उद्धव ठाकरेंनी मराठी माणसासाठी केलेले एक काम संजय राऊतांनी दाखवावे

भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांचे थेट आव्हान


उद्धव ठाकरे आणि उबाटा गट यांनी मराठी माणसाच्या हितासाठी काय केले? राऊत हे मराठी माणसासाठी तुरुंगात गेले की, पत्राचाळ घोटाळ्यामुळे तुरुंगात गेले? राऊत यांनी आयुष्यात मराठी माणसाच्या भल्यासाठी केलेले एक तरी काम दाखवावे, आपण त्यांना हजार रुपये देऊ असे आव्हान भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी गुरुवारी राऊतांना दिले. मुंबई भाजपा कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. संजय राऊतांनी मराठी माणसांची घरे लुटली, भ्रष्टाचार केल्यामुळे त्यांना तुरुंगात जावे लागले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र सातत्याने मराठी माणसाच्या हितासाठी जीवाचे रान केले असेही त्यांनी नमूद केले.


ज्या बीडीडी चाळीत मुख्यमंत्री देवेंद्रजींनी किफायतशीर किंमतीत मराठी माणसाला घरे दिली, त्याच बीडीडी चाळीतील घरांची किंमत ठाकरे सरकारमध्ये आदित्य ठाकरे मंत्री असताना तब्बल 50 लाख इतकी ठेवली होती याची आठवण करून देत श्री. बन यांनी उबाठा गटावर शरसंधान साधले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली 10 कामे सांगावी असे बालीश विधान करणा-या राऊतांना लक्ष्य करत श्री. बन म्हणाले 10 कामेच कशाला, 100 कामांची माहिती देतो. मेट्रो, अटल सेतू, कोस्टल रोड, रस्ते, पायाभूत सुविधा, घरे ही आणि असंख्य कामे देवेंद्रजींनी केली असल्याचे ते म्हणाले.


उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाला तिलांजली देत मुस्लिम मतांसाठी लांगुलचालन केले. देवेंद्रजींच्या पाठीत खंजीर खुपसून काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले आणि खुर्ची पटकावली. उद्धव यांच्या हीन कृत्यामुळेच मतदारांचा आशीर्वाद देवेंद्र फडणवीस यांना मिळाला मुस्लीम मते मिळवण्यासाठी उबाठा गट ‘मुस्लिम लीग’सारखा पक्ष झाल्याची बोचरी टीकाही श्री. बन यांनी केली.


उबाठा गट - मनसेची युती झाली असा बोभाटा करणा-या राऊतांची, पत्रकारांनी जेव्हा राज यांना जागावाटपाची आकडेवारी सांगा असे विचारले तेव्हा त्यांची गाळण उडाल्याचे सर्वांनी पाहिले असे नमूद करत


श्री. बन म्हणाले की, खुर्चीसाठी ‘वंदे मातरम्’ ला विरोध करणा-यांसोबत उबाठा गट बसला आहे. हिंमत असेल तर राऊतांनी संपूर्ण ‘वंदे मातरम्’ जाहीरपणे व्यासपीठावरून म्हणावे.


पिंजरा चित्रपटातील मास्तर सारखी उबाठा आणि राऊतांची अवस्था


श्री. बन म्हणाले की, पिंजरा चित्रपटातील मास्तरसारखे तुणतुणे घेऊन काँग्रेसच्या पायाशी रहाण्याची, वंदनीय बाळासाहेबांचा भगवा दूर करत हिरव्या मतांसाठी लाचारी करण्याची वेळ उबाठा गट आणि राऊतांवर ओढवली आहे.


मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलारांवर केलेल्या टीकेचा समाचार घेत श्री. बन यांनी देशपांडेंवर निशाणा साधला. ज्यांच्याकडे विचार, आचार आणि भूमिका नाही, त्यांनी ॲड.शेलार यांच्यावर टीका करू नये. ज्यांना सुपारी घेण्याची, सेटलमेंट करून राजकारण करण्याची सवय आहे, त्यांनी भारतीय जनता पार्टीवर टीका करू नये.


भाजपाने कधीही भाषिक- प्रांतीय वाद निर्माण केला नाही


ठाकरे बंधूंची युती ही पराभवाच्या भीतीतून निर्माण झालेली युती आहे असे श्री. बन यांनी नमूद केले. निवडणुका आल्या की मराठी माणूस, मराठी अस्मिता, मुंबई तोडण्याचा बागुलबुवा निर्माण करण्याचे काम मनसे आणि उबाठा गट करतात असा प्रहार श्री. बन यांनी केला. भाषिक, प्रांतीय वाद निर्माण करण्याची परंपरा ही उबाठा गट आणि मनसेची आहे. मनसेनेच अमराठी माणसांना मारहाण केली, भाषेच्या नावावर, प्रांतवादाच्या नावावर सर्वसामान्य मुंबईकरांना मारले. भाजपाने कधीही मराठी- अमराठी वाद निर्माण केला नाही. म्हणूनच मुंबईकर आणि मराठी माणूस भाजपा, महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील असा विश्वास श्री. बन यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment

कृषी योजनांसाठी ८ महिन्यांत ३५ टक्के निधी खर्च; विधान परिषदेत दत्ता भरणे यांची माहिती

मुंबई : राज्यातील कृषी विभागाच्या राज्य पुरस्कृत योजनांसाठी गेल्या आठ महिन्यांत एकूण ८०९८.४१ कोटी रुपयांची

बदलापूर प्रकरणाची विधान परिषदेत दखल; स्कूल बस नियमावलीच्या कडक अंमलबजावणीचे आदेश

मुंबई : बदलापूर येथील एका शाळेत घडलेल्या विनयभंग प्रकरणाचे विधान परिषदेत तीव्र पडसाद उमटले असून, राज्य सरकारने

विधिमंडळ हेही विनोदांना जन्म देणारे व्यासपीठ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विधान भवनात 'जावे विनोदाच्या गावा' विशेष

पिंजऱ्यातील बिबट्यांचे दात आता राहणार सुरक्षित! लोखंडी गजांना आता 'प्लास्टिक कोटिंग' करणार; वनमंत्र्यांची घोषणा

मुंबई : मानवी वस्तीत शिरलेल्या बिबट्यांना पकडल्यानंतर पिंजऱ्यात त्यांना होणाऱ्या शारीरिक जखमा आणि त्यातून

शेतकरी आणि मजुरांना बिबट्यांपासून मिळणार सुरक्षा; विधान परिषदेत सरकारचा मास्टर प्लॅन

मुंबई : राज्यात वाढलेला बिबट्यांचा वावर आणि त्यामुळे होणारी जीवितहानी रोखण्यासाठी राज्य सरकारने अत्याधुनिक

एआय तंत्रज्ञानाने रोखणार वाघ-बिबट्यांचे हल्ले; प्रवीण दरेकरांच्या सूचनेवर सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्रप्रकल्पात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या (AI) सहाय्याने राबवण्यात आलेला