तलावपाळीवर नववर्षाचे स्वागत गंगा आरतीने !

३१ डिसेंबरच्या रात्री कार्यक्रम; वाराणसीहून पंडितांना आमंत्रण


ठाणे : ठाणे शहर येत्या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी खास अंदाजात सज्ज होत आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री तलावपाळीच्या काठावर विशेष गंगा आरती आयोजित करण्यात येणार आहे. तलावपाळीवर नेहमी गुढी पाडवा, दीपोत्सव आणि गंगा आरतीसारखे कार्यक्रम होत असतात, पण यंदा आयोजकांनी निर्णय घेतला की नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला गंगा आरती होईल.


स्रोतांनी दिलेल्या माहितीनुसार, ही आरती रात्री १०:३० वाजता सुरू होऊन १२:०१ वाजेपर्यंत चालेल. कार्यक्रमाचे आयोजन श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक ट्रस्ट करत आहे, जे अनेक वर्षांपासून ठाणे शहरात सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम राबवत आहे. यंदा श्रीकौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाचे २६ वे वर्ष आहे. गेल्या अनेक वर्षांपासून गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाचे स्वागत मोठ्या जल्लोषात केले जाते. शहरात स्वागत यात्रेचे आयोजन
करण्यात येते.


यावेळी तलावाच्या सभोवताली आकर्षक रोषणाई केली जाईल. हा अनुभव नेत्रदीपक असा असतो. हे पाहण्यासाठी शहरातील विविध भागातून नागरिक येत असतात. यंदाच्या कार्यक्रमात वाराणसीतील अनुभवी पंडितांना विशेष आमंत्रित करण्यात आले आहे. पंडित पारंपरिक मंत्र आणि विधींनी गंगा आरती करतील, ज्यामुळे श्रद्धाळूंना तलावपाळीवर काशी-हरिद्वारसारखा आध्यात्मिक अनुभव मिळेल. ठाणेकरांसाठी हा कार्यक्रम नवीन वर्षाची सुरुवात आध्यात्मिक आणि सजीव अनुभवासह साजरा करण्याचा अनोखा योग असेल. नववर्षाचे स्वागत भक्तीमय वातावरणात करण्याची अनोखी संधी नागरिकांना मिळणार आहे.


Comments
Add Comment

एसी ऑफिस सोडून मातीच्या गोण्या उचलल्या!

मोखाडा गटविकास अधिकाऱ्यांचे जलसंधारणासाठी श्रमदान मोखाडा : सरकारी योजना केवळ कागदावर किंवा आदेशापुरत्या

ठाण्यात भाजप-शिंदे गटात जागावाटपाच्या वाटाघाटी

भाजपची ५० जागांची मागणी ठाणे : आगामी ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गट आणि भाजप

अंबरनाथमध्ये २०८ बोगस मतदार !

भाजपचा शिवसेनेच्या शिंदे गटावर आरोप, पोलीस चौकशी सुरू अंबरनाथ : अंबरनाथ नगरपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान खळबळजनक

Mira-Bhayandar Leopard Attack : होणाऱ्या नवरीवर बिबट्याची झडप: चेहऱ्यावर गंभीर जखमा अन्…नेमकं काय घडलं त्या घरात? मीरा भाईंदर हादरलं!

मीरा भाईंदर : पुणे आणि नागपूरनंतर आता मुंबईलगतच्या मीरा भाईंदर शहरात बिबट्याच्या वावराने मोठी खळबळ उडाली आहे.

पुलाच्या कामामुळे कल्याणमध्ये वाहतूक मार्गात २० दिवस बदल , वालधुनी उड्डाणपुलावर काम सुरू

कल्याण : कल्याण पश्चिम आणि कल्याण पूर्वेला जोडणारा वालधुनी उड्डाणपूल दुरुस्तीच्या कामासाठी काही काळ

वाशी सुविधा केंद्रातून हंगामातील डाळिंबाचा पहिला कंटेनर समुद्र मार्गे अमेरिकेसाठी रवाना - पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती

जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी राज्याची पणन व्यवस्था अत्याधुनिक व सर्व सोयी-सुविधायुक्त करण्यासाठी शासन