कर संकलनामध्ये भारताची विक्रमी झेप, सरकारच्या तिजोरीत १७.०४ लाख कोटी जमा

नवी दिल्ली  : चालू आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेसाठी देशाच्या दिलासादायक बातमी आहे. १ एप्रिल ते १७ डिसेंबर या कालावधीत भारताच्या प्रत्यक्ष करसंकलनात ८ टक्क्यांची वाढ झाली असून, एकूण महसूल १७.०४ लाख कोटी रुपये इतका झाला आहे. विशेष म्हणजे, यंदा प्राप्तिकर परतावा देण्याची प्रक्रिया मंदावल्यामुळे निव्वळ करसंकलनाचा आकडा उंचावलेला दिसत आहे.


निव्वळ प्रत्यक्ष कर संकलनात ८.१७ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक कंपनी कर आणि सुमारे ८.४७ लाख कोटी रुपयांच्या वैयक्तिक प्राप्तिकराचा समावेश आहे. चालू आर्थिक वर्षात १७ डिसेंबरपर्यंत भांडवली रोखे कर अर्थात सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स (एसटीटी) मधून मिळणारा निव्वळ महसूल ४०,१९५ कोटी रुपये होता.


गेल्या वर्षाच्या तुलनेत प्राप्तिकर परतावा देण्याचे प्रमाण १४ टक्क्यांनी कमी होऊन २.९७ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक राहिले आहे. प्राप्तिकर विभागाच्या आकडेवारीनुसार, परतावा समायोजित करण्यापूर्वी, एकूण प्रत्यक्ष कर संकलनात १७ डिसेंबरपर्यंत ४.१६ टक्के वाढ नोंदवली गेली आणि ते २०.०१ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले.


केंद्र सरकारने चालू आर्थिक वर्षात (२०२५-२६) २५.२० लाख कोटी रुपयांचे प्रत्यक्ष कर संकलनाचे लक्ष्य निर्धारित केले आहे, जो वार्षिक आधारावर १२.७ टक्क्यांनी अधिक आहे. मात्र संकलनात आतापर्यंतची वाढ पाहता, ते निर्धारित लक्ष्य ओलांडेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये सरकारचे ‘एसटीटी’मधून ७८,००० कोटी रुपये जमा करण्याचे उद्दिष्ट आहे.

Comments
Add Comment

मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला