Eknath Shinde : "नकली घर पे बैठे है और असली..."; विजयाचा गुलाल उधळत एकनाथ शिंदेंची उबाठावर घणाघाती टीका

मुंबई : राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत महायुतीने मिळवलेल्या देदीप्यमान यशानंतर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा जंगी सत्कार केला. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना शिंदेंनी शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर अत्यंत बोचऱ्या शब्दांत टीका केली. "नकली सगळे घरात बसले आहेत आणि असली माझ्या समोर बसले आहेत," अशा शब्दांत त्यांनी ठाकरेंना डिवचले.



'चांदा ते बांदा' शिवसेनेची ताकद वाढली


निवडणुकीच्या निकालावर भाष्य करताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, "आज आपला पक्ष खऱ्या अर्थाने राज्यभर पोहोचला आहे. चांदा ते बांदापर्यंत धनुष्यबाणाने झेप घेतली आहे. कोकणात तर पूर्णपणे 'वन साईड' निवडणूक झाली असून विरोधकांचा सुपडा साफ झाला आहे. तुम्ही मिळवलेला हा विजय केवळ मोठा नाही, तर ऐतिहासिक आहे. जनतेने कोणाची शिवसेना 'असली' आहे, यावर शिक्कामोर्तब केले आहे."



"सत्य परेशान हो सकता है, पराजित नही!"




सत्तासंघर्ष आणि निवडणूक निकालांचा संदर्भ देत शिंदे पुढे म्हणाले, "सत्य परेशान हो सकता है, लेकिन पराजित नही हो सकता. आम्हाला संपवण्याचे अनेक प्रयत्न झाले, पण सत्याचा विजय झाला आहे. सांगोला जिल्ह्यात शहाजीबापू पाटील यांनी तर सर्वांनाच आडवे केले आहे." शहाजीबापूंच्या विजयाचा उल्लेख करताच एकच हशा आणि टाळ्यांचा कडकडाट झाला.



महायुतीची सरशी ; भाजप-शिवसेना ठरले अव्वल


२१ तारखेला जाहीर झालेल्या निकालात महायुतीने विरोधकांना धोबीपछाड केलं आहे. भारतीय जनता पक्ष हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला असून, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष म्हणून उदयास आली आहे. या विजयामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला असून, आगामी महापालिका निवडणुकांसाठी हे मोठे बळ मानले जात आहे.



कार्यकर्त्यांना विजयाचा मंत्र


नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचे कौतुक करताना शिंदेंनी त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले. "निवडणुका संपल्या आहेत, आता लोकांच्या कामांना प्राधान्य द्या. विकासाच्या जोरावरच आपण पुन्हा एकदा जनतेचा विश्वास संपादन केला आहे आणि हेच सातत्य आपल्याला पुढेही टिकवायचे आहे," असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Comments
Add Comment

Water crisis : पावसाच्या लपंडावामुळे राज्यावरील जलसंकट कायम

 गेल्या वर्षापेक्षा १२ टक्के कमी साठा; २२ जिल्ह्यांतील ७३७ गावांना आजही टँकरचा आसरा मुंबई : राज्याच्या बहुतांश

Bandra kidnapping : घराबाहेरून अचानक बेपत्ता झाल्या मुली; मुंबई पोलिसांच्या एका गुप्त फोन कॉलने आणि...

मुंबईतून अपहरण झालेल्या दोन अल्पवयीन मुलींची उत्तराखंडमधून सुखरूप सुटका; आरोपी अटकेत मुंबई : मुंबईच्या वांद्रे

Nitesh Rane : नवी मुंबई ते सिंधुदुर्ग विमानसेवा १५ ऑगस्टपासून - पालकमंत्री नितेश राणे

- गणेशोत्सवापूर्वी कोकणवासीयांना मोठा दिलासा मुंबई : गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाच, मुंबईत

SIR Form : मतदारांसाठी दिलासा! राज्यातील निवडणूक आयोगाच्या SIR मोहिमेला दहा दिवसांची मुदतवाढ

मुंबई : मतदार यादी अधिक अचूक आणि अद्ययावत करण्यासाठी सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (maharashtra  - SIR) अभियानाला

Mumbai Water Stock : मुंबईला दिलासा! तलावक्षेत्रात मुसळधार पाऊस; जलसाठा ४८.६६% वर, दोन तलाव ओव्हरफ्लो

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जलसाठ्यात वेगाने वाढ होत

Vinayak Raut : विनायक राऊतांच्या अडचणी वाढल्या; २३ जुलैच्या सुनावणीपूर्वी कोर्टाने दिला मोठा झटका

मुंबई : ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. सून गिरीजा राऊत (Girija Raut)