१० वर्षांपेक्षा जुन्या वाहनांना फिटनेस शुल्काचा भुर्दंड

जुन्या आणि व्यावसाियक वाहनांचे फटनेस चाचणी शुल्क महागले


मुंबई : केंद्र सरकारने केंद्रीय मोटार वाहन नियमांत सुधारणा करीत जुन्या आणि व्यावसायिक वाहनांच्या फिटनेस चाचणी शुल्कात भरमसाट वाढ केली आहे. यामध्ये काही व्यावसायिक वाहनांसाठी हे शुल्क थेट १० पटींनी वाढण्यात आले असून, त्यातच आता १५ ऐवजी १० वर्षांपेक्षा जुन्या वाहनांनाही फिटनेस शुल्काचा भुर्दंड सोसावा लागणार आहे.


सरकारने केंद्रीय मोटार वाहन नियमांत सुधारणा करीत वाहनांच्या फिटनेस चाचणीसाठी पूर्वीची १५ वर्षांची मर्यादा आता १० वर्षांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. १० वर्षांपेक्षा जुन्या सर्व प्रवासी आणि व्यावसायिक वाहनांसाठी फिटनेस चाचणी शुल्क १० पटीपर्यंत वाढवण्यात आले आहे.


१० वर्षांपेक्षा जुन्या वाहनांना फिटनेस प्रमाणपत्रासाठी दर दोन वर्षांनी चाचणी देणे बंधनकारक असेल. जुनी आणि प्रदूषणकारी वाहने रस्त्यांवरून कमी करणे हा यामागील उद्देश असल्याचे सांगण्यात आले आहे.
नव्या तरतुदींनुसार बेकायदा वाहनांसाठी नूतनीकरण शुल्क १०० रुपये निश्चित केले आहे. दुचाकींसाठी हे शुल्क २ हजार रुपये, तीन चाकींसाठी ५ हजार रुपये आणि हलक्या मोटार वाहनांसाठी (एलएमव्ही) नोंदणी नूतनीकरण शुल्क १० हजार रुपये असेल. याशिवाय आयात केलेल्या दुचाकींसाठी २० हजार रुपये आणि आयात केलेल्या चारचाकी वाहनांसाठी ८० हजार रुपये आकारले जाईल.

Comments
Add Comment

BMC : महापालिकेच्या वाहन कंत्राटावर संशयाची सावली

‘आधी ऑडिट करा, मगच पैसे द्या’ सहा महिन्यांच्या मुदतवाढीत आर्थिक विसंगतीचा भाजपचा आरोप स्थायी समितीत गाजला

Water hyacinth : पवई तलावातील जलपर्णी आता कायमची हद्दपार..

तलावाच्या विहार पथाचा विकास सी एस आर निधीतून.. मुंबई: मुंबई महापालिकेच्या पवई तलावात सांडपाण्याच्या

Devendra Fadnavis : बी.टी. सरांच्या निधनाने वैयक्तिक मार्गदर्शकाला मुकलो!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शोकसंवेदना मुंबई, माजी आमदार, शिक्षणतज्ञ आणि विविध सामाजिक प्रश्नांचे गाढे

Devendra Fadnavis : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी छापील पास बंद

'चेहरा पडताळणी पद्धती'द्वारेच प्रवेश; मुख्यमंत्र्यांपासून मंत्री आणि पीठासीन अधिकाऱ्यांसह सर्व घटकांसाठी

Shrikant Shinde : दोन दिवस वाट पहा, सगळं स्पष्ट होईल!

 'ऑपरेशन टायगर'वर खासदार श्रीकांत शिंदे यांची सूचक प्रतिक्रिया मुंबई : उबाठा गटाचे ६ खासदार फुटल्यानंतर

Pratap Sarnaik : बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहन

मुंबई, : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुचनेनुसार बेस्ट कृती समितीच्या प्रतिनिधींशी झालेल्या चर्चेत