भारत-पाकिस्तान संघर्षामधील मध्यस्थीचा आणखी एक दावेदार, चीनचा दावा भारताने फेटाळला

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील तहशतवादी तळ उध्वस्त केले होते. यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात संघर्ष पेटला होता. हा संघर्ष संपवण्यात मध्यस्थी केल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. मात्र भारताने हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला. दरम्यान यानंतर आता चीनने देखील आपण भारत आणि पाकिस्तान यांच्यात या संघर्षाच्या काळात मध्यस्थी केल्याचा दावा केला आहे. भारताने चीनचा दावा देखील पूर्णपणे फेटाळून लावला असून शस्त्रविरामाच्या निर्णयामध्ये कोणत्याही तिसऱ्या पक्षाचा हस्तक्षेप नव्हता, असे स्पष्ट करण्यात आले आहे.


ऑपरेशन सिंदूर नंतर १० मे रोजी दोन्ही देशांच्या डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेश्न्समध्ये (डीजीएमओ) थेट चर्चा झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रविराम जाहीर करण्यात आला, असे भारताकडून वारंवार सांगण्यात आले आहे. आम्ही यापूर्वीच असे दावे फेटाळले आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय मुद्द्यावर तिसऱ्या पक्षाची कसलीही भूमिका नाही. दोन देशांच्या डीजीएमओमध्ये झालेल्या थेट चर्चेनंतर शस्त्रविरामावर एकमत झाले, ही आपली भूमिका यापूर्वीही अनेकदा स्पष्ट करण्यात आलेली आहे.


चीनचे पराराष्ट्रमंत्री वांग यी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याप्रमाने चीनने मे महिन्यात झालेल्या भारत-पाकिस्तान संघर्षास अनेक जागतिक संघर्षामध्ये मध्यस्थी केल्याचा दावा केल्यानंतर यावर भारताकडून ही प्रतिक्रिया देण्यात आली आहे. भारत-पाकिस्तान युद्धबंदीसाठी आम्ही मध्यस्थी केल्याचा दावा चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी चीनच्या परराष्ट्र संबंधांवरील परिसंवादात बोलताना केला आहे. शाश्वत शांतता प्रस्थापित करण्यासाठी आम्ही एक वस्तुनिष्ठ आणि तर्कसंगत दृष्टिकोन स्वीकारला आहे. संघर्षाचे प्रश्न सोडवण्यासाठी चीनच्या या दृष्टिकोनाचा अवलंब करून आम्ही उत्तर म्यानमार, इराणचा आण्विक प्रश्न, पाकिस्तान आणि भारत यांच्यातील तणाव, यासारखे प्रश्न सोडवले. पाकिस्तान आणि भारत यांच्यातील तणाव, पॅलेस्टाईन आणि इस्रायलमधील समस्या आणि कंबोडिया आणि थायलंडमधील संघर्षात मध्यस्थी केली, असा दावा चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी केला आहे. दरम्यान, भारत-पाकिस्तान युद्धबंदीसाठी तिसऱ्या पक्षाच्या हस्तक्षेपाला भारताने वारंवार नकार देत या संदर्भातील सर्वच दावे फेटाळून लावलेले आहेत.

Comments
Add Comment

बिहारच्या रस्ते विकासासाठी २०२६ ठरणार महत्त्वाचे! केंद्र सरकाने दिला महामार्गाला हिरवा कंदील

बिहार: बिहारच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी २०२६ हे वर्ष महत्त्वाचे ठरणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या

Bullet Train : "बुलेट ट्रेनचा मुहूर्त ठरला! १५ ऑगस्ट... पहिली गाडी 'या' मार्गावर धावणार; मुंबईत कधी?

मुंबई : भारताचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामाला मुंबईत अनपेक्षित खीळ

Cigarette Price Increase in India : चहा-सुट्टाचा प्लॅन आता 'महागात' पडणार! एका सिगरेटसाठी तब्बल ७२ रुपये? काय आहे सरकारचा नवा नियम

७ वर्षांनंतर उत्पादन शुल्कात मोठी वाढ नवी दिल्ली : देशातील तंबाखूजन्य पदार्थांच्या किमतीत १ फेब्रुवारी २०२६

Explosion In Himachal Pradesh : हिमाचलमध्ये नववर्षाची सुरुवात हादरवणारी! नालागढमध्ये शक्तिशाली स्फोट, आर्मी हॉस्पिटलच्या काचांचा पडला खच

सोलन : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नालागढ

Vande Bharat Sleeper Train Route : ठरलं! देशातील पहिली ‘वंदे भारत स्लीपर’ ट्रेन ‘या’ मार्गावर धावणार; प्रवाशांची प्रतीक्षा संपली!

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणाने आता एक मोठी झेप घेतली असून, देशातील पहिल्या 'वंदे भारत स्लीपर'

नववर्षात 'या' पाच राज्यात होणार निवडणूकांची रणधुमाळी! सर्व पक्षांनी केली तयारीला सुरुवात

नवी दिल्ली: राजकीय घटनांबाबत गतवर्षात बऱ्याच चांगल्या वाईट गोष्टींचा अनुभव देशाने घेतला. राज्यांनुसार