नाताळच्या सुट्टीत पर्यटनासाठी गुहागरला गेलेले तिघांचे कुटुंब समुद्रात बुडाले


गुहागर : नाताळच्या सुट्टीनिमित्त पर्यटनासाठी गुहागरला गेलेल्या मुथ्या कुटुंबातील तीन सदस्य समुद्रात बुडाले. स्थानिकांनी आणि जीवरक्षकांनी तप्तरता दाखवल्यामुळे बुडालेल्यांपैकी मायलेकाचे प्राण वाचले. पण कुटुंबप्रमुख असलेल्या ४२ वर्षांच्या अमोल मुथ्या यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. ही घटना आज म्हणजेच शनिवार २७ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी एकच्या सुमारास घडली.


समुद्रात तीन जण बुडत असल्याची माहिती मिळताच परिसरात कर्तव्यावर (ड्युटीवर) असलेल्या जीवरक्षकांनी आणि स्थानिकांनी तप्तरतेने कारवाई केली. स्थानिकांच्या आणि जीवरक्षकांच्या तप्तरतेमुळे बुडत असलेल्या तीन जणांपैकी दोघांचे प्राण वाचले. पण अमोल मुथ्या यांना वाचवण्याची संधीच स्थानिकांना आणि जीवरक्षकांना मिळाली नाही.


मुथ्या कुटुंब मुंबईत पवई परिसरात वास्तव्यास आहे. सुटीनिमित्त कुटुंब सहलीसाठी गुहागरच्या समुद्र किनाऱ्यावर आले होते. समुद्रात पोहण्याचा आनंद घेत असताना पाण्याचा अंदाज आला नाही आणि मुथ्या कुटुंब बुडू लागले. समुद्रात तीन जण बुडत असल्याची माहिती मिळताच परिसरात कर्तव्यावर (ड्युटीवर) असलेल्या जीवरक्षकांनी आणि स्थानिकांनी तातडीने कारवाई केली. त्यांनी १४ वर्षांच्या मुलाला आणि त्याच्या आईला वाचवले. पण अमोल मुथ्या यांना वाचवण्यात स्थानिक आणि जीवरक्षक अपयशी ठरले.


Comments
Add Comment

मुंबईतील जन्म, मृत्यू प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेचे ऑडिट, भाजपाने का केली मागणी?

मुंबई: मुंबईत बोगस जन्म प्रमाणपत्रे दिली जात असल्याचे प्रकार निदर्शनास आल्याने जन्म नोंदणी व जन्म प्रमाणपत्र

कडक शिस्तीच्या महापौर बाई, जेव्हा सभागृहात किशोरी पेडणेकर यांना चिडीचूप करतात तेव्हा...

मुंबई: मुंबई महापालिकेत उबाठाला आता २५ वर्षांनंतर विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आली आहे. मात्र, या विरोधी बाकांवर

इराणप्रश्नी भारताने ठाम भूमिका घ्यायला हवी होती; राज ठाकरेंचे वक्तव्य

मुंबई: "इराणने दीर्घकाळ भारताला साथ दिली. आता त्या देशावर हल्ले होत असताना भारतानेही ठामपणे पाठिंबा द्यायला हवा

महाराष्ट्रात गेमिंग, क्रिएटर इकॉनॉमी आणि पायाभूत सुविधा उभारण्यावर भर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कंटेंट क्रिएटर्ससोबत संवाद

मुंबई: महाराष्ट्रात गेमिंग, क्रिएटर इकॉनॉमी, शिक्षण आणि डिजिटल पायाभूत सुविधा उभारण्यासाठी शासन सक्षम वातावरण

ठाणे पूर्व येथील श्री जय अंबे माता नवरात्रोत्सव मंडळाच्या देवीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न; उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली सहकुटुंब देवीची पूजा

ठाणे: चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे

फिलिपाईन्समधील भारतीय समाजाचे सेवा आणि व्यावसायिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान; मनिला येथे मंत्री जयकुमार रावल यांचा मराठी बांधवांशी संवाद

मुंबई: मराठी समाज जगभर पसरलेला असला तरी मातृभूमीशी त्यांचे नाते अतूट आहे. फिलिपाईन्समधील भारतीय समाज संख्येने