Pankaj Bhoyar : "ठाकरे बंधूंच्या युतीचा मुंबईत काहीही परिणाम होणार नाही"; गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा जालन्यातून टोला

जालना : "आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी कोणाशीही किंवा एकमेकांशी युती केली तरी त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. मुंबई महापालिकेवर केवळ भाजप आणि महायुतीचाच झेंडा फडकणार," असा ठाम विश्वास राज्याचे गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी व्यक्त केला आहे. जालना येथे भाजप नेते भास्कर दानवे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेटीसाठी आले असताना त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.



मुंबई महापालिका महायुतीच्याच ताब्यात येणार


मुंबई महापालिकेच्या आगामी रणसंग्रामावर बोलताना पंकज भोयर म्हणाले की, "ठाकरे बंधू एकत्र येत असल्याच्या चर्चा केवळ राजकीय वर्तुळात आहेत. मात्र, मुंबईच्या जनतेने विकासाची कास धरली आहे. मोदी सरकारने राबवलेल्या कल्याणकारी योजना आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले लोकहिताचे निर्णय यामुळे जनतेचा महायुतीवर विश्वास वाढला आहे. त्यामुळे विरोधक कितीही एकत्र आले तरी मुंबई महापालिका महायुतीच्याच ताब्यात येईल."



स्थानिक निवडणुकांच्या युतीवर वरिष्ठांचा शब्द अंतिम


जालना आणि राज्यातील अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील युतीबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, "येथील स्थानिक परिस्थिती आणि राजकीय समीकरणे बघून पक्षाचे वरिष्ठ नेतृत्व योग्य तो निर्णय घेतील. या प्रक्रियेत स्थानिक पदाधिकाऱ्यांची मतेही विचारात घेतली जातील. महायुती म्हणून लढायचे की नाही, याचा अंतिम निर्णय लवकरच जाहीर होईल."



नगरपरिषदेतील यशाची महापालिकेत पुनरावृत्ती


पंकज भोयर यांनी अलीकडेच पार पडलेल्या नगरपरिषद निवडणुकीतील यशाचा दाखला दिला. ते म्हणाले, "नगरपरिषद निवडणुकीत नागरिकांनी आम्हाला प्रचंड मतांनी विजयी केले आहे. ही विकासाची पोचपावती आहे. हीच लाट आगामी महापालिका निवडणुकीतही पाहायला मिळेल आणि भाजप-महायुतीचे सर्वाधिक नगरसेवक निवडून येतील."

Comments
Add Comment

लाडक्या बहिणींनो लक्ष द्या ! eKYC साठी शेवटची संधी , उरले फक्त 'इतके' दिवस

राज्यसरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या लाडकी बहीण योजनेबाबत ( Ladki Bahin Yojana) महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. लाडकी

Satara IT Park : सातारा जिल्ह्यात आयटी पार्क उभारणार

मुंबई : सातारा जिल्ह्यातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला चालना देण्यासाठी मौजे नागेवाडी (ता. सातारा, जि. सातारा)

Nitesh Rane : मोरा मच्छीमारांना नुकसानभरपाई द्या; मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई : जे. एन. पी. ए. मार्फत(JNPA) मार्फत चौथ्या बंदराच्या भरावाच्या कामामुळे मोरा गावातील मच्छीमारांचे झालेले

लग्न जमेना म्हणून तरुणाची भन्नाट कल्पना, थेट बॅनरवर पठ्ठ्याने लिहिलं असं काही की तुम्हांलाही ऐकून धक्का बसेल

पुणे : लग्न जमत नाही म्हणून अनेक तरुण सध्या नैराश्यात दिसत आहे. मुलीच्या तसेच वडिलांच्या एकंदरीतच

भोंदू अशोक खरातच्या अडचणीत वाढ, कुटुंबियांचीही वाढणार अडचण; कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर..., हालचालींना वेग

नाशिक : संपूर्ण देशालाच हादरवून सोडणाऱ्या भोंदू अशोक खरातच्या (Ashok Kharat) अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.

Santosh Deshmukh : 'त्यांच्यावर कुटुंबीयांचा दबाव'..., मस्साजोगच्या सरपंचपदाच्या उमेदवाराचा खळबळजनक आरोप

संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या सरपंच संतोष देशमुख ( Santosh Deshmukh ) यांच्या मस्साजोग या गावात राजकीय वातावरण रंगले