कोरेगाव भीमा विजयी दिनानिमित्त पुण्यात वाहतुकीत बदल; कोणते पर्यायी मार्ग वापरावेत?

पुणे: कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी दरवर्षी १ जानेवारीला लाखो अनुयायी पुण्यात येत असतात. त्यामुळे या परिसरात १ जानेवारीला मोठ्या प्रमाणात गर्दी होते. या गर्दीचे नियोजन करण्यासाठी आणि नगर रस्त्यावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी विशेष नियमावली जारी केली आहे. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहतुकीतील हे बदल बुधवारी दुपारी २ वाजल्यापासून १ जानेवारीच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार आहेत.


पर्यायी मार्गाचे नियोजन

पुण्याकडून नगरकडे जाणारी वाहतूक: पुणे शहरातून नगरकडे जाणाऱ्या वाहनांनी खराडी बायपासवरून मुंढवा, मगरपट्टा चौक, पुणे-सोलापूर रोड, केडगाव चौफुला, न्हावरा आणि शिरूर मार्गे पुढे जावे.


मुंबईकडून नगरकडे जाणारी वाहतूक: मुंबईहून येणाऱ्या वाहनांनी वडगाव-मावळ-चाकण-खेड-मंचर-नारायणगाव-आळेफाटा या मार्गाचा अवलंब करावा. तर हलकी वाहने पाबळ-शिरूर मार्गे जाऊ शकतात.


कोल्हापूर, सांगली, सातारा बाजूकडून नगरकडे: या भागातून येणारी वाहने मांतरवाडी फाटा, हडपसर आणि केडगाव चौफुला मार्गे शिरूरकडे वळवण्यात येणार आहे.


सोलापूर रोडकडून आळंदी-चाकणकडे: सोलापूर रोडने येणाऱ्या वाहनांनी हडपसर-मगरपट्टा चौक-खराडी बायपास आणि विश्रांतवाडी मार्गे पुढे जावे.




जड वाहनांना शहरात प्रवेशबंदी
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी थेऊर फाटा, हॅरिस ब्रिज, बोपखेल फाटा, बाणेरमधील राधा चौक, नवले ब्रिज, कात्रज चौक, कोंढव्यातील खडी मशीन चौक आणि मरकळ ब्रिज या ठिकाणांहून जड वाहनांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. तसेच आळंदी-तुळापूर पूल जड वाहनांसाठी बंद असून तिथून फक्त हलकी वाहने सोडली जातील.


पार्किंगची व्यवस्था
प्रशासनाने अनुयायी आणि पर्यटकांसाठी लोणीकंद, तुळापूर फाटा, पेरणे गाव आणि थेऊर रोड या ठिकाणी स्वतंत्र पार्किंगची सोय केली आहे. मुख्य ठिकाणांवर माहिती फलक लावण्यात आले असून वाहनचालकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कृषी मंत्री शेतक - यांच्या बांधावर

राज्यात अवकाळी पावसामुळे १ लाख २२ हजारहून अधिक हेक्टर शेती पिकांचे नुकसान पुणे : राज्यात वादळी वारा व गारांच्या

उद्योगांना एलपीजीचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी शासन प्रयत्नशील - राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल

मुंबई : महाराष्ट्रात कार्यरत असलेली प्रत्येक विदेशी कंपनी ही राज्याचीच आहे, या भूमिकेतून राज्य शासन सर्वतोपरी

मंत्रालय प्रवेशासाठी लागणारी १० हजार ओळखपत्रे गायब

मुंबई : मंत्रालयातील प्रवेश प्रक्रियेत सुसूत्रता आणण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘डिजी प्रवेश’ प्रणालीतील १०

Ladaki Bahin Yojna E Kyc : ई-केवायसी न केल्याने लाडकी बहीण योजनेतील ६८ लाख खाती बंद

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या ‘लाडकी बहिण योजना’ संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. या योजनेअंतर्गत अनिवार्य

ऑपरेशन टायगर? : शिवसेनेच्या मेजवानीला ‘उबाठा’च्या खासदारांची हजेरी

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांनी जोर धरलेला असतानाच, बुधवारी रात्री राजधानी

SSC Exam 2026 Major Reform : कागदपत्रांचा गोंधळ संपणार! आता 'मार्कशीट' आणि 'पासिंग सर्टिफिकेट' मिळणार...बोर्डाचा नवीन निर्णय काय ?

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक