Ashish Shelar : "विठ्ठलाला घेरणाऱ्या बडव्यांशी आता गळ्यात गळे का?"; आशिष शेलारांचा राज-उद्धव युतीवर जहरी प्रहार!

शेलारांचा 'लाव रे तो व्हिडिओ' स्टाईलने पलटवार


मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या आगामी रणसंग्रामासाठी राजकीय समीकरणांची जुळवाजुळव वेगाने सुरू झाली असून, (उबाठा) गट आणि (मनसे) या दोन भावांच्या पक्षांमध्ये वाढणारी जवळीक सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. अनेक वर्षांचा राजकीय संघर्ष आणि विसंवाद बाजूला सारून हे दोन्ही पक्ष युती करण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत. या संभाव्य युतीवर भाजपने आता टीकेची झोड उठवली आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि मंत्री आशिष शेलार यांनी सोशल मीडियावर एक बोचरी कविता पोस्ट करून या नव्या मैत्रीवर जोरदार प्रहार केला आहे.


शेलार यांनी आपल्या कवितेतून राज ठाकरे यांनी शिवसेना सोडताना केलेल्या 'बडवे आणि कारकून' या आरोपांची खोचक आठवण करून दिली. राज ठाकरेंनी ज्या नेतृत्वावर आणि कार्यपद्धतीवर टीका करत स्वतःचा वेगळा रस्ता निवडला, आज केवळ सत्तेच्या मोहापायी ते त्याच लोकांशी 'गळ्यात गळे' कसे घालू शकतात, असा थेट सवाल शेलार यांनी सवाल विचारला आहे. ही युती म्हणजे मुंबईच्या विकासासाठी नसून, पालिकेची तिजोरी लुटण्यासाठी रचलेला हा एक बनाव आहे, असा गंभीर आरोप करत त्यांनी या दोन्ही नेत्यांना मुंबईकरांच्या प्रश्नांना सामोरे जाण्याचा इशारा दिला आहे.





बडवे आणि कारकुनांच्या जुन्या वादाची आठवण


राज ठाकरे यांनी ज्यावेळी शिवसेना सोडली होती, त्यावेळी त्यांनी 'विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय' अशी टीका केली होती. याच मुद्द्याचा आधार घेत शेलार यांनी आपल्या कवितेत म्हटले आहे की, "घेरलं होतं मातोश्रीवरील विठ्ठलाला बडव्यांनी.. तुमच्या मते, पक्षाचा ताबा घेतला होता चार कारकुनांनी..." राज ठाकरेंनी ज्या लोकांमुळे पक्ष सोडला, आज त्याच लोकांशी ते हातमिळवणी करणार का, असा बोचरा सवाल शेलार यांनी केला आहे.



"लाव रे तो व्हिडीओ"वरून खोचक टोला


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत भाजपविरोधात रान पेटवले होते. आता शेलार यांनी तोच शब्दप्रयोग त्यांच्यावर उलटवला आहे. "लाव रे तो व्हिडीओ असे आता मुंबईकर म्हणतील, तुमची जुनी भाषणे काढून आरसा समोर धरतील," असे म्हणत शेलार यांनी दोन्ही नेत्यांच्या परस्परविरोधी विधानांची आठवण करून दिली आहे.



मुंबईच्या तिजोरीची सुरक्षा आणि मतदारांचे प्रश्न


या युतीचा मुख्य हेतू केवळ सत्तेची हाव असल्याचे शेलार यांनी सुचवले आहे. "एकत्र येऊन पालिकेची तिजोरी नाही ना लुटणार?" असा संशय व्यक्त करत त्यांनी मुंबईकरांच्या मनात असलेल्या भीतीला वाचा फोडली आहे. गल्लोगल्लीत मुंबईकर तुम्हाला जाब विचारतील आणि तुमच्या बदललेल्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतील, असा इशाराही त्यांनी दिला.

Comments
Add Comment

रानडे मार्गावर ठेच लागून ज्येष्ठ नागरिकावर जखमी होण्याची आली वेळ, कुटुंबाने महापालिकेकडे ही मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील पदपथ आणि खोदलेले रस्ते पुन्हा योग्यप्रकारे न बनवल्यास ते असमांतर बनवून

मध्यप्रदेशच्या तरुणांनी महापालिकेच्या वाहनतळाचा घेतला ताबा... महापालिकेने उचलले हे पाऊल

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : हुतात्मा चौक येथील वाहनतळाच्याठिकाणी महापालिकेच्यावतीने निशुल्क सेवा दिली जात

मुंबई विमानतळावर विमानांचा मोठा अपघात टळला

मुंबई : मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एक मोठी बातमी आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय

स्वच्छ सर्वेक्षण २०२६; शहर स्वच्छ करण्यासाठी महापालिकेच्या प्रयत्नांमध्ये सहभागी व्हा, नागरिकांना मुंबई मनपाचे आवाहन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : केंद्र शासनाकडून स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ चा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. यंदाच्या

सी-टीईटी देणाऱ्या शिक्षकांना निवडणूक कामातून सूट

मुंबई : ‘केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा’ (सी-टीईटी) देणाऱ्या शिक्षकांना जिल्हा परिषद व पंचायत समिती

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त सरसंघचालक मोहन भागवत साधणार मान्यवरांशी संवाद - वरळीच्या नेहरू सेंटरमध्ये दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त सरसंघचालक मोहन भागवत हे मुंबईत समाजातील विविध