श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय


विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने जिंकत भारताने मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. अर्धशतकवीर शफाली वर्मा सामनावीर झाली.





मालिकेतील पहिले दोन्ही सामने विशाखापट्टणम येथे झाले. पहिल्या सामन्यात भारताने आठ विकेट राखून विजय मिळवला. तर दुसऱ्या सामन्यात भारताने सात विकेट राखून विजय मिळवला. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेने वीस षटकांत नऊ बाद १२८ धावा केल्या तर भारताने ११.५ षटकांत तीन बाद १२९ धावा केल्या.


श्रीलंकेकडून विश्मी गुणरत्नेने एक, चामरी अथापथ्थुने ३१, हसिनी परेराने २२, हर्षिता समरविक्रमने (धावचीत) ३३, कविशा दिलहारीने १४, नीलक्षीका सिल्वाने दोन, कौशानी नुथ्यांगनाने (धावचीत) ११, शशिनी गिम्हणीने शून्य, काव्या कविंदीने (धावचीत) एक, मल्की मदाराने एक धावांचे योगदान दिले. भारताकडून श्री चरणी आणि वैष्णवी शर्माने प्रत्येक दोन तर स्नेह राणा आणि क्रांती गौडने प्रत्येकी एक विकेट घेतली.





धावांचा पाठलाग करणाऱ्या भारताकडून स्मृती मंधानाने १४, शफाली वर्माने नाबाद ६९, जेमिमा रॉड्रिग्जने २६, हरमनप्रीत कौरने १०, रिचा घोषने नाबाद एक धावांचे योगदान दिले. श्रीलंकेकडून कविशा दिलहारी, मल्की मदारा आणि काव्या कविंदी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.


Comments
Add Comment

Jasprit Bumrah : बुमराह श्रीलंका दौऱ्याला मुकणार ? दुखापतीमुळे निवड समितीसमोर पर्यायांचा प्रश्न

नवी दिल्ली : भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) १५ ऑगस्टपासून गाले येथे सुरू होणाऱ्या

Abhishek Sharma : अभिषेक शर्माचा धूमधडाका, ९१ चेंडूत केल्या एवढ्या धावा की प्रतिस्पर्धी धास्तावले

नवी दिल्ली : अमृतसर विरुद्ध तरन तारन मेन सिनिअर या स्थानिक सामन्यात भारतीय क्रिकेट टीमचा सलामीवीर अभिषेक शर्मा

Hardik Pandya : हार्दिक पांड्यानं घेतला मोठा निर्णय, महिकासोबत घेतलं तिरुपतीच्या बालाजीचं दर्शन

तिरुपती : दुखापतीमुळे भारतीय संघाबाहेर असलेला क्रिकेटपटू हार्दिक पांड्या सध्या चर्चेत आहे.

Duleep Trophy 2026 Tilak Varma : तिलक वर्माच्या खांद्यावर मोठी जबाबदारी! दुलीप ट्रॉफीत दक्षिण विभागाचे कर्णधारपद; करुण नायरलाही संधी

मुंबई : भारताच्या टी-20 संघाचा उपकर्णधार तिलक वर्मा (Tilak Varma) याच्यावर बीसीसीआयने (BCCI) आणखी एक मोठी जबाबदारी सोपवली आहे. 23

Commonwealth Games 2026 : ग्लासगो कॉमनवेल्थ गेम्स २०२६ मध्ये भारतानं जिंकली ३९ पदकं, समारोप सोहळ्यात दिसेल अहमदाबाद २०३० ची झलक

ग्लासगो : स्कॉटलँडच्या ग्लासगो शहरात सुरू असलेल्या राष्ट्रकुल २०२६ अर्थात

Commonwealth Games 2026 : भूसुरुंगाच्या स्फोटात पाय गमावला, पण जिद्द सोडली नाही; बॉक्सर ते सुवर्णपदक विजेता ठरलेला सोमन राणा

ग्लासगो: २०२६ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी आपल्या प्रेरणादायी प्रवासातून संपूर्ण