Chandrashekhar Bawankule : ठाकरे बंधूंची युती हा केवळ निवडणूक फंडा - चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : "ठाकरे बंधूंची युती हा केवळ निवडणुकीचा फंडा असून, जनतेला याची पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे त्यांनी मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, व्होटचोरी होणार, अशी घिसीपिटी कॅसेट बंद करावी", असा घणाघाती हल्ला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. उबाठा गटाला स्वतःच्या माणसांची काळजी घेता येत नसल्याने त्यांचे नेते आणि कार्यकर्ते पक्ष सोडून जात असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.


मंत्रालयात माध्यमांशी संवाद साधताना बावनकुळे म्हणाले, “उबाठा गटाने स्वतःच जनतेचा आणि कार्यकर्त्यांचा विश्वास संपवला आहे. त्यामुळे त्यांचे आमदार, नेते आणि गावोगावचे कार्यकर्ते त्यांना सोडून जात आहेत. त्यांनी आत्मचिंतन करायला हवे की, लोकांनी त्यांना का सोडले? नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमध्येही नगराध्यक्षपदासाठी उमेदवार उभे करायला त्यांच्याकडे माणसे नव्हती. आता मुंबई तोडण्याचा मुद्दा काढून त्यांना काही साध्य होणार नाही. त्यांची ही घिसीपिटी कॅसेट आता कुणी ऐकत नाही.”



जनता भावनांवर नव्हे, विकासावर मतदान करते


मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होऊ शकत नाही, हे संपूर्ण देशातील चार वर्षांच्या बालकालाही समजते, असे सांगत बावनकुळे पुढे म्हणाले, “व्होटचोरी आणि मुंबई तोडणे असे जुने मुद्दे आता जनतेला पटत नाहीत. उबाठा प्रत्येक निवडणुकीत असे भावनिक आवाहन करतो; पण महाराष्ट्राची जनता सुजाण आहे. ती भावनांच्या आधारावर नव्हे, तर विकासाच्या मुद्द्यावर मतदान करणार आहे.”


मराठीच्या मुद्द्यावर बावनकुळे म्हणाले, “आम्ही सर्व मराठी माणसे आहोत. मराठी-मराठी करून तुम्ही मराठी भाषेचाच अपमान केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वात विकसित मुंबई आणि विकसित महाराष्ट्र शक्य आहे, हे मतदारांना माहिती आहे. त्यामुळे यावेळी उबाठाला महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील सर्वात कमी मते मिळणार आहेत”, असा दावाही महसूल मंत्री बावनकुळे यांनी केला.

Comments
Add Comment

Rahul Narvekar : शिक्षक केवळ वाचायला शिकवत नाही, तर समाज घडवतो आणि वाचवतो" - राहुल नार्वेकर यांचे गौरवोद्गार

मुंबई : "शिक्षक हा केवळ अक्षरांची ओळख करून देणारा घटक नाही, तर तो खऱ्या अर्थाने समाज घडवणारा आणि संकटाच्या काळात

Mohan Bhagwat : अस्थिर जगाचा आधार केवळ भारतच; पण त्यासाठी शेवटच्या घटकाचा विकास हवा" – डॉ. मोहन भागवत

आदिवासी अस्मिता हीच देशाची ओळख"; कर्मयोगी एकल शिक्षक मेळाव्यात डॉ. मोहन भागवत यांचे प्रेरक उद्गार सत्ता नव्हे, तर

First Tribal University : विदर्भात साकारणार देशातील पहिले आदिवासी विद्यापीठ

५०० कोटींच्या प्रकल्पातून शैक्षणिक क्रांतीचे नवे पर्व मुंबई : गेल्या तीन दशकांपासून आदिवासी आणि दुर्गम भागात

BMC News : मुंबईच्या महापौर रस्ते आणि नालेसफाईच्या पाहणी मोहिमेवर

रस्ते कामांचा वेग वाढवताना बांधकामात आणि दर्जा राखण्यात हयगय नको; प्रशासनाला दिले निर्देश मुंबई : रस्त्यांची

HSC Result : बारावीचा निकाल जाहीर झाला पण टक्क्यांना लागलेली गळती कायम राहिली

मुंबई : महाराष्ट्र उच्च माध्यमिक आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने बारावीची

Mumbai Crime : आधी विटेने वार, मग गळा आवळला...वांद्र्यातील ७८ वर्षीय वृद्धेची निर्घृण हत्या

मुंबई : मुंबईतील वांद्रे (पूर्व) भागात उघडकीस आलेल्या एका खळबळजनक हत्याकांडाचा छडा लावण्यात खेरवाडी पोलिसांना