राज्यातील ३० लाख लाडक्या बहिणींची 'ई-केवायसी'कडे पाठ

३१ डिसेंबरची डेडलाईन; प्रक्रिया पूर्ण न केल्यास लाभ कायमचा बंद


मुंबई : महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेतून जवळपास ३० लाख लाभार्थी बाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या योजनेंतर्गत दरमहा मिळणारी
१ हजार ५०० रुपयांची मदत सुरू ठेवण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे. मात्र, अद्याप ३० लाखांहून अधिक लाडक्या बहिणी अजूनही या प्रक्रियेपासून दूर आहेत. विहित मुदतीत ई-केवायसी न केल्यास योजनेचा लाभ कायमचा बंद होणार आहे.


राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने महायुती सरकारने जुलै २०२४ मध्ये 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना सुरू केली. ही योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत लाखो महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडले आहेत. घरखर्च, आरोग्य, शिक्षण आणि दैनंदिन गरजांसाठी हा निधी अत्यंत उपयुक्त ठरत आहे.


१ कोटी ६० लाख महिलांची ई-केवायसी पूर्ण




  •  सध्या राज्यात सुमारे २ कोटी ४७ लाख महिला लाभार्थी होत्या. यापैकी १ कोटी ६० लाख महिलांनी ई-केवायसी पूर्ण केली असली, तरी उर्वरित ३० लाख महिलांनी अजूनही ही प्रक्रिया केलेली नाही. त्यामुळे शासनाने मुदत ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढवली आहे. ही अंतिम मुदत असून, यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.





  • ई-केवायसी प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. लाभार्थी महिलांनी अधिकृत वेबसाइट https://ladakibahin.maharashtra.gov.in वर जाऊन आधार क्रमांक टाकावा, ओटीपीद्वारे प्रमाणीकरण करावे आणि आवश्यक माहिती भरावी. ही प्रक्रिया घरबसल्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरवरून पूर्ण करता येते. मात्र, आधारशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक आणि बँक खाते असणे आवश्यक आहे. तसेच, चुकीची माहिती भरल्यास 'वन टाइम एडिट'ची सुविधा ३१ डिसेंबरपर्यंत उपलब्ध आहे.


Comments
Add Comment

Dombilvli: डोंबिवलीत शॉरमावालीच्या स्टॉलवर राज ठाकरेंचा फोटो, अविनाश जाधवांनी दिलेला शब्द पाळला

डोंबिवली: मनसे ठाणे शहराध्यक्ष अविनाश जाधव यांनी डोंबिवलीत शॉरमा विकणाऱ्या एकता सावंत या मराठी व्यावसायिका

एका खटक्यात दादर पूर्व रेल्वे स्थानक परिसर साफ

चोरबाजारासह अनधिकृत फेरीवाले आणि गर्दुल्ल्यांवर कारवाई मुंबई :  दादर पूर्व रेल्वे स्थानकासमोरील जागेत मागील

Mumbai Pune Expressway Traffic: तब्बल ३२ तासानंतर मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील वाहतूक पूर्ववत

मुंबई: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील वाहतूक तब्बल ३२ तासांनंतर पूर्ववत झाली आहे. मुंबई आणि पुणे या दोन मोठ्या

गोरेगाव मुलुंड पश्चिमेतील उड्डाणपूल प्रकल्पाला गती, मुंबई मेट्रो ४च्या खालून जाणार पूल

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : तानसा जलवाहिनी ते नाहूर रेल्वे पूल येथपर्यंतचा १.८९ किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल

महापालिकेच्या आपला दवाखान्यामध्येही मुख कर्करोगाची तपासणी

गर्भाशय मुख आणि स्तन कर्करोगाचे दवाखान्यांसह प्रसुतीगृहांमध्ये तपासणी शिबीर मुंबई (विशेष प्रतिनिधी)

गोरेगावात लिफ्टमध्ये हायड्रोजन फुग्यांचा स्फोट; तीन जण थोडक्यात बचावले

मुंबई : मुंबईतील गोरेगाव परिसरात हायड्रोजन गॅस भरलेल्या फुग्यांमुळे मोठा धोका निर्माण झाल्याची घटना समोर आली