोलिसांनी आत प्रवेश नाकारला. नंतर आत सोडल्यावर निवडणूक अधिकाऱ्यांनी आमचे म्हणणे ऐकून न घेता अर्ज बाद केला,” असे प्राची घाडगे यांनी सांगितले. या प्रकारावर मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करत त्यांनी संबंधित आरओवर कारवाईची मागणी केली आहे. “फॉर्म डिस्प्ले करण्याची वेळ पाळण्यात आली नाही. जाणून-बुजून आमच्या उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात आले,” असा आरोप जाधव यांनी केला.


तसेच, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी या प्रकरणात खुलासा करावा आणि संबंधित निवडणूक अधिकाऱ्यावर एफआयआर दाखल करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. या घडामोडींमुळे ठाणे मनपा निवडणुकीतील वातावरण चांगलेच तापले आहे.

Comments
Add Comment

नाशिकच्या पंचवटीत श्री जगन्नाथ रथयात्रेला मोठ्या उत्साहात प्रारंभ; हजारो भाविकांची मांदियाळी

नाशिक: दरवर्षीप्रमाणे यंदाही नाशिक शहराच्या पंचवटी परिसरातील श्री पंचमुखी हनुमान मंदिरातून श्री जगन्नाथ

Nitesh Rane : नवी मुंबई ते सिंधुदुर्ग विमानसेवा १५ ऑगस्टपासून - पालकमंत्री नितेश राणे

- गणेशोत्सवापूर्वी कोकणवासीयांना मोठा दिलासा मुंबई : गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाच, मुंबईत

Nandurbar : भरवस्तीत बिबट्याचा थरार! चार जणांवर हल्ला; चिमुरड्याचा जीव वाचवण्यासाठी ग्रामस्थाने बिबट्याला घरातच कोंडले

Nandurbar : नंदुरबार जिल्ह्यातील शहादा (Shahada) तालुक्यातील होळ मोहिदा गावात थरारक घटना घडली आहे. भरवस्तीत बिबट्या

ISRO scientists resign : मोठी बातमी! गगनयानसारख्या मोहिमांवर काम करणाऱ्या १०० हून अधिक शास्त्रज्ञांनी सोडली 'इस्रो'; राजीनाम्यांचे नियम आता होणार कडक!

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला (ISRO) एका मोठ्या समस्येचा सामना करावा लागत आहे. गगनयानसारख्या देशाच्या अत्यंत

Lohagad Fort Murder Case : लोहगड किल्ला हत्याकांडातील आरोपी सिया गोयलच्या कुटुंबाच्या अडचणीत वाढ; FDA कडून दुकानावर कारवाई!

पुणे : पुण्यातील बहुचर्चित केतन अग्रवाल (वय २५) हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल (वय २०) हिच्या कुटुंबाच्या

Vinayak Raut : विनायक राऊतांना अटक करा! - अंजली दमानिया

सामान्य माणूस असता तर एव्हाना कायद्याचा बडगा उगारला असता मुंबई : उबाठा गटाचे माजी खासदार विनायक राऊत (Vinayak Raut)