Ashish Shelar : "विठ्ठलाला घेरणाऱ्या बडव्यांशी आता गळ्यात गळे का?"; आशिष शेलारांचा राज-उद्धव युतीवर जहरी प्रहार!

शेलारांचा 'लाव रे तो व्हिडिओ' स्टाईलने पलटवार


मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या आगामी रणसंग्रामासाठी राजकीय समीकरणांची जुळवाजुळव वेगाने सुरू झाली असून, (उबाठा) गट आणि (मनसे) या दोन भावांच्या पक्षांमध्ये वाढणारी जवळीक सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. अनेक वर्षांचा राजकीय संघर्ष आणि विसंवाद बाजूला सारून हे दोन्ही पक्ष युती करण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत. या संभाव्य युतीवर भाजपने आता टीकेची झोड उठवली आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि मंत्री आशिष शेलार यांनी सोशल मीडियावर एक बोचरी कविता पोस्ट करून या नव्या मैत्रीवर जोरदार प्रहार केला आहे.


शेलार यांनी आपल्या कवितेतून राज ठाकरे यांनी शिवसेना सोडताना केलेल्या 'बडवे आणि कारकून' या आरोपांची खोचक आठवण करून दिली. राज ठाकरेंनी ज्या नेतृत्वावर आणि कार्यपद्धतीवर टीका करत स्वतःचा वेगळा रस्ता निवडला, आज केवळ सत्तेच्या मोहापायी ते त्याच लोकांशी 'गळ्यात गळे' कसे घालू शकतात, असा थेट सवाल शेलार यांनी सवाल विचारला आहे. ही युती म्हणजे मुंबईच्या विकासासाठी नसून, पालिकेची तिजोरी लुटण्यासाठी रचलेला हा एक बनाव आहे, असा गंभीर आरोप करत त्यांनी या दोन्ही नेत्यांना मुंबईकरांच्या प्रश्नांना सामोरे जाण्याचा इशारा दिला आहे.





बडवे आणि कारकुनांच्या जुन्या वादाची आठवण


राज ठाकरे यांनी ज्यावेळी शिवसेना सोडली होती, त्यावेळी त्यांनी 'विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय' अशी टीका केली होती. याच मुद्द्याचा आधार घेत शेलार यांनी आपल्या कवितेत म्हटले आहे की, "घेरलं होतं मातोश्रीवरील विठ्ठलाला बडव्यांनी.. तुमच्या मते, पक्षाचा ताबा घेतला होता चार कारकुनांनी..." राज ठाकरेंनी ज्या लोकांमुळे पक्ष सोडला, आज त्याच लोकांशी ते हातमिळवणी करणार का, असा बोचरा सवाल शेलार यांनी केला आहे.



"लाव रे तो व्हिडीओ"वरून खोचक टोला


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत भाजपविरोधात रान पेटवले होते. आता शेलार यांनी तोच शब्दप्रयोग त्यांच्यावर उलटवला आहे. "लाव रे तो व्हिडीओ असे आता मुंबईकर म्हणतील, तुमची जुनी भाषणे काढून आरसा समोर धरतील," असे म्हणत शेलार यांनी दोन्ही नेत्यांच्या परस्परविरोधी विधानांची आठवण करून दिली आहे.



मुंबईच्या तिजोरीची सुरक्षा आणि मतदारांचे प्रश्न


या युतीचा मुख्य हेतू केवळ सत्तेची हाव असल्याचे शेलार यांनी सुचवले आहे. "एकत्र येऊन पालिकेची तिजोरी नाही ना लुटणार?" असा संशय व्यक्त करत त्यांनी मुंबईकरांच्या मनात असलेल्या भीतीला वाचा फोडली आहे. गल्लोगल्लीत मुंबईकर तुम्हाला जाब विचारतील आणि तुमच्या बदललेल्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतील, असा इशाराही त्यांनी दिला.

Comments
Add Comment

Ketan Agarwal Murder Case : केतन अग्रवाल हत्या प्रकरणानंतर सिया गोयलच्या कुटुंबाला आणखी एक धक्का; वडिलांच्या दुकानावर 'FDA'ची कारवाई

मुंबई : केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील (Murder Case) आरोपी सिया गोयल हिच्या कुटुंबाशी संबंधित व्यवसायावर अन्न व औषध

BMC News : कोविड काळातील ऑक्सिजन प्लांटची यंत्रणा गेली कुठे? , स्थायी समिती सदस्यांचा प्रशासनाचा सवाल

माहिती सादर करण्याचे अध्यक्षांचे निर्देश मुंबई : कोविड काळामध्ये मुंबई महापालिकेच्या वतीने अनेक ठिकाणी

Malaria and Dengue : मुंबईत मलेरिया, डेंग्यू, लेप्टोचे थैमान, मलेरिया ३,६८१, डेंग्यू ९३८, लप्टोच्या १५७ रुग्णांची नोंद!

एडिस व अनोफिलीस डासांच्या २७ हजारांहून अधिक आळ्या सापडल्या ३६ लाख ८१ हजार लोकांचा सर्वे, १० लाखांहून अधिक

Mumbai Illegal Debris : अनधिकृत डेब्रीजबाबत दिल्ली पॅटर्न, इमारत बांधकामाचे डेब्रीज आता थेट सी अँड प्रकल्पातच जाणार

अनधिकृत डेब्रीज वाहणाऱ्या डंपरवर होणार कारवाई स्थायी समितीत प्रस्तावाला दिली मंजुरी मुंबई : मुंबई (Mumbai) शहरात

Tree Plantation : प्रकल्पात बाधित होणारी झाडे आता लावणार मुंबईतच

पर्यायी वृक्षारोपण आणि पुनर्रोपण मुंबईतच करण्याचे स्थायी समितीचे प्रशासनाला निर्देश नगरसेवकांना जागा

Juhu Beach : जुहू चौपाटीवर मागील दहा दिवसात तब्बल १ हजार ८०० मेट्रिक टन केला गोळा.

मुंबई : मुसळधार पाऊस (Heavy Rain) आणि त्यामुळे समुद्रात वाहून गेलेला तसेच भरतीच्या लाटांमुळे पुन्हा किनाऱ्यावर