भारताचे मिशन ‘क्लीन स्वीप’ यशस्वी

हरमनप्रीतच्या ६८ धावा; मालिका ५-० ने खिशात


तिरुवनंतपुरम : भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना तिरुवनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड स्टेडियममध्ये पार पडला. या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या डावात भारतीय संघाला सुरुवातीला मोठे धक्के बसले होते. पण हरमनप्रीत कौरच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर भारतीय संघाने ७ गडी बाद १७५ धावांपर्यंत मजल मारली. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेकडून हसिनी परेरा आणि इमेशा दुलानीने दमदार अर्धशतकं झळकावली. पण श्रीलंकेचा संघ विजयापासून १५ धावा दूर राहिला. ही मालिका भारतीय संघाने ५-० ने आपल्या नावावर केली.


या सामन्यात श्रीलंकेला विजयासाठी १७५ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या श्रीलंकेला सुरूवातीलाच मोठा धक्का बसला. संघाची कर्णधार चमारी अटापटू अवघ्या २ धावांवर माघारी परतली. हसिनी परेराने ६५ धावांची खेळी केली. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या इमेशा दुलानीने ५० धावांची खेळी केली. तर निलाक्षी डी सिल्वा अवघ्या ३ आणि कविशा दिल्हारीने ५ धावांवर माघारी परतली. शेवटी


या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले होते. या सामन्यात स्मृती मानधनाला विश्रांती देण्यात आली. तिच्या जागी जी कमलिनीचा संघात समावेश करण्यात आला होता. पण तिला या संधीचा फायदा घेता आला नाही. कमलिनी अवघ्या १२ धावा करत माघारी परतली. तर गेल्या २ सामन्यांत लागोपाठ अर्धशतक झळकावणारी शफाली वर्मा अवघ्या ५ धावा करत माघारी परतली. हरलीन देओलला अवघ्या १३ धावा करता आल्या. भारतीय संघाला सुरुवातीलाच मोठे धक्के बसले होते. पण कर्णधार हरमनप्रीत कौरने एक बाजू धरून ठेवली होती. हरमनप्रीतने ६८ धावांची दमदार खेळी केली. मोठे फटके खेळण्यासाठी ओळखली जाणारी ऋचा घोष या सामन्यात अवघ्या ५ तर दीप्ती शर्मा अवघ्या ७ धावांवर माघारी परतली.हरमनप्रीत कौरने अमनजोत कौरसोबत मिळून महत्त्वपूर्ण भागीदारी केली. तिने २१ धावा केल्या. तर शेवटी अरूंधती रेड्डीने नाबाद २७ धावा करत संघाची धावसंख्या ७ गडी बाद १७५ धावांपर्यंत पोहोचवली.


भारतीय संघाने मारली बाजी : येत्या काही महिन्यात भारतीय संघ टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धा खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. त्यामुळे प्रत्येक मालिका ही सरावाच्या दृष्टीने भारतीय संघासाठी अतिशय महत्वाची असणार आहे. श्रीलंकेविरूद्ध झालेल्या सामन्यात भारतीय संघाने दमदार खेळ केला. पाचही सामन्यांत फलंदाज आणि गोलंदाजांनी आपली भूमिका योग्यरीत्या पार पाडली. यासह भारतीय संघाने ही मालिका ५-० ने आपल्या नावावर करून वर्षाचा शेवट गोड केला आहे.


संक्षिप्त धावफलक :


भारत महिला : २० षटकांत १७५/७


श्रीलंका महिला : २० षटकांत १६०/५

Comments
Add Comment

T20 World Cup 2026 NZ vs Can: कॅनडाला हरवत न्यूझीलंड संघाचा दिमाखात 'सुपर ८' मध्ये प्रवेश

चेन्नई: आज १७ फेब्रुवारी रोजी चेन्नईमध्ये झालेल्या न्यूझीलंड विरुद्ध कॅनडा या मॅचमध्ये ग्लेन फिलिप्सने

BBC ISWOTY 2025: महाराष्ट्राच्या मुलीचा 'बीबीसी'कडून मोठा सन्मान; ठरली 'इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द ईयर'ची मानकरी

नवी दिल्ली: महाराष्ट्राची लाडकी आणि भारताची सुपरस्टार उपकर्णधार स्मृती मानधना हीचा बीबीसी कडून मोठा सन्मान

ऑस्ट्रेलियाला नमवित श्रीलंकेचा सुपर ८मध्ये प्रवेश, पथुम निसांकाच्या वादळी शतकी खेळीने कांगारुंचा पराभव

नवी दिल्ली  : टी२० वर्ल्डकप स्पर्धेच्या ३०व्या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका हे संघ आमनेसामने आले होते. या

इंग्लंडचा इटलीवर २४ धावांनी विजय

नवी दिल्ली  : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या सुपर ८ मध्येप्रवेश करणारा इंग्लंड हा चौथा संघ ठरला आहे. क गटातून

अफगाणिस्तानने संयुक्त अरब अमीरातला दाखविले आसमान

ओमरझाईचे चार बळी, इब्राहिम झद्रानच्या अर्धशतकी खेळीने मिळाला विजय नवी दिल्ली : मुख्य गोलंदाज अझमतुल्ला

टी-२० मध्ये रशीद खानचा ७०० बळींचा वर्ल्ड रेकॉर्ड!

ऐतिहासिक पराक्रम करणारा जगातील पहिला गोलंदाज मुंबई  : टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये सोमवारी पहिला सामना अफगाणिस्तान