नागपुरात सकाळी गोळीबाराचा थरार; प्राध्यापकासह तिघे जण जखमी

नागपूर : नागपुरात बुधवारी पहाटेच्या सुमारास गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील गुमगाव परिसरात घरगुती वादातून झालेल्या गोळीबारात एका प्राध्यापकासह तिघे जण जखमी झाले आहेत. या घटनेत एका जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी सुमारे ८ वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. गुमगावमधील गज्जू नावाच्या व्यक्तीचा देवतळे कुटुंबाशी अनेक दिवसांपासून घरगुती वाद सुरू होता. या वादातूनच रागाच्या भरात आरोपीने थेट बंदूक काढत गोळीबार केला.


या हल्ल्यात प्राध्यापक नितीन देवतळे, प्रविण देवतळे तसेच त्यांच्यासोबत असलेला एक मित्र गोळी लागून जखमी झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार आरोपीने दोन राऊंड फायरिंग केल्याचे समोर आले आहे. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर असून त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


भरदिवसा आणि वस्ती असलेल्या भागात घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण गुमगाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गोळीबाराची माहिती मिळताच नागपूर ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपीने नेमक्या कोणत्या कारणामुळे हे टोकाचे पाऊल उचलले, तसेच त्याच्याकडे शस्त्र कसे आले, याचा तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणी पुढील चौकशी सुरू आहे.

Comments
Add Comment

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार