Ahmedabad Toodler Death : डोशाच विषारी पीठ की जाणीवपूर्व केलेला विषप्रयोग ? पोलिसांचा संशय बळावला

अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबादमधील चांदखेडा येथे झालेल्या दुहेरी मृत्यूने सर्वाना धक्का बसला आहे. एकाच कुटुंबातील दोन चिमुरड्या बहिणींचा मृत्यू झाल्याचे सगळीकडे खळबळ उडाली आहे. निमित्त ठरल बाहेरून आणलेले डोशाच पीठ. आईने डोसे केले घरात सर्वानी ते खाल्ले आणि त्याच डोश्यानी त्यांना मृत्यूच्या दाढेत ढकलले, परंतु पोलिसांना मृत्यूचे वेगळेच धागेदोरे सापडले असून यातून अनेक खुलासे बाहेर येण्याची शक्यता आहे.



नेमकं घडलं काय ?


१ एप्रिलला मुलींचे वडील विमल प्रजापती यांनी डेअरीतून डोशाच पीठ आणल. त्याच दिवशी त्यांनी रात्री डोसे करून खाल्ले. त्यानंतर त्यांची तब्बेत बिघडली परंतु प्राथमिक उपचार घेत ते बरे देखील झाले, पण पुन्हा ३ आणि ४ एप्रिलला त्यांना त्रास जाणवू लागला, मुलींना उलट्या झाल्या, प्रकृती झपाट्याने खालावली, लहान मुलीला तीव्र झटके येऊ लागले म्हणून तिला रुग्णालयात दाखल केले, उपचारादरम्यान तिचा ४ एप्रिलला मृत्यू झाला. आणि ५ एप्रिलला मिश्रीचा मृत्यू झाला.



दोन शक्यता वर्तवण्यात येत आहेत


१. पीठ नासले म्हणून 


डेअरी मालक केतन पटेल यांच्या सांगण्यानुसार ते सारखेच पीठ त्याने जवळपास २०० लोकांना दिले, शिवाय आमच्या कुटुंबाने देखील खाल्ले त्यापैकी एकाचीही अशी कोणतीच तक्रार आली नाही. कुटुंबाने रात्री डोसे करून पुन्हा दुसऱ्या दिवशी त्या पिठाचे डोसे खाल्ले तेव्हा ते पीठ नासले असण्याची शक्यता असून ते खाल्ल्यामुळे चिमुरडीचा मृत्यू झाला असावा




२. विषबाधा केल्याचा संशय


कारण ३ महिन्यांची राहा केवळ आईचे दूध पीत असल्याने तिने डोसा खाल्ल्याची शक्यात तर मुळीच नाही, तरीही तिची प्रकृती खालावली, जर स्तनपानामुळे तिच्यावर परिणाम झाला असेल तर तिच्या आईची प्रकृती देखील गंभीर असली असती. परंतु आई वडिलांची प्रकृती ही चिंताजनक नसल्याने
या विषयाला अनेक फाटे फुकट आहेत.


डेअरीमधून ३ किलो पीठ खरेदी करण्यात आले, परंतु त्यातील केवळ छोटासा भाग खाण्यात आला, ज्यामुळे तपासात आणखी गुंतागुंत निर्माण झाली आहे .


दरम्यान अपघाती मृत्यू अशी नोंद करण्यात आली असून विविध बाजूनी तपासा सुरु आहे, आता पुढील निष्कर्ष न्यायवैद्क अहवालावर अवलंबून आहे. असे पोलीस निरीक्षकांनी स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

Bhandup News : आधी बाबा गेले, आता आईची साथ सुटली; मुलीने मुखाग्नी देत निभावले अंतिम कर्तव्य, भांडुपवासीयांचे डोळे पाणावले

रत्नागिरी : नियतीचा खेळ अथांग आणि अतिशय निष्ठूर असतो, याचाच प्रत्यय आणून देणारी एक दुःखद घटना मुंबईतील भांडुप

12th BRICS Meeting : नवी दिल्लीत आज १२वी BRICS पर्यावरण मंत्रिस्तरीय बैठक; हवामान बदल आणि पर्यावरणीय सहकार्यावर होणार मंथन

नवी दिल्ली : भारताच्या BRICS अध्यक्षतेअंतर्गत १२वी BRICS पर्यावरण मंत्रिस्तरीय बैठक आज नवी दिल्लीत आयोजित करण्यात

Gwalior Accident : मध्य प्रदेशात भीषण अपघात; मजुरांच्या वाहनाला ट्रकची धडक, 8 जणांचा मृत्यू

Pritesh Walia : भारतीय वंशाचे जॅझ संगीतकार प्रितेश वालिया अमेरिकेत ICEच्या ताब्यातून जामिनावर मुक्त

नवी दिल्ली :  भारतीय वंशाचे जॅझ संगीतकार प्रितेश वालिया यांची अमेरिकेत ICEच्या ताब्यात तब्बल 14 दिवस राहिल्यानंतर

Jharkhand Students Protest : 24 दिवसांच्या आंदोलनानंतर झारखंड सरकारचा मोठा निर्णय; JSSC-CGL परीक्षा रद्द

झारखंड : झारखंडमध्ये तब्बल 24 दिवसांपासून सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. मुख्यमंत्री

Plastic Waste : भारतापुढे दररोज १९ हजार टन प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे आव्हान

नवी दिल्ली : दुधाची पाकिटे, चिप्सची वेष्टणे आणि ऑनलाइन खरेदीचे पॅकेजिंग यामुळे देशात दररोज सुमारे १९ हजार टन