Navneet Rana : "हिंदूंनी किमान ३-४ मुलांना जन्म द्यावा"; लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून नवनीत राणांचा 'हुंकार', मौलाना कादरीला सडेतोड उत्तर

अमरावती : लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. मौलाना सय्यद कादरी यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल केलेल्या एका वादग्रस्त विधानाचा समाचार घेताना, नवनीत राणा यांनी हिंदू समाजाला थेट आवाहन केले आहे. "जर समोरून उघडपणे लोकसंख्या वाढवण्याचे आव्हान दिले जात असेल, तर आपणही मागे राहता कामा नये," अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.



"हिंदुस्थानला पाकिस्तान बनवण्याचा विचार"; राणांचा हल्लाबोल




मौलाना सय्यद कादरी यांनी अलिकडेच, "मला चार बायका आणि १९ मुले आहेत," असे वक्तव्य केले होते. यावर प्रतिक्रिया देताना नवनीत राणा म्हणाल्या, "त्यांचा हा विचार आपल्या हिंदुस्थानला पाकिस्तान बनवण्याचा आहे. जर कुणी उघडपणे सांगत असेल की त्यांना इतकी मुले आहेत, तर आपण एका मुलावरच का समाधान मानायचे? मी सर्व हिंदू समाजाला आवाहन करते की, आपणही किमान तीन ते चार मुले जन्माला घातली पाहिजेत. यामध्ये कोणतेही दुमत असण्याचे कारण नाही." लोकसंख्येचा समतोल राखण्यासाठी हिंदूंनी आता विचार करण्याची वेळ आली आहे, असा दावाही त्यांनी यावेळी केला.



पवार कुटुंबाच्या 'मनोमिलना'वर भाष्य


राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडींवर बोलताना नवनीत राणा यांनी मवाळ भूमिका घेतली. "शरद पवार हे महाराष्ट्राचे अत्यंत वरिष्ठ नेते आहेत. अजित पवार आणि शरद पवार हे शेवटी एकाच कुटुंबातील सदस्य आहेत. अजित पवारांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते की, शरद पवारांच्या सल्ल्यानेच ते भाजपसोबत गेले होते. त्यामुळे जर दोन पवार पुन्हा एकत्र येत असतील, तर ही स्वागतार्ह बाब आहे. कुटुंब एकत्र येणे कधीही चांगलेच असते," असे मत त्यांनी व्यक्त केले.



राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण


नवनीत राणा यांच्या लोकसंख्या वाढीच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. विशेषतः निवडणुकीच्या वातावरणात त्यांनी थेट 'मुलांच्या संख्ये'वरून हिंदू समाजाला साद घातल्याने विरोधकांकडून यावर काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे पवार कुटुंबाबद्दलच्या त्यांच्या विधानाने महायुतीमधील भविष्यातील समीकरणांवरही चर्चा सुरू झाली आहे.

Comments
Add Comment

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार