राष्ट्रपतींचा 'आयएनएस वाघशीर'मधून प्रवास

मुंबई : भारतीय सशस्त्र दलांच्या सर्वोच्च कमांडर आणि भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रविवारी अरबी समुद्रात 'आयएनएस वाघशीर' या पाणबुडीतून प्रवास करत एक नवा इतिहास रचला. कर्नाटकच्या कारवार नौदल तळावरून त्यांनी या मोहिमेला सुरुवात केली. सुमारे दोन तास चाललेल्या या सफरीदरम्यान राष्ट्रपतींनी समुद्राच्या खोलीत जाऊन नौदलाच्या सायलेंट आर्म म्हणजेच पाणबुडी विभागाच्या कार्यक्षमतेचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.


पाणबुडीतून प्रवास करणाऱ्या द्रौपदी मुर्मू या भारताच्या दुसऱ्या राष्ट्रपती ठरल्या आहेत. यापूर्वी माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी असा प्रवास केला होता. या ऐतिहासिक प्रसंगी नौदलप्रमुख ॲडमिरल दिनेश के. त्रिपाठी त्यांच्यासोबत उपस्थित होते. स्वदेशी बनावटीच्या कलवरी श्रेणीतील या पाणबुडीवर राष्ट्रपतींचे आगमन होणे, हे भारतीय नौदलाच्या आत्मनिर्भरतेचे प्रतीक मानले जात आहे.


या दोन तासांच्या मोहिमेत राष्ट्रपतींनी पाणबुडीतील विविध तांत्रिक बाबी समजून घेतल्या. त्यांनी पाणबुडीतील क्रू मेंबर्सशी संवाद साधून त्यांच्या खडतर जीवनाची माहिती घेतली. यावेळी नौदलाने विविध ऑपरेशनल प्रात्यक्षिके सादर केली. यामध्ये यशस्वी गोळीबार आणि आव्हानात्मक मोहिमांचा समावेश होता. राष्ट्रपतींनी व्हिजिटर्स बुकमध्ये आपला अनुभव नोंदवताना लिहिले की, आयएनएस वाघशीरवरील शिस्त, आत्मविश्वास आणि उत्साह पाहून मला खात्री पटली आहे की, आपले नौदल कोणत्याही संकटाचा सामना करण्यास पूर्णपणे सज्ज आहे.


आयएनएस वाघशीर ही प्रोजेक्ट ७५ अंतर्गत बांधलेली सहावी आणि शेवटची स्कॉर्पिन श्रेणीतील डिझेल इलेक्ट्रिक पाणबुडी आहे. ही पाणबुडी पृष्ठभागावरील युद्ध, पाणबुडीविरोधी युद्ध, गुप्तचर माहिती गोळा करणे आणि पाळत ठेवणे अशा बहुआयामी मोहिमा पार पाडण्यास सक्षम आहे. तिचे 'वीरता वर्चस्व विजया' हे ब्रीदवाक्य तिच्या शौर्याची साक्ष देते.

Comments
Add Comment

मुंबईतील जन्म, मृत्यू प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेचे ऑडिट, भाजपाने का केली मागणी?

मुंबई: मुंबईत बोगस जन्म प्रमाणपत्रे दिली जात असल्याचे प्रकार निदर्शनास आल्याने जन्म नोंदणी व जन्म प्रमाणपत्र

कडक शिस्तीच्या महापौर बाई, जेव्हा सभागृहात किशोरी पेडणेकर यांना चिडीचूप करतात तेव्हा...

मुंबई: मुंबई महापालिकेत उबाठाला आता २५ वर्षांनंतर विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आली आहे. मात्र, या विरोधी बाकांवर

इराणप्रश्नी भारताने ठाम भूमिका घ्यायला हवी होती; राज ठाकरेंचे वक्तव्य

मुंबई: "इराणने दीर्घकाळ भारताला साथ दिली. आता त्या देशावर हल्ले होत असताना भारतानेही ठामपणे पाठिंबा द्यायला हवा

दिल्लीत झळकलेला महाराष्ट्राचा मानाचा चित्ररथ आता गिरगावात!

- कर्तव्यपथावर झळकलेल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा मुंबईकरांना प्रत्यक्ष अनुभव मुंबई : नवी दिल्ली

गुढीपाडव्याच्या दिवशी बीकेसी पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मुंबई: मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत बीकेसीच्या पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मिठी नदीच्या सफाईसाठी कुणी कंपनी पुढे येईना; स्थायी समितीत सविस्तर निवेदन करण्याचे अध्यक्षांचे प्रशासनाचे निर्देश

मुंबई: मुंबईतील मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी नव्याने कंत्राटदार नियुक्त करण्यासाठी मागवलेल्या निविदेला