नाताळच्या सुट्टीत पर्यटनासाठी गुहागरला गेलेले तिघांचे कुटुंब समुद्रात बुडाले


गुहागर : नाताळच्या सुट्टीनिमित्त पर्यटनासाठी गुहागरला गेलेल्या मुथ्या कुटुंबातील तीन सदस्य समुद्रात बुडाले. स्थानिकांनी आणि जीवरक्षकांनी तप्तरता दाखवल्यामुळे बुडालेल्यांपैकी मायलेकाचे प्राण वाचले. पण कुटुंबप्रमुख असलेल्या ४२ वर्षांच्या अमोल मुथ्या यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. ही घटना आज म्हणजेच शनिवार २७ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी एकच्या सुमारास घडली.


समुद्रात तीन जण बुडत असल्याची माहिती मिळताच परिसरात कर्तव्यावर (ड्युटीवर) असलेल्या जीवरक्षकांनी आणि स्थानिकांनी तप्तरतेने कारवाई केली. स्थानिकांच्या आणि जीवरक्षकांच्या तप्तरतेमुळे बुडत असलेल्या तीन जणांपैकी दोघांचे प्राण वाचले. पण अमोल मुथ्या यांना वाचवण्याची संधीच स्थानिकांना आणि जीवरक्षकांना मिळाली नाही.


मुथ्या कुटुंब मुंबईत पवई परिसरात वास्तव्यास आहे. सुटीनिमित्त कुटुंब सहलीसाठी गुहागरच्या समुद्र किनाऱ्यावर आले होते. समुद्रात पोहण्याचा आनंद घेत असताना पाण्याचा अंदाज आला नाही आणि मुथ्या कुटुंब बुडू लागले. समुद्रात तीन जण बुडत असल्याची माहिती मिळताच परिसरात कर्तव्यावर (ड्युटीवर) असलेल्या जीवरक्षकांनी आणि स्थानिकांनी तातडीने कारवाई केली. त्यांनी १४ वर्षांच्या मुलाला आणि त्याच्या आईला वाचवले. पण अमोल मुथ्या यांना वाचवण्यात स्थानिक आणि जीवरक्षक अपयशी ठरले.


Comments
Add Comment

नवेगाव-नागझिरा प्रकल्पाबाबत सरकारची सकारात्मक भूमिका; १८५ गावांतील नागरिकांचा संभ्रम दूर

- वनमंत्री गणेश नाईक यांची विधान परिषदेत ग्वाही मुंबई : नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील बफर क्षेत्राच्या

बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्राचे उपकेंद्र कोकणात करा; आमदार प्रवीण दरेकरांची सरकारकडे मागणी

मुंबई : हिंगोली येथील बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्राच्या धर्तीवर कोकणातही या केंद्राचे उपकेंद्र स्थापन

Amit Shah : सीमांचलमधून घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी लवकरच विशेष मोहिम - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

सीमांचल भागातून घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी लवकरच विशेष मोहिम सुरू केली जाईल, असे विधान करत केंद्रीय

अवैध प्रवासी वाहतूक रोखण्यासाठी १ मार्चपासून राज्यभर धडक मोहीम - परिवहन मंत्र्यांचे आदेश

- नियमोल्लंघन करणाऱ्या वाहनांवर होणार जप्तीची कारवाई मुंबई : राज्यभरात फोफावलेल्या अवैध प्रवासी वाहतुकीमुळे

Artificial Flowers : कृत्रिम फुलांचा वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

- शासन निर्णय काढून कारवाईबाबत स्पष्टता आणणार मुंबई : राज्यातील लग्नसोहळे आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये वाढणारा

अजित पवार विमान अपघात प्रकरणी 'तो' अहवाल आज येणार! तांत्रिक बिघाड की मोठा घातपात ?

मुंबई : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघाताला आज एक महिना पूर्ण होत आहे. या अत्यंत