राजस्थानातील १५ गावांमध्ये महिलांना स्मार्टफोन वापरण्यास बंदी

पंचायतीच्या ‘तुघलकी’ फरमानावरून उलट-सुलट चर्चा


जालोर : राजस्थानच्या जालोर जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि अजब प्रकार समोर आला आहे. येथील एका पंचायतीने १५ गावांतील महिला आणि मुलींना स्मार्टफोन किंवा कॅमेरा असलेला मोबाईल वापरण्यास मज्जाव केला आहे. पंचायतीचा हा निर्णय एखाद्या ‘तुघलकी’ फरमानासारखा असल्याची चर्चा आता रंगू लागली असून, २६ जानेवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.


पंचायतीने जारी केलेल्या आदेशानुसार, या १५ गावांतील महिलांना आता केवळ साध्या की-पॅड फोनचा वापर करता येईल. स्मार्टफोन्समुळे मुले बिघडतात आणि त्यांच्या डोळ्यांवर विपरीत परिणाम होतो, असा दावा पंचायतीने केला आहे. लग्न समारंभ, शेजाऱ्यांच्या घरी जातानाही महिलांना मोबाईल सोबत नेण्यास बंदी घालण्यात आली आहे.


समाज माध्यमांवर संमिश्र प्रतिक्रिया : पंचायतीच्या या अजब निर्णयाचे पडसाद सोशल मीडियावर उमटल्या. काही लोकांच्या मते, मुलांच्या आरोग्यासाठी आणि स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी हा निर्णय योग्य आहे. बहुतांश नागरिकांनी याला महिलांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारे पाऊल म्हटले असून, आधुनिक काळात असा भेदभाव करणे चुकीचे आहे.

Comments
Add Comment

Delhi Police : राजधानीत दहशतवादी कट उधळला! ISI समर्थित नेटवर्कचा दिल्लीत पर्दाफाश; शस्त्रे-ड्रग्ज तस्करीप्रकरणी सात जण जेरबंद

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्ली पुन्हा एकदा दहशतवादी कारवायांच्या सावटाखाली आल्याचे समोर आले आहे.

Vadodara Accident : गुजरातमध्ये भीषण बस अपघात; ट्रकला धडकून 5 प्रवाशांचा मृत्यू, अनेक जखमी

Vadodara Accident: वडोदरा : गुजरातमधील (Gujarat) वडोदरा-जारोड महामार्गावर आज पहाटे झालेल्या भीषण अपघातात (Accident) पाच जणांचा मृत्यू (Death)

Madhuri Vantara : 'वनतारा'च्या उपचारांनी 'माधुरी' हत्तीण झाली ठणठणीत, लवकरच कोल्हापूरला परतणार

जामनगर: गंभीर आजारपण आणि दोन्ही पायांच्या हाडांच्या दुखापतीमुळे मृत्यूच्या छायेत असलेल्या 'माधुरी' नावाच्या

Study Tours For Maharashtra Govt School : सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांचे नशीब उजळले! आता 'NASA' आणि 'ISRO' ची सफर

मुंबई : महाराष्ट्रातील सरकारी शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी

Made in India : दोन भारतीय इंजिनिअर्सनी उभी केली १४,१४५ कोटींची 'युनिकॉर्न' कंपनी

मुंबई: आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या जागतिक स्पर्धेत सध्या अमेरिकन कंपन्यांचा दबदबा आहे. मात्र, या शर्यतीत आता

Cough Syrups : औषधांच्या नियमात मोठा बदल; कफ सिरपसाठी आता डॉक्टरांची 'चिठ्ठी' बंधनकारक!

नवी दिल्ली : देशातील नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी केंद्र सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा आणि धाडसी