नीता अंबानी यांनी सुरू केले कर्करोग व डायलिसिस केंद्र

मुंबई (प्रतिनिधी) : रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक व अध्यक्षा नीता अंबानी यांनी कर्करोग रुग्णांसाठी रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलच्या ‘जीवन’ या नव्या शाखेचे उद्घाटन केले. हे रुग्णालय त्यांनी आपल्या दिवंगत वडील रवींद्रभाई दलाल यांच्या स्मरणार्थ समर्पित केले. उद्घाटनप्रसंगी मुकेश अंबानी उपस्थित होते. यावेळी पूर्णिमा दलाल, ममता दलाल तसेच अंबानी कुटुंबातील इतर सदस्यांनीही सहभाग घेतला. रुग्णालयाच्या उद्घाटनावेळी नीता अंबानी यांनी म्हटले की, ‘जीवन’ हे माझ्या वडिलांना अर्पण केलेले एक श्रद्धास्थान आहे. त्यांनी मला नेहमी सेवा आणि करुणेचे महत्त्व शिकवले. समाजाची निस्वार्थ सेवा हीच खरी भक्ती असल्याचा संस्कार त्यांनी माझ्यावर केला. मुंबईतील रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलच्या १०व्या वर्धापन दिनानिमित्त नव्या शाखेची पायाभरणी करण्यात आली. रुग्णालयाच्या नव्या विभागात केमोथेरपीसह अत्याधुनिक कर्करोग उपचार सुविधा तसेच डायलिसिस सेवाही येथे दिली जाणार असून मुलांसाठी स्वतंत्र केमोथेरपी वॉर्ड आहे.
Comments
Add Comment

Mumbai Local : आता बिनधास्त प्रवास करा, महिलांच्या सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा दलानं सुरू केला 'हा' नवा उपक्रम

मुंबई : लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांना आता घाबरण्याची गरज नाही कारण चर्चगेट ते डहाणू दरम्यान लोकलनं प्रवास

Smruti Mandhana And Palash muchhal : स्मृती मानधना–पलाश मुच्छल पुन्हा एकत्र? बांद्र्यातील 'त्या' व्हिडिओने चर्चांना उधाण

मुंबई : भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांच्या नात्याबाबत पुन्हा एकदा चर्चांना

Ramdas Athawale : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची भेट

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल महामहीम जिष्णू देव वर्मा यांची रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय

Bhondubaba Ashok Kharat : भोंदू खरातविरोधात तक्रारींचा महापूर, लैंगिक शोषणाचे आणखी ११ आरोप

मुंबई : वासनांध अशोक खरात प्रकरण दिवसेंदिवस अधिक गंभीर होत असून, तक्रारींची संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे.

Bmc News, Andheri Subway : अंधेरी सब वे मधील पावसाचे तुंबणारे पाणी,  महापौरांनी  रेल्वेशी समन्वय राखून गती देण्याचे महापालिकेला दिले निर्देश

मुंबई : अंधेरी भूयारी मार्ग हा अतिसखल परिसर असल्याने पावसाळ्यात पाणी साचून वाहतुकीला अडथळा होतो. त्यावर

Bmc News : मुंबईत यापूर्वी खरेदी केलेल्या कचरा पेट्या गेल्या कुठे? महापालिका प्रशासनावर स्थायी समितीची प्रश्नांची सरबती

खासगी कंत्राटदार कचरा पेट्या देणार तर अधिक पेट्यांची खरेदी कशाला? पेट्या खरेदीचा प्रस्ताव अध्यक्षांनी ठेवला