लष्कराच्या जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी

ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...


नवी दिल्ली : भारतीय लष्कराने आपल्या सोशल मीडिया वापराच्या धोरणात महत्त्वाचा बदल केला आहे. यानुसार, आता लष्करातील जवान आणि अधिकारी इंस्टाग्रामचा वापर केवळ देखरेखीसाठी आणि बघण्यासाठीच करू शकतील. महत्त्वाचे म्हणजे, त्यांना कुठल्याही पोस्टवर 'लाईक' करता येणार नाही, कमेंट करता येणार नाही, तसेच, ते कोणती पोस्टदेखील अपलोड करू शकणार नाहीत. तसेच, डिजिटल वापरासंदर्भातील लष्कराचे आधीचे सर्व नियम कायम असणार आहेत.


सोशल मीडिया वापराबाबतचे हे नवे निर्देश लष्कराच्या सर्व युनिट्स आणि विभागांना जारी करण्यात आले आहेत. याचा उद्देश, जवानांना सोशल मीडियावरील मजकूर पाहण्याची आणि माहिती मिळवण्याची मर्यादित मुभा देणे आहे. जेणेकरून जवान इंटरनेटवरील बनावट आणि दिशाभूल करणाऱ्या माहितीची ओळख पटवू शकतील आणि त्यासंदर्भात आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊ शकतील. लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी नुकत्याच पार पडलेल्या 'चाणक्य डिफेन्स डायलॉग'मध्ये या नियमांचा उल्लेख केला होता. आजची 'जेनरेशन झेड' लष्करात सामील होत असताना स्मार्टफोन ही त्यांची मोठी गरज बनली असल्याचे त्यांनी मान्य केले. एनडीएमध्ये येणाऱ्या कॅडेट्सना फोनशिवायही जगता येते, हे पटवून देण्यासाठी तीन ते सहा महिने लागतात, असेही त्यांनी यावेळी सांगितले.


जवानांच्या वैयक्तिक जीवनासंदर्भात बोलताना, जनरल द्विवेदी म्हणाले, "स्मार्टफोन आजच्या काळातील मोठी गरज बनला आहे. जवान नेहमी फील्डवर असतात. कुटुंबातील जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी, पालकांशी, पत्नीशी संवाद साधण्यासाठी फोन आवश्यक आहे. तसेच वाचनासाठी सोबत किती पुस्तके नेणार? फोनवर वाचणे सोपे आहे." दरम्यान, सोशल मीडियावर मजकूर कधी अपलोड करावा आणि काय पोस्ट करावे, यासंदर्भातही त्यांनी यावेळी भाष्य केले.

Comments
Add Comment

फास्टॅग वार्षिक पास १ एप्रिलपासून महाग होणार

नवी दिल्ली : पुढील महिन्यापासून म्हणजेच १ एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना थोडा

युद्धामुळे महागणार विमान प्रवास?

नवी दिल्ली : मध्य पूर्वेतील तणावाचे चटके आता विमान प्रवासालाही बसणार आहेत. इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यात

Dharmantar Bandi Kayda : सावधान! बळजबरीने किंवा आमिषाने धर्मांतर केल्यास...राज्य सरकारचा धर्मांतर बंदी कायद्याचा नवा प्रस्ताव सादर

मुंबई : महाराष्ट्र सरकारने राज्यातील सक्तीच्या आणि फसव्या धर्मांतरांना लगाम घालण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे.

भारताच्या जहाजांना धोका नाही

इराणकडून मैत्रीचा हात पुढे नवी दिल्ली : पश्चिम आशियात इराण-इस्रायल तणावामुळे जागतिक सागरी व्यापार धोक्यात आला

इराण युद्धामुळे भरपूर नफा ?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा नवी दिल्ली  : ज्या देशांमध्ये युद्ध होते, त्यांचे अतोनात

प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा २२ वा हप्ता वितरित

मुंबई: सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य देत असून किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांना आर्थिक