गुगलकडून व्यक्ती सुरक्षेसाठी सर्वात मोठे ईएलएस फिचर लाँच आता केवळ ११२ नंतर दाबा पुढे....

मोहित सोमण: तुमच्या आयुष्यात खूप कधी कधी संकट येते मात्र तांत्रिक सुरक्षेची वानवा असल्याने अनेकदा व्यक्तींना संकटाला सामोरे जावे लागते हेच अधोरेखित करताना गुगलने भारतात पहिल्यांदाच अँडव्हान्स सिक्युरिटी फिचर आणले आहे. लवकरच अँड्रॉईड ६.० व त्यावर ओएस असलेल्या स्मार्टफोनमध्ये इन बिल्ट गुगलचे सिक्युरिटी असलेले ईएलएस (Emergency Location Service) दाखल होईल. कंपनीकडून या फिचरचे यशस्वी टेस्टिंग झाले असून काही दिवसांत गुगल युजर्सला हे फिचर रोल आऊट करण्यात येणार आहे. अनेकदा प्रथमदर्शनी उपलब्ध असलेल्या पर्यायात आपात्कालीन फोन (Emergency Phone) करताना लोकेशन ट्रॅकिंग करताना समस्या भेडसावत असे. अचूक लोकेशनचा अभाव तांत्रिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या फिचर्सला बदलण्यासाठी गुगलने ईएलएस प्रणाली बाजारात आणली आहे.


नव्या पर्यायात पैसे मोजावे लागणार नाही. हे संपूर्णपणे मोफत फिचर असल्याचे कंपनीने आपल्या माहितीत स्पष्ट केले आहे. ११२ क्रमांक डायल केल्यावरच हे फिचर युजरला वापरता येणार आहे. क्रमांक ११२ व्यतिरिक्त इतर संकटकालीन क्रमांक डायल केल्यावर हे फिचर्स आपोआप लागू होणार आहे. त्यामुळे संबंधित व्यक्तीची माहिती ज्यांना पाठवून निर्देशित केली गेली आहे त्यांना तंतोतंत लोकशन व इतर माहिती या फिचरमधून मिळणार आहे. ६० हून अधिक देशात गुगल हे फिचर रोल आऊट करणार आहे.


कंपनीने यावर भाष्य करताना,'आम्हाला हे जाहीर करताना खूप आनंद होत आहे की ही सेवा आता भारतात प्रथमच सक्रिय करण्यात आली आहे आणि उत्तर प्रदेश हे अँड्रॉइडमध्ये ELS पूर्णपणे कार्यान्वित करणारे पहिले भारतीय राज्य बनले आहे. उत्तर प्रदेश पोलिसांद्वारे एकत्रित आणि पर्ट टेलिकॉम सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड (पर्टसोल) द्वारे कार्यान्वित, ELS संपूर्ण राज्यातून 112 आपत्कालीन सेवेला दररोज मिळणाऱ्या लाखो कॉल्स आणि एसएमएस संदेशांना पाठिंबा देते' असे म्हटले.


या फिचरची गुगलने यशस्वी टेस्टिंग केली तेव्हा गुगलने आपला अनुभवही शेअर केला आहे. याविषयी अधिक बोलताना, ही सेवा राज्यातील सर्व सुसंगत अँड्रॉइड उपकरणांवर (आवृत्ती 6.0 आणि त्यापुढील) सुरू करण्यापूर्वी काही महिने प्रायोगिक तत्त्वावर तपासली गेली, तेव्हा त्याचे परिणाम अत्यंत उत्साहवर्धक होते. अँड्रॉइडमधील ELS ने २० दशलक्षाहून अधिक कॉल्स आणि एसएमएस संदेशांना पाठिंबा दिला असून आणि कॉल कनेक्ट झाल्यानंतर काही सेकंदातच खंडित झाले तरीही कॉलरचे स्थान ओळखले आहे ' असे आपल्या निवेदनात कंपनीने म्हटले आहे.


मशीन लर्निंगवर अवलंबून असलेल्या याअँड्रॉइड फ्यूज्ड लोकेशन प्रोव्हायडरद्वारे उपलब्ध झालेले हे फिचर मदत मागणाऱ्या व्यक्ती कोठेही असल्या तरी आपत्कालीन सेवांना अचूक स्थान प्रदान करते असेही कंपनीने आपल्या अधिकृत निवेदनात स्पष्ट केले.


उत्तर प्रदेश आणि जगभरातील आपत्कालीन प्रतिसादकर्त्यांना (Respondent) त्यांच्या सर्वात कठीण क्षणी लोकांना मदत करण्याच्या प्रेरणादायी प्रयत्नांमध्ये पाठिंबा देताना आम्हाला अभिमान वाटतो असे म्हणत कंपनीने पुढे म्हटले आहे की,'आम्हाला आशा आहे की भारतातील इतर राज्ये देखील त्यांच्या स्थानिक आपत्कालीन सेवांच्या जीवनरक्षक हस्तक्षेपांना आणखी मजबूत करण्यासाठी या तंत्रज्ञानाच्या संभाव्यतेचा शोध घेतील.'

Comments
Add Comment

Vaibhav Sooryavanshi : टीम इंडियात निवड होताच वैभवची सचिनशी तुलना! वैभवच्या वडिलांचं वक्तव्य चर्चेत; "तुलना करणं योग्य नाही..."

मुंबई : १५ वर्षीय (15-year-old) युवा क्रिकेटपटू (Young Cricketer) वैभव सूर्यवंशी याची अखेर टीम इंडिया (Team India) मध्ये निवड झाली आहे. या

Major Diplomatic Twist India-Nepal Meeting : नेपाळचा भारताकडे स्पष्ट कल! दिल्लीतील उच्चस्तरीय बैठकीनंतर चीनची चिंता वाढली

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील ताज हॉटेलमध्ये शनिवारी भारत आणि नेपाळ यांच्यात महत्त्वपूर्ण उच्चस्तरीय बैठक

Maharashtra Monsoon : महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार! रविवारी विजांच्या कडकडाटासह मुसळधार सरींचा अंदाज; २५ जिल्ह्यांना येलो अलर्ट

मुंबई : महाराष्ट्रात रविवारचा दिवस पावसाळी ठरण्याची शक्यता असून भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यातील २५

Mumbai Local Train Mega Block : पश्चिम, हार्बर आणि मध्य रेल्वेवर रविवारी ब्लॉक; अनेक लोकल फेऱ्या रद्द, प्रवाशांनी वेळापत्रक तपासूनच प्रवास करावा

मुंबई : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी. रेल्वे प्रशासनाकडून देखभाल व दुरुस्तीच्या कामांसाठी रविवारी पश्चिम

Multi Tunneling Mumbai :मुंबईत उभारणार बोगद्यांचे जाळे ; ४,३९२ कोटींचा खर्च अपेक्षित

मुंबई : मुंबईत सातत्याने पायाभूत सुविधांचे जाळे उभारले जात असले, तरी रस्त्यांवरील वाहतूक कोंडीची समस्या अद्याप

The Mithi River : मिठी नदीतील भराव संरक्षक भिंतीच्या बांधकामासाठीच

मुंबई : मिठी नदीत कंत्राटदाराकडून बांधकामाचा राडारोडा (डेब्रीज) टाकून आणि त्यात चिखल मिसळून भ्रष्टाचार केला जात