आज मध्यरात्री उशिरापर्यंत धावणार 'मेट्रो १'

मुंबईकरांना इच्छितस्थळी जाणे सुकर होणार


मुंबई : घाटकोपर,वर्सोवा,अंधेरी मेट्रो-१ मार्गिकेवरील सेवा उद्या बुधवारी, ३१ डिसेंबर रोजी मध्यरात्री उशिरापर्यंत सुरू राहणार आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी बाहेर पडणाऱ्यांना इच्छितस्थळी जाणेयेणे सुकर व्हावे यासाठी मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडने (एमएमओपीएल) बुधवार, ३१ डिसेंबर रोजी 'मेट्रो १' मार्गिकेवरील सेवा कालावधीत वाढ केली आहे. या मार्गिकेवर बुधवारी मेट्रोच्या २८ फेऱ्या वाढविण्यात आल्या असून 'मेट्रो १' मार्गिकेवर बुधवारी मध्यरात्री २.४५ पर्यंत मेट्रो गाड्या धावणार असल्याचे एमएमओपीएलच्यावतीने सांगण्यात आले आहे.


दरवर्षी नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर मोठ्या संख्येने रात्री घराबाहेर पडतात. मुंबईतील समुद्र किनारे, पर्यटन स्थळे आणि इतर ठिकाणी मुंबकरांची प्रचंड गर्दी होते. नागरिकांना इच्छितस्थळी पोहचणे आणि घरी परतणे सोपे व्हावे यासाठी एमएमओसीएलने बुधवार, ३१ जानेवारी रोजी 'मेट्रो १' मार्गिकेवरील फेऱ्या, तसेच सेवा कालावधीत वाढ केली आहे. 'मेट्रो १' मार्गिकेवरील पहिली मेट्रो सकाळी ५.३० वाजता वर्सोवा आणि घाटकोपर येथून सुटते. तर शेवटची गाडी घाटकोपरवरून रात्री ११.५२ वाजता, तर वर्सोव्यावरून रात्री ११.२६ वाजता सुटते. नववर्षाच्या पूर्वसंध्येला होणारा जल्लोष लक्षात घेता बुधवार, ३१ जानेवारी रोजी पहिली गाडी सकाळी ५.३० वाजता घाटकोपर आणि वर्सोव्यावरून सुटणार असून सेवा कालावधीत वाढ करण्यात आल्याने वर्सोव्यावरून शेवटची गाडी बुधवारी मध्यरात्री २.१४ वाजता सुटणार असल्याची माहिती एमएमओसीएलने दिली. तर घाटकोपरवरून शेवटची गाडी बुधवारी मध्यरात्री २.४० वाजता सुटणार आहे. 'मेट्रो १' मार्गिकेवर दररोज नियमित ४७६ फेऱ्या होतात. पण या मार्गिकेवरील बुधवारी २८ फेऱ्या वाढणार असून फेऱ्यांची संख्या ५०४ इतकी असेल. बुधवारी गर्दीच्या वेळी दर ३ मिनिट २० सेकेंदांनी, तर गर्दी नसताना दर ५ मिनिट ५५ सेकेंदांनी मेट्रो गाड्या धावणार आहेत. तर बुधवारी मध्यरात्री १२ नंतर सुटणाऱ्या गाड्या दर १२ मिनिटांनी धावणार असल्याचेही एमएमओसीएलकडून सांगण्यात आले. नव वर्षाच्या स्वागतासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांसाठी ही बाब दिलासादायक असणार आहे. दरम्यान, लोकल, बेस्ट बसच्या विशेष फेऱ्या ३१ जानेवारी रोजी धावणार आहेत. 'आरे – कफ परेड भुयारी मेट्रो ३' मार्गिका दिवस-रात्र धावणार आहे. त्यामुळे नववर्षाच्या स्वागतासाठी बाहेर पडणाऱ्यांची मोठी सोय होणार आहे.

Comments
Add Comment

दादरमध्ये सलग चौथ्या दिवशी कारवाई जोरात

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्यावतीने सध्या फेरीवाल्यांविरोधात प्रत्येक विभागात धडक कारवाई सुरु

मुंबईची खड्डेमुक्तीच्या दिशेने वाटचाल, आतापर्यंत ६३ टक्के सिमेंट काँक्रिटच्या रस्त्याची कामे पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : ‘खड्डेमुक्त मुंबई’ या महत्त्वाकांक्षी ध्येयाकडे वाटचाल करत मुंबई महानगरपालिकेच्या

पालकमंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे सादर केला सिंधुदुर्ग जिल्ह्याचा ६०० कोटींचा प्रारूप आराखडा

मुंबई : राज्याच्या वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२६-२७ च्या प्रारूप आराखड्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी माननीय

सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन निधीत भरीव वाढ करण्याची पालकमंत्री नितेश राणे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

जिल्हा वार्षिक योजना २०२६-२७ च्या राज्यस्तरीय बैठकीत सिंधुदुर्गातील विकासकामांचा मुख्यमंत्र्यांसमोर

वर्ल्ड क्लास मुंबईसाठी सर्वसमावेशक अ‍ॅक्शन प्लॅन

मुंबई : मुंबईला ड्रग्स-फ्री, झोपडपट्टीमुक्त व अतिक्रमणमुक्त करून जागतिक दर्जाचे शहर बनवण्यासाठी राज्य सरकारने

अपात्र ठरलेल्या ९०० संस्थांवर विभागाची कारवाई; दिव्यांग क्षेत्रातील संस्थांसाठी नोंदणी बंधनकारक

मुंबई : राज्यात दिव्यांग व्यक्ती अधिनियम अंतर्गत दिव्यांगासाठी कार्यरत संस्थांना दिव्यांग कल्याण आयुक्त