ठाकरे गटाच्या ३५ उमेदवारांचे अर्ज धोक्यात, भाजपचा स्कॅन सह्यांवर आक्षेप

जळगाव : जळगाव महापालिका निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात ठाकरे गट आणि भाजप-शिंदे गट यांच्यात कायदेशीर संघर्ष तीव्र झाला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या तब्बल ३५ उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता निर्माण झाली असून, भाजपने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जोरदार आक्षेप नोंदवला आहे.


भाजपचा दावा आहे की ठाकरे गटाच्या ३५ उमेदवारांनी उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या एबी फॉर्मवर मूळ सही नसून स्कॅन केलेली सही वापरण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार एबी फॉर्मवर पक्षाच्या अधिकृत स्वाक्षरी कर्त्याची मूळ सही आवश्यक असून, स्कॅन किंवा फोटोकॉपी केलेली सही वैध धरली जात नाही.


भाजपचे उमेदवार अरविंद देशमुख यांच्यासह इतर उमेदवारांनी हा आक्षेप घेतला असून, हे सर्व अर्ज तांत्रिक कारणावरून बाद करण्यात यावेत, अशी मागणी केली आहे. या वादात शिवसेना शिंदे गटानेही उडी घेत भाजपच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला आहे. नियम सर्व पक्षांसाठी समान असले पाहिजेत, असे म्हणत स्कॅन सही असलेले अर्ज फेटाळले जावेत, अशी भूमिका शिंदे गटाने मांडली आहे.


दरम्यान , या आक्षेपांवर निवडणूक निर्णय अधिकारी काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ३१ डिसेंबर रोजी होणाऱ्या छाननीत या प्रकरणावर अंतिम शिक्का बसणार आहे. जर ठाकरे गटाचे अर्ज बाद झाले, तर जळगाव महापालिका निवडणुकीत त्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता असून भाजप-शिंदे गटासाठी मार्ग सुकर होऊ शकतो.

Comments
Add Comment

Maha Budget 2026 : राज्याचा ४० हजार ५५२ कोटींच्या तुटीचा अर्थसंकल्प

राजकोषीय तूट १ लाख ५० हजार ४९१ कोटींवर; महसूल वाढीचा वेग कायम असल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा मुंबई : यशवंतराव

पुणे आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी तरतूद

पुणे : पुणे मेट्रोचा दुसरा टप्पा, खडकवासला-स्वारगेट-हडपसर-लोणी काळभोर मार्ग आणि पुणे ते शिरूर ५३ किमीचा उन्नत

जुनी वाहने स्क्रॅप केल्यास नवीन वाहनावर ३० टक्क्यांपर्यंत सवलत

अर्थसंकल्पात घोषणा; प्रदुषणकारी वाहनांच्या 'पर्यावरण करा'त दुप्पट वाढ मुंबई : वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण

मुंबईत २० लाख झोपड्यांचा पुनर्विकास, १० लाख परवडणारी घरे बांधणार - वडाळ्यात 'तिसरी मुंबई' आकाराला येणार

अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांवर भर ; वडाळ्यात जागतिक दर्जाचे 'स्टार्टअप हब', मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाचा

Maha Budget 2026 : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा या लोकांना मिळणार लाभ

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत राज्याचा २०२६ - २७ आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला.

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीसाठी सिंधुरत्न समृद्ध २.० योजना - राज्यात १८ अतिविशाल औद्योगिक केंद्र उभारणार

प्रत्येक जिल्ह्यात सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग केंद्र उभारणार मुंबई : सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन