महायुती झाली; आघाडीसाठी खलबत्ते !

सर्वच राजकीय पक्षांचा सोबत लढण्यावर भर


विरार : वसई - विरार पालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी युती-आघाडीचा मार्ग धरल्याचे चित्र आहे. भाजप आणि शिवसेना (शिंदे गटाने) युतीची अधिकृत घोषणा नुकताच केली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटासह आरपीआय (आठवले) यांना देखील सोबत घेण्यात येणार असल्याचे महायुतीच्या नेत्यांनी स्पष्ट केले आले. तर दुसरीकडे बविआला सोबत घेऊन ही निवडणूक लढावी यासाठी, शिवसेना (उबाठा), काँग्रेस आणि मनसे या तीन राजकीय पक्षांनी बविआ कडे आघाडीचा प्रस्ताव ठेवला आहे. आगामी दोन तीन दिवसात आघाडीबाबत सुद्धा निर्णय होण्याची शक्यता आहे.


वसई - विरार महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांमध्ये आघाडी आणि महायुतीबाबत चर्चा होत आहेत.भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात दोन आठवड्यापूर्वीच युतीसंदर्भात प्राथमिक चर्चा झाली होती. त्यानंतर बुधवारी भाजप आणि शिवसेनेने (शिंदे गट) युती करून महापालिका निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले. या युतीबाबत शिवसेना शिंदे गटाचे आणि भाजपचे नेत्यांमध्ये संयुक्त बैठक झाली. त्यानंतर आमदार राजन नाईक आणि माजी आमदार रवींद्र फाटक यांनी युतीबाबतची माहिती प्रसार माध्यमांना दिली. युतीमध्ये भाजप - सेनेसह राष्ट्रवादी, आरपीआय (आठवले) आणि श्रमजीवी, आगरी सेना या संघटनांना महायुतीमध्ये सामील केल्याचे आमदार नाईक यांनी स्पष्ट केले. तर जागा वाटपाबद्दल स्थानिक स्तरावर चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे देखील ते पुढे म्हणाले. शनिवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वसई विरार दौऱ्यावर आहेत. या दिवशी शिवसेनेच्या जागा वाटपाचा विषय मार्गी लागण्याची शक्यता आहे.दरम्यान, एकीकडे महायुतीची घोषणा झाली असताना दुसरीकडे आघाडी साठी देखील चर्चा सुरु आहेत. नुकताच शिवसेना (उबाठा) गटाच्या नेत्यांनी बविआ अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांची भेट घेत पालिका निवडणूक आघाडी करून लढण्याबाबत चर्चा केली. त्यानंतर बुधवारी मनसे आणि काँग्रेसच्या नेत्यांनी सुद्धा ठाकूर यांच्याकडे आघाडीचा प्रस्ताव ठेवला आहे. पालिकेवर सलग दोन टर्म बहुजन विकास आघाडीची सत्ता राहिली आहे. परिणामी महायुतीला रोखण्यासाठी स्थानिक बविआ सोबत हातमिळवणी करण्याकरिता शिवसेना ( उबाठा ), काँग्रेस आणि मनसे हे तीनही पक्ष उत्सुक आहेत. या आघाडीबाबत प्राथमिक चर्चा झाल्या असून, येत्या दोन दिवसात अंतिम निर्णय होणार असल्याचे बविआ अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी सांगितले. तसेच केवळ बहुजन विकास आघाडीच्या बॅनर वर लढण्यासाठी प्रत्येक प्रभागातून ३० ते ४० अर्ज प्राप्त झाल्याचेही त्यांनी सांगितले. आगामी दोन-तीन दिवसांत आघाडीबाबत होणाऱ्या घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

Indian Fishermen : शिक्षा पूर्ण होऊनही १७८ भारतीय मच्छीमार पाकिस्तानच्या तुरुंगात

कॉन्स्युलर कराराचे उल्लंघन; डहाणू-तलासरीतील १८ कुटुंबांचा न्यायासाठी आक्रोश डहाणू : भारत-पाकिस्तानदरम्यान

Heavy Rain In Palghar : घोणसई गावाला पाण्याचा वेढा; मुख्य पूल पाण्याखाली

- मुख्य पूल बुडाल्याने गावाचा बाहेरील संपर्क खंडित वाडा : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार

Vasai-Virar Rain Update : वसई-विरारमध्ये पावसाचा कहर! पूर, वीज आणि इंटरनेट बंद; हजारो नागरिकांचे जनजीवन विस्कळीत

पालघर : वसई-विरार (Vasai- Virar) परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. सलग दोन

Vandri Dam Waterfall : धबधब्यावर जाताय? थांबा! पालघरच्या वांद्री धबधब्यावर घडला थरार

धबधब्यांवर पाणी अचानक वाढलं आणि पर्यटकांची उडाली तारांबळ पालघर : मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पालघर

Girish Mahajan : पालघर पूरस्थितीवर सरकार ॲक्शन मोडमध्ये; गिरीश महाजनांचा दौरा, अभ्यासगटाची घोषणा

पालघर : मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) पालघर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पूरस्थिती (Flood Situation) निर्माण झाली असून जनजीवन (Normal

Vasai Rain : मुसळधार पावसाचा फटका! वसईत इमारतीचा सज्जा कोसळला, रस्ते जलमय

वसई : मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरू असतानाच वसई (Vasai) परिसरात इमारतींशी संबंधित दुर्घटनांची (Building Accidents) मालिका सुरूच आहे.