SIR तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचा पश्चिम बंगाल दौरा, ३२०० कोटींचे प्रकल्प सुरू

मुंबई : सध्या पश्चिम बंगालमध्ये SIR मुद्द्यावरून तणावपूर्ण वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राज्य दौरा होत असल्याने राजकीय व प्रशासकीय पातळीवर विशेष हालचालींना वेग आला आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी २० डिसेंबर रोजी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर जाणार आहेत. सकाळी सुमारे ११.१५ वाजता ते नादिया जिल्ह्यातील राणाघाट येथे राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान उपस्थितांना संबोधितही करणार आहेत.


या दौऱ्यात पंतप्रधान सुमारे ३२०० कोटी रुपयांच्या दोन राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. यामध्ये नादिया जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३४ वरील ६६.७ किलोमीटर लांबीच्या बाराजागुली ते कृष्णनगर या मार्गाच्या चौपदरीकरणाचा समावेश आहे.


तसेच उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३४ वरील १७.६ किलोमीटर लांबीच्या बारासात ते बाराजागुली या मार्गाच्या चौपदरीकरणाची पायाभरणीही पंतप्रधान मोदी करणार आहेत.


हे दोन्ही प्रकल्प कोलकाता आणि सिलीगुडी यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरणार आहेत. या महामार्गांमुळे प्रवासाचा वेळ सुमारे दोन तासांनी कमी होण्याची शक्यता असून वाहतुकीचा प्रवाह अधिक सुरळीत होणार आहे. त्यामुळे वाहनांचा परिचालन खर्च कमी होण्यास मदत होईल तसेच कोलकाता, पश्चिम बंगालमधील इतर जिल्हे आणि शेजारील देशांशी संपर्क अधिक मजबूत होणार आहे.


या प्रकल्पांमुळे परिसरातील आर्थिक विकासाला चालना मिळणार असून पर्यटन क्षेत्रालाही मोठी गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

Budget 2026-27 : तब्बल १५० ठिकाणी पत्रकार परिषदा, सोशल मीडियावरील इन्फ्लुएंसर्सशी संवाद; 'या' आहेत भाजपच्या अर्थसंकल्पासाठीच्या योजना

अर्थमंत्री निर्मला सीतारमण १ फेब्रुवारी रोजी २०२६-२७ चा अर्थसंकल्प सादर करतील. अर्थसंकल्पात सुरू केलेल्या

धक्कादायक! आयटीचे छापे पडताच बंगळुरुतील प्रसिद्ध बिल्डरने संपवलं स्वतःचं आयुष्य

बंगळुरु पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कॉन्फिडंट ग्रुपचे अध्यक्ष सी जे रॉय यांनी स्वतःला गोळी झाडून

रायबरेलीत राहुल, सोनिया, प्रियंका गांधींविरुद्ध तक्रार

रायबरेली : काँग्रेस नेते राहुल गांधी आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाविरोधात उत्तर प्रदेशमधील रायबरेलीमध्ये

अयोध्येत रामाच्या दर्शनासाठी भाविकांची संख्या वाढली

पुजाऱ्यांना तीन पाळ्यांमध्ये काम करावे लागणार नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिराला आता दोन वर्षे पूर्ण झाली

शाळांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र शौचालय आणि सॅनिटरी पॅड अनिवार्य

सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक आदेश अन्यथा शाळांची मान्यता होणार रद्द नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने

Tirupati laddu : तिरुपती लाडू भेसळ प्रकरण : सीबीआयकडून मोठा खुलासा; लाडूमध्ये 'बीफ टॅलो' किंवा प्राण्यांची चरबी नसल्याचे स्पष्ट

नेल्लोर : संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या तिरुपती लाडू भेसळ प्रकरणात सीबीआयने (CBI) आपला अंतिम आरोपपत्र (Chargesheet)