राजस्थानातील १५ गावांमध्ये महिलांना स्मार्टफोन वापरण्यास बंदी

पंचायतीच्या ‘तुघलकी’ फरमानावरून उलट-सुलट चर्चा


जालोर : राजस्थानच्या जालोर जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि अजब प्रकार समोर आला आहे. येथील एका पंचायतीने १५ गावांतील महिला आणि मुलींना स्मार्टफोन किंवा कॅमेरा असलेला मोबाईल वापरण्यास मज्जाव केला आहे. पंचायतीचा हा निर्णय एखाद्या ‘तुघलकी’ फरमानासारखा असल्याची चर्चा आता रंगू लागली असून, २६ जानेवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.


पंचायतीने जारी केलेल्या आदेशानुसार, या १५ गावांतील महिलांना आता केवळ साध्या की-पॅड फोनचा वापर करता येईल. स्मार्टफोन्समुळे मुले बिघडतात आणि त्यांच्या डोळ्यांवर विपरीत परिणाम होतो, असा दावा पंचायतीने केला आहे. लग्न समारंभ, शेजाऱ्यांच्या घरी जातानाही महिलांना मोबाईल सोबत नेण्यास बंदी घालण्यात आली आहे.


समाज माध्यमांवर संमिश्र प्रतिक्रिया : पंचायतीच्या या अजब निर्णयाचे पडसाद सोशल मीडियावर उमटल्या. काही लोकांच्या मते, मुलांच्या आरोग्यासाठी आणि स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी हा निर्णय योग्य आहे. बहुतांश नागरिकांनी याला महिलांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारे पाऊल म्हटले असून, आधुनिक काळात असा भेदभाव करणे चुकीचे आहे.

Comments
Add Comment

Ahmedabad Blast : अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात मोठा निर्णय; ३८ दोषींची फाशी, ११ जणांची जन्मठेप उच्च न्यायालयाकडून कायम

Ahmedabad Blast : २००८ मधील अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट (Ahmedabad Blast) प्रकरणात गुजरात उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय देत

Crime News : प्रियकरासाठी पतीचा 'गेम', आधी छतावरून फेकलं, मग रुग्णालयात केला 'काम तमाम'

नर्स पत्नीची क्रूरता पाहून पोलीसही हादरले; पतीला मारण्यासाठी आखला प्लॅन  तेलंगणा : तेलंगणामध्ये विवाहबाह्य

Baruipur Murder Case : गुप्तांगांवर जखमा, डोक्यावर प्रहार अन् १२ वर्षीय मुलीवर पाशवी बलात्कार; पश्चिम बंगाल हादरले!

पश्चिम बंगालमधील दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील बारुईपूर येथे एका १२ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार

Cloudburst : ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यास काय करावे? जाणून घ्या आपत्कालीन व्यवस्थापन आणि सुरक्षेचे उपाय

Cloudburst : सध्या राज्यात पावसाचा वेग वाढला आहे. नाशिकमध्ये तर ढगसदृश्य पाऊस सांगितला आहे. अशावेळेस नागरिकांनी घाबरून

Indian Navy : भारतीय नौदलाची ताकद वाढणार; 'आयएनएस महेंद्रगिरी' आणि 'आयएनएस मालवण' लवकरच ताफ्यात येणार

नवी दिल्ली : भारतीय नौदलाची सागरी ताकद आणखी वाढणार असून लवकरच ‘आयएनएस महेंद्रगिरी’ आणि ‘आयएनएस मालवण’ या दोन

Indian Navy : भारतीय नौदलाच्या युद्धनौकांच्या सिंगापूर भेटीची यशस्वी सांगता

नवी दिल्ली : भारत आणि सिंगापूर यांच्यातील दृढ सामरिक आणि सागरी भागीदारी अधिक मजबूत करत भारतीय नौदलाच्या पूर्व