ठाकरे गटाच्या ३५ उमेदवारांचे अर्ज धोक्यात, भाजपचा स्कॅन सह्यांवर आक्षेप

जळगाव : जळगाव महापालिका निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात ठाकरे गट आणि भाजप-शिंदे गट यांच्यात कायदेशीर संघर्ष तीव्र झाला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या तब्बल ३५ उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता निर्माण झाली असून, भाजपने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जोरदार आक्षेप नोंदवला आहे.


भाजपचा दावा आहे की ठाकरे गटाच्या ३५ उमेदवारांनी उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या एबी फॉर्मवर मूळ सही नसून स्कॅन केलेली सही वापरण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार एबी फॉर्मवर पक्षाच्या अधिकृत स्वाक्षरी कर्त्याची मूळ सही आवश्यक असून, स्कॅन किंवा फोटोकॉपी केलेली सही वैध धरली जात नाही.


भाजपचे उमेदवार अरविंद देशमुख यांच्यासह इतर उमेदवारांनी हा आक्षेप घेतला असून, हे सर्व अर्ज तांत्रिक कारणावरून बाद करण्यात यावेत, अशी मागणी केली आहे. या वादात शिवसेना शिंदे गटानेही उडी घेत भाजपच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला आहे. नियम सर्व पक्षांसाठी समान असले पाहिजेत, असे म्हणत स्कॅन सही असलेले अर्ज फेटाळले जावेत, अशी भूमिका शिंदे गटाने मांडली आहे.


दरम्यान , या आक्षेपांवर निवडणूक निर्णय अधिकारी काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ३१ डिसेंबर रोजी होणाऱ्या छाननीत या प्रकरणावर अंतिम शिक्का बसणार आहे. जर ठाकरे गटाचे अर्ज बाद झाले, तर जळगाव महापालिका निवडणुकीत त्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता असून भाजप-शिंदे गटासाठी मार्ग सुकर होऊ शकतो.

Comments
Add Comment

भारत-पाकिस्तान संघर्षामधील मध्यस्थीचा आणखी एक दावेदार, चीनचा दावा भारताने फेटाळला

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत

‘जर्मन बेकरी’प्रकरणातील आरोपी बंटी जहागिरदार याचा गोळीबारात मृत्यू

श्रीरामपूर : पुण्यातील गाजलेल्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी अस्लम शेख उर्फ बंटी जहागिरदार

नूतन वर्ष महाराष्ट्राचे, महाराष्ट्राच्या समृद्धीचे, विकासाचे नवपर्व आणणारे

नवर्षप्रारंभाच्या पूर्वसंध्येला दिल्या शुभेच्छा मुंबई : - नूतन वर्ष महाराष्ट्राचे, महाराष्ट्राच्या समृद्धीचे,

ओडिशाच्या किनाऱ्यावरून एकाच लाँचरमधून लागोपाठ दोन प्रलय क्षेपणास्त्रांचे यशस्वी प्रक्षेपण

हैद्राबाद : संरक्षण क्षेत्रात भारताने आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने

केंद्रीय मंत्रिमंडळाची नाशिक-सोलापूर-अक्कलकोट या सहा पदरी ग्रीनफील्ड कॉरिडॉरला मंजुरी

नवी दिल्ली :  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ

२९ महापालिकांच्या निवडणुकीत तब्बल ३३ हजार ६०६ अर्ज

एका जागेसाठी सरासरी १२ उमेदवार रिंगणात; पुण्यात सर्वाधिक चुरस, मुंबईत अडीच हजार उमेदवार मुंबई : राज्यातील २९