भाईंदरच्या गल्लीत बिबट्याची दहशत, पारिजात निवासी सोसायटीत बिबट्याने केला तरुणीवर हल्ला

भाईंदर : भाईंदरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. दिवसेंदिवस बिबट्याची दहशत ही वाढत चालली असताना मीरा-भाईंदरच्या बीपी रोड मागच्या तलाव रोड परिसरातील साईबाबा हॉस्पिटलच्या शेजारी असलेल्या पारिजात इमारतीत एका घरात बिबट्या थेट घुसला. यावेळी एका घरात असलेल्या २५ वर्षांची एक तरूणी आणि ३ पुरूष असा एकूण चार जणांवर बिबट्याने हल्ला केला. घरातील व्यक्तींचा आरडाओरडा ऐकून आजूबाजूच्या लोकांना ही घटना समजली.


मिळालेल्या माहितीनुसार, बिबट्याच्या हल्ल्यात आत्तापर्यंत ३ जण जखमी झाले आहेत. अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्या बिबट्याा जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याची देखील माहिती समोर आली आहे. तसेच आजूबाजूच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहनही करण्यात आलं आहे .


वनविभागाचे अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले आहेत. मात्र घटनास्थळी नागरिकांची आणि बघ्यांची मोठी गर्दी जमल्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांनी बिबट्याला एका रूममध्ये बंद करून ठेवले असून त्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Comments
Add Comment

New Zealand's Suzie Bates : न्यूझीलंडच्या सुझी बेट्सचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय

मुंबई : न्यूझीलंडची दिग्गज क्रिकेटपटू सुझी बेट्सने महिला टी-२० विश्वचषकानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून

Dialysis facility : पश्चिम उनगरातील ३ आणि पूर्व उपनगरातील २ रुग्णालयात डायलेसिसची सुविधा

मुंंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेतील उपनगरीय रुग्णालयांमध्ये डायलेसीस केंद्र सुरु करण्यात येत असून

Mumbai : मुंबई महापालिकेच्यावतीने विद्यार्थीनींसाठी कांदिवलीत वसतीगृह

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्यावतीने गोरेगाव येथे नोकरदार महिलांसाठी वसतीगृह सुरु करण्यात

SIR साठी राजकीय पक्षांनीही स्थानिक भागांत मतदान केंद्रस्तरीय सहायकांची नेमणूक करा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : भारत निवडणूक आयोग यांच्या निर्देशांनुसार, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात मतदार

BMC अतिरिक्त आयुक्तांनी दिली ॲक्वर्थ रुग्णालयाला अचानक भेट

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : ॲक्वर्थ महानगरपालिका कुष्ठरोग रुग्णालय येथे दीर्घकाळ उपचार घेणाऱ्या वयोवृद्ध

Atul Save : भटके-विमुक्त समाजाच्या समस्या निवारणासाठी त्रिस्तरीय समित्या

मुंबई : राज्यातील भटके-विमुक्त समाजाच्या समस्या प्रभावीपणे सोडविणे, त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे