ठाकरे बंधूंची युती होताच भाजपने दिला मोठा दणका


मुंबई : महाराष्ट्रातील मुंबईसह २९ महापालिकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान आणि १६ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. देशाची आर्थिक आणि महाराष्ट्राची राजकीय राजधानी असलेल्या मुंबई महापालिकेत मागील मागील अनेक वर्षांपासून उद्धव ठाकरेंच्या समर्थकांची सत्ता आहे. या सत्तेचा दुरुपयोग होत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. उद्धव ठाकरेंचा पक्ष आकंठ भ्रष्टाचारात बुडाला असल्याचे मंत्री आशिष शेलार म्हणाले. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पक्षांनी मुंबई महापालिकेची निवडणूक एकत्र लढवण्याचा निर्णय घेतला आहे. ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा करताच भाजपने दोन्ही भावांना जबर राजकीय धक्का दिला आहे.


उद्धव ठाकरे गटाच्या आणि मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. हा ठाकरे बंधूंसाठी मोठा दणका असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.


उल्हासनगरमध्ये उद्धव ठाकरे गटाला मोठा दणका बसला. उल्हासनगरचे माजी उपमहापौर व माजी सभागृह नेते धनंजय बोडारे, माजी नगरसेविका वसुधाताई बोडारे, शितलताई बोडारे, ओमी कलानी गटाचे माजी नगरसेवक नाना बिराडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले. यावेळी आमदार कुमार आयलानी, उल्हासनगरचे भाजप जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया, प्रदीप राजानी, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांच्यासह भाजपचे इतर पदाधिकारी आणइ कार्यकर्ते उपस्थित होते.





पनवेलमध्ये मनसेला मोठा धक्का बसला. मनसेचे पनवेल महानगर संघटक तानाजी पिसे, नवीन पनवेलचे शहराध्यक्ष प्रथमेश गवळी, विद्यार्थी सेना विभाग अध्यक्ष रोहन गवळी, पदाधिकारी केनेथ देवासगयम यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या सर्वांना पक्षात प्रवेश देताना प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भाजप परिवाराच्या विकासाभिमुख आणि पारदर्शक कार्यशैलीने प्रेरित होऊन हे पदाधिकारी प्रवेश करत असल्याची माहिती दिली.


Comments
Add Comment

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

मतदानाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत वाहतूक नियोजनात बदल; काही मार्गांवर प्रवेश मर्यादित

मुंबई : राज्यातील महानगरपालिका निवडणुकांसाठी उद्या मतदान होणार असून, या प्रक्रियेच्या सुरळीत अंमलबजावणीसाठी

मशीदीवरचे भोंगे पुन्हा लावण्याचे वचन देऊन उद्धव ठाकरेंनी प्रचार केला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आरोप; कुणाचाही महापौर झाला तरी आम्ही भोंग्यांना परवानगी देणार नाही मुंबई :

संक्रांतीच्या उत्सवाला गालबोट; अहिल्यानगर जिल्ह्यात पतंग उडवताना चिमुकल्याचा....

अहिल्यानगर : मकर संक्रांतीच्या दिवशी आनंद आणि उत्साहाचं वातावरण असतानाच अहिल्यानगर जिल्ह्यात एक हृदयद्रावक

BMC Election 2026 : महापालिका निकाल प्रक्रियेत बदल; मुंबईत मतमोजणीसाठी नव्या नियमांची अंमलबजावणी

मुंबई : राज्यात महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. १५ जानेवारी रोजी मतदान