मुंबईत महायुतीमधील बंडोबांना थंड करण्यासाठी समन्वयकांची नियुक्ती

अर्ज मागे घेण्याचा उद्याचा शेवटचा दिवस; निष्ठावंत कार्यकर्त्यांना खुद्द मुख्यमंत्र्यांनी केले फोन


मुंबई : अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या मुंबई पालिका निवडणुकीत बंडखोरांनी डोकेदुखी वाढवली असताना, महायुतीने बंडोबांना थंड करण्यासाठी मोठी रणनीती आखली आहे. मुंबईतील सहा जिल्ह्यांत समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्यामार्फत मतफुटी रोखणे, एकमेकांच्या (भाजप-शिवसेना) उमेदवारांच्या प्रभागात मतदान वाढवणे आणि महायुतीच्या एकजुटीचे दर्शन घडवणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे. उद्या(२ जानेवारी) अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने समन्वयकांपुढे जास्तीत जास्त बंडखोरी थोपवण्याचे आव्हान आहे.


भाजपकडून मुंबईतील सहा जिल्ह्यांत (प्रत्येक जिल्ह्यासाठी एक प्रमुख समन्वयक आणि त्यांना सहाय्यक समन्वयक) या नेमणुका करण्यात आल्या आहेत. समन्वयकांचे मुख्य काम दोन्ही पक्षांतील बंडखोरांना शांत करणे, मतविभाजन टाळणे आणि महायुतीच्या उमेदवारांना पूर्ण ताकद देणे आहे. ज्या प्रभागात भाजपचा उमेदवार आहे, तेथे शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची मोट बांधून मतदानाची टक्केवारी वाढवणे, तसेच शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रभागात भाजपची मते वळवणे, यासाठी समन्वयक प्रयत्न करणार आहेत. याशिवाय मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांशी समन्वय साधून प्रचारात त्यांना सहभागी करून घेण्याचे कामही त्यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.




मुख्यमंत्री अ‍ॅक्शन मोडवर
बंडखोरीला आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः मैदानात उतरले आहेत. जुन्या, निष्ठावंत कार्यकर्त्यांशी संवाद साधत मुख्यमंत्र्यांनी भावनिक आवाहन केले. सरकार आपले आहे, महापालिकांमध्येही आपलीच सत्ता येणार आहे. आज न्याय मिळाला नाही, पण भविष्यात नक्कीच मिळेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. उमेदवारी डावललेल्यांना महापालिकेत स्वीकृत सदस्य, जिल्हा, विभागीय, राज्यस्तरीय शासकीय समित्यांवर काम करण्याची संधी, विविध महामंडळांवर पदे किंवा पक्षसंघटनेत महत्त्वाची जबाबदारी देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.




Comments
Add Comment

Mumbai Rain : मुंबईकरांनो सावधान! आज मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा 'यलो अलर्ट'

मुंबई : मुंबई (Mumbai) शहर आणि उपनगरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम असून बुधवारी (२३ जुलै) पावसाची

Maharashtra CM Devendra Fadnavis : महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्याचे शिल्पकार... मा.मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मंत्री नितेश राणे यांनी लिहिलेलं पत्र

Good Hair : केस गळतायत? मग आहारात नक्की समाविष्ट करा 'हे' ८ पदार्थ; केस होतील मजबूत आणि दाट

मुंबई : बदलती जीवनशैली, ताणतणाव, प्रदूषण आणि अयोग्य आहार यामुळे केस गळणे, केस पातळ होणे आणि अकाली पांढरे होणे या

Char Dham Yatra : चार धाम यात्रा तात्पुरत्या स्थगितीनंतर पुन्हा सुरू

नवी दिल्ली : यात्रेच्या मार्गांचा सखोल आढावा घेतल्यानंतर, २० जुलै रोजी सुरक्षेचा उपाय म्हणून तात्पुरती स्थगित

Crime News : सिंगापूरमध्ये बनावट हिऱ्याच्या मदतीने 2 लाख डॉलरच्या हिऱ्याची चोरी; दोन भारतीयांना अटक

नवी दिल्ली : सिंगापूरच्या चायनाटाउनमधील एका दागिन्यांच्या दुकानातून सुमारे 2 लाख सिंगापूर डॉलर (1.54 लाख अमेरिकी

Mantralaya Water : 'मंत्रालयातील पाणी पूर्णपणे सुरक्षित'; टाक्यांची स्वच्छता, वॉटर प्युरिफायर सर्व्हिसिंग पूर्ण, BMCचा अहवाल दिलासा देणारा

मुंबई : मंत्रालयातील पाणीपुरवठ्याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनंतर सार्वजनिक बांधकाम