स्नेहल जाधवांचा मनसेला 'जय महाराष्ट्र'

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) सरचिटणीस स्नेहल जाधव यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व जबाबदाऱ्यांचा राजीनामा दिला आहे. वॉर्ड क्रमांक १९२ मधून उमेदवारी जाहीर करताना विश्वासात न घेतल्याने त्या नाराज असल्याची माहिती आहे. स्नेहल जाधव या आपल्या कार्यकर्त्यांसह एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याची शक्यता असून त्या शिंदेंच्या शिवसेनेत सामील होतील असे समजते.

आपल्या राजकीय कारकिर्दीत स्नेहल जाधव यांनी १९९२ ते १९९७ तसेच १९९७ ते २००२ आणि २००२ ते २००७ या कालावधीत सलग तीन वेळा नगरसेविका म्हणून यशस्वी प्रतिनिधित्व केले. त्यानंतर २००७ ते २०१२ या कालावधीत त्यांचे पती नगरसेवक म्हणून निवडून आले होते. वॉर्ड क्रमांक १९२ मधून कुटुंबाने सलग चार वेळा नगरसेवकपदाची निवडणूक जिंकूनही मनसेकडून उमेदवारी नाकारण्यात आल्याने स्नेहल जाधव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. स्थानिक पातळीवर जनतेशी थेट संपर्क ठेवत विकासकामांचा पाठपुरावा करणाऱ्या स्नेहल जाधव यांना पक्षाकडून अपेक्षित सन्मान व न्याय न मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळेच त्यांनी मनसेला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. या राजीनाम्यामुळे वॉर्ड क्रमांक १९२ सह मुंबईच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना आणि घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे.
Comments
Add Comment

Operation Antim Prahaar अंतर्गत ८ नक्षलवाद्यांना अटक, गडचिरोली जिल्हा अखेर नक्षलमुक्त

गडचिरोली : नक्षलवादी चळवळीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी गडचिरोली पोलिसांनी राबविलेल्या 'ऑपरेशन अंतिम प्रहार' या

NCP : पटेल, तटकरे पदावर कायम, राष्ट्रवादी काँग्रेस लवकरच निवडणूक आयोगाला नवीन पत्र पाठवणार

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत बदलांबाबत सुरू असलेल्या मोठ्या राजकीय चर्चांना पूर्णविराम

Rain Update : वेळेआधीच मान्सून अंदमानात, महाराष्ट्रात २ ते ५ जून दरम्यान पावसाच्या आगमनाचा अंदाज

मुंबई : देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. यंदा 'अल निनो'चे

Weather Alert : मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमध्ये उष्णतेची लाट

मुंबई : राज्यात सध्या एकीकडे अवकाळी पाऊस तर दुसरीकडे कडाक्याचे ऊन अशी दुहेरी हवामान स्थिती पाहायला मिळत आहे. याच

Modi : सध्याचे दशक अनिश्चितता, जागतिक संकटाचे

नेदरलँड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी आपल्या नेदरलँड्स दौऱ्यादरम्यान द हेग येथे भारतीय समुदायाला

Education : १ जुलैपासून इयत्ता ९ वी आणि १० वीसाठी तीन भाषा अनिवार्य, CBSE चा निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून इयत्ता ९ वी आणि १० वीच्या भाषा