Devendra Fadanvis : पाच वर्षांनंतरही राज्यात महायुतीच दिसणार; मुख्यमंत्री फडणवीसांना विश्वास

गोंदिया : राज्यात सध्या सुरू असलेल्या विविध राजकीय चर्चा आणि अफवांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्णविराम दिला आहे. गोंदिया दौऱ्यावर असताना प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी महायुतीच्या भविष्याबद्दल अत्यंत महत्त्वाचे विधान केले. "ऐकीव गोष्टींवर प्रतिक्रिया देणे हे आमचे तत्व नाही, मात्र राज्यात महायुती पूर्णपणे भक्कम आहे," असे त्यांनी ठामपणे सांगितले.



स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांबाबत विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले की, "या निवडणुका त्या-त्या ठिकाणच्या स्थानिक परिस्थितीनुसार लढवल्या जातात. स्थानिक समीकरणे वेगळी असू शकतात, मात्र याचा अर्थ महायुतीत फूट असा होत नाही." महायुतीमधील तिन्ही पक्ष (भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस) राज्यात पूर्ण समन्वयाने काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. फडणवीस पुढे म्हणाले, "आमची महायुती कायम आहे आणि ती यापुढेही कायमच राहणार आहे. केवळ हे पाच वर्षच आमचे सरकार राहणार नाही, तर पाच वर्षांनंतर जेव्हा पुन्हा विधानसभा निवडणुका समोर येतील, तेव्हाही ही महायुतीच तुम्हाला मैदानात दिसेल." या विधानामुळे मुख्यमंत्र्यांनी केवळ सध्याच्या सत्तेचा दावा केला नाही, तर भविष्यातील प्रदीर्घ राजकीय नियोजनाचे संकेतही दिले आहेत. विरोधकांकडून पसरवल्या जाणाऱ्या 'नॅरेटिव्ह'ला उत्तर देताना त्यांनी महायुतीमधील एकजूट अधोरेखित केली.

Comments
Add Comment

रब्बी हंगामातील 'ई-पीक पाहणी'ला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

- ४५ टक्के शेतकरी अजूनही प्रक्रियेबाहेर; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : राज्यातील रब्बी

ग्रामीण भागातील घरबांधणी आता होणार सुलभ; बांधकाम परवानगीचे अधिकार तालुका स्तरावर देण्याचे संकेत!

- मंत्री उदय सामंत यांचे विधानपरिषदेत आश्वासन मुंबई : राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना आपल्या घराच्या

Jalna: गॅस एजन्सीचे गोडाऊन फोडले अन् ११० सिलिंडर चोरले, जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जालना: जालना तालुक्यातील रामनगर परिसरात गॅस एजन्सीच्या गोडाऊनमध्ये चक्क गॅस सिलिंडरची मोठी चोरी झाल्याचा

Weather Update: महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांना अलर्ट, ताशी ३० ते ५० किमी वेगाने वारे वाहणार

मुंबई: महाराष्ट्रावर ऐन उन्हाळ्यात अस्मानी संकट घोंघावत आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला उष्णतेच्या लाटेने

लालपरीचा कायापालट, २२ हजार बसेस पूर्णपणे बदलणार; मंत्री सरनाईकांची माहिती

मुंबई : ग्रामीण महाराष्ट्राची लाईफलाईन मानली जाणारी लालपरी आता मोठ्या बदलाच्या दिशेने वाटचाल करत आहे. राज्य

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, गॅस बुकींगनंतर ९६ तासांत सिलेंडर घरपोच होणार; जिल्हाधिकाऱ्यांचे एजन्सींना आदेश

पुणे: मराठी नववर्षारंभ म्हणजेच गुढी पाडव्याचा सण अवघ्या दोन-तीन दिवसांवर येऊन ठेपला असताना गॅस टंचाईमुळे