Eknath Shinde : "नकली घर पे बैठे है और असली..."; विजयाचा गुलाल उधळत एकनाथ शिंदेंची उबाठावर घणाघाती टीका

मुंबई : राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत महायुतीने मिळवलेल्या देदीप्यमान यशानंतर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा जंगी सत्कार केला. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना शिंदेंनी शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर अत्यंत बोचऱ्या शब्दांत टीका केली. "नकली सगळे घरात बसले आहेत आणि असली माझ्या समोर बसले आहेत," अशा शब्दांत त्यांनी ठाकरेंना डिवचले.



'चांदा ते बांदा' शिवसेनेची ताकद वाढली


निवडणुकीच्या निकालावर भाष्य करताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, "आज आपला पक्ष खऱ्या अर्थाने राज्यभर पोहोचला आहे. चांदा ते बांदापर्यंत धनुष्यबाणाने झेप घेतली आहे. कोकणात तर पूर्णपणे 'वन साईड' निवडणूक झाली असून विरोधकांचा सुपडा साफ झाला आहे. तुम्ही मिळवलेला हा विजय केवळ मोठा नाही, तर ऐतिहासिक आहे. जनतेने कोणाची शिवसेना 'असली' आहे, यावर शिक्कामोर्तब केले आहे."



"सत्य परेशान हो सकता है, पराजित नही!"




सत्तासंघर्ष आणि निवडणूक निकालांचा संदर्भ देत शिंदे पुढे म्हणाले, "सत्य परेशान हो सकता है, लेकिन पराजित नही हो सकता. आम्हाला संपवण्याचे अनेक प्रयत्न झाले, पण सत्याचा विजय झाला आहे. सांगोला जिल्ह्यात शहाजीबापू पाटील यांनी तर सर्वांनाच आडवे केले आहे." शहाजीबापूंच्या विजयाचा उल्लेख करताच एकच हशा आणि टाळ्यांचा कडकडाट झाला.



महायुतीची सरशी ; भाजप-शिवसेना ठरले अव्वल


२१ तारखेला जाहीर झालेल्या निकालात महायुतीने विरोधकांना धोबीपछाड केलं आहे. भारतीय जनता पक्ष हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला असून, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष म्हणून उदयास आली आहे. या विजयामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला असून, आगामी महापालिका निवडणुकांसाठी हे मोठे बळ मानले जात आहे.



कार्यकर्त्यांना विजयाचा मंत्र


नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचे कौतुक करताना शिंदेंनी त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले. "निवडणुका संपल्या आहेत, आता लोकांच्या कामांना प्राधान्य द्या. विकासाच्या जोरावरच आपण पुन्हा एकदा जनतेचा विश्वास संपादन केला आहे आणि हेच सातत्य आपल्याला पुढेही टिकवायचे आहे," असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Comments
Add Comment

Food Poisoning : मुंबईत धक्कादायक प्रकार! 'आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं...'; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

मुंबई : मुंबईतील पायधूनी परिसरात एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली असून विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चार जणांचा

Mumbai-Bhopal Flight Accident : मुंबई ते भोपाळ विमानाचे इमर्जन्सी लँडिंग; १६६ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले

मुंबई : विमान अपघाताच्या अनेक घटना या समोर येत आहेत. अहमदाबादची एक भयंकर मोठी विमान दुर्घटनेच्या आठवणी आजही

Marine Drive Accident : मरीन ड्राईव्हवर पहाटे भीषण थरार! मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या तिघांचा मृत्यू

मुंबई : मुंबईत सोमवार, २७ एप्रिल रोजी पहाटे मरीन ड्राईव्ह परिसरात भीषण अपघात घडला असून यात तिघांचा मृत्यू झाला

अमेरिकेच्या येल विद्यापिठाचा विद्यार्थी करणार मुंबई बंदर, माथाडी कामगार, शहराचा विकासावर पीएचडी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) अमेरिकेच्या येल विद्यापिठाच्या इतिहास विभागातील विद्यार्थी हा , विसाव्या शतकातील

Malad BMC School : मालाड पश्चिममधील अतिधोकादायक नेमाणी शाळेत शिकतात महापालिकेची मुले

- भाजप नगरसेविकेने शिक्षण समितीच्या बैठकीत शाळा बंद करण्याची केली मागणी - पर्यायी शाळा लिबर्टी गार्डन शाळेत सुरु

BMC News : महापालिकेच्या स्टॉल्सचा परवाना अविवाहित व्यक्तीच्या मृत्यूनंतर आई, वडिलांच्या नावे होणार

- भाऊ आणि बहिणीच्या नावे करण्यास प्रशासनाने दर्शवला ठाम नकार मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेचे स्टॉल्स