Navneet Rana : "हिंदूंनी किमान ३-४ मुलांना जन्म द्यावा"; लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून नवनीत राणांचा 'हुंकार', मौलाना कादरीला सडेतोड उत्तर

अमरावती : लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. मौलाना सय्यद कादरी यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल केलेल्या एका वादग्रस्त विधानाचा समाचार घेताना, नवनीत राणा यांनी हिंदू समाजाला थेट आवाहन केले आहे. "जर समोरून उघडपणे लोकसंख्या वाढवण्याचे आव्हान दिले जात असेल, तर आपणही मागे राहता कामा नये," अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.



"हिंदुस्थानला पाकिस्तान बनवण्याचा विचार"; राणांचा हल्लाबोल




मौलाना सय्यद कादरी यांनी अलिकडेच, "मला चार बायका आणि १९ मुले आहेत," असे वक्तव्य केले होते. यावर प्रतिक्रिया देताना नवनीत राणा म्हणाल्या, "त्यांचा हा विचार आपल्या हिंदुस्थानला पाकिस्तान बनवण्याचा आहे. जर कुणी उघडपणे सांगत असेल की त्यांना इतकी मुले आहेत, तर आपण एका मुलावरच का समाधान मानायचे? मी सर्व हिंदू समाजाला आवाहन करते की, आपणही किमान तीन ते चार मुले जन्माला घातली पाहिजेत. यामध्ये कोणतेही दुमत असण्याचे कारण नाही." लोकसंख्येचा समतोल राखण्यासाठी हिंदूंनी आता विचार करण्याची वेळ आली आहे, असा दावाही त्यांनी यावेळी केला.



पवार कुटुंबाच्या 'मनोमिलना'वर भाष्य


राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडींवर बोलताना नवनीत राणा यांनी मवाळ भूमिका घेतली. "शरद पवार हे महाराष्ट्राचे अत्यंत वरिष्ठ नेते आहेत. अजित पवार आणि शरद पवार हे शेवटी एकाच कुटुंबातील सदस्य आहेत. अजित पवारांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते की, शरद पवारांच्या सल्ल्यानेच ते भाजपसोबत गेले होते. त्यामुळे जर दोन पवार पुन्हा एकत्र येत असतील, तर ही स्वागतार्ह बाब आहे. कुटुंब एकत्र येणे कधीही चांगलेच असते," असे मत त्यांनी व्यक्त केले.



राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण


नवनीत राणा यांच्या लोकसंख्या वाढीच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. विशेषतः निवडणुकीच्या वातावरणात त्यांनी थेट 'मुलांच्या संख्ये'वरून हिंदू समाजाला साद घातल्याने विरोधकांकडून यावर काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे पवार कुटुंबाबद्दलच्या त्यांच्या विधानाने महायुतीमधील भविष्यातील समीकरणांवरही चर्चा सुरू झाली आहे.

Comments
Add Comment

Pankaj Bhoyar : "ठाकरे बंधूंच्या युतीचा मुंबईत काहीही परिणाम होणार नाही"; गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा जालन्यातून टोला

जालना : "आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी कोणाशीही किंवा एकमेकांशी युती केली

Sanjay Shirsat : "तुमचा डबा रुळावरून घसरलाय, आता काठावर बसा"; मंत्री शिरसाटांचा उद्धव ठाकरेंना टोला

छत्रपती संभाजीनगर : "उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटाचा जीव केवळ मुंबईत अडकलेला आहे. नगरपालिका निवडणुकीत

Ladki Bahin Yojna : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेच्या ४० लाख महिला अपात्रतेच्या उंबरठ्यावर?

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक

धाराशिवमध्ये हिट अँड रन, ऊसतोड मजुरांना उडवले

धाराशिव : धाराशिवमधील कळंब लातूर रस्त्यावर हिट हिट अँड रनची घटना घडली. भरधाव वेगाने आलेल्या कारने ऊसतोड

Devendra Fadanvis : पाच वर्षांनंतरही राज्यात महायुतीच दिसणार; मुख्यमंत्री फडणवीसांना विश्वास

गोंदिया : राज्यात सध्या सुरू असलेल्या विविध राजकीय चर्चा आणि अफवांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

लोणावळ्यात महिलेचा फळविक्रेती ते नगरसेविकापर्यंतचा प्रवास

लोणावळा : लोणावळ्यातील फळविक्रेती भाग्यश्री जगताप यांच्यावर मतदारांनी मोठा विश्वास दाखवत त्यांना नगरसेविका