पुणे- जळगाव नवा जलदगती मार्ग; ३ तासांत प्रवास

पुणे ते छत्रपती संभाजीनगर शहरांना जोडणारा आत्याधुनिक महामार्ग


पुणे : पुणे ते छत्रपती संभाजीनगरला जोडण्यासाठी एक्स्प्रेस हायवे उभारण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. नितीन गडकरी यांनी याबाबत माहिती दिली आहे. हा नवीन एक्स्प्रेस हायवे आत्याधुनिक असणार आहे. हा महामार्ग पूर्ण झाल्यावर जळगाववरून पुण्याचा प्रवास सुसाट होणार आहे. फक्त २ तासांत पुणे ते छत्रपती संभाजीनगर हा प्रवास करता येणार आहे.


पुणे ते छत्रपती संभाजीनगर या दोन शहरांना जोडणारा हा आत्याधुनिक आणि चांगला महामार्ग असणार आहे. यामुळे दोन्ही शहरांमधील प्रवासाचा वेळ फार कमी होणार आहे. यामुळे पुणे ते जळगाव अंतरदेखील कमी होणार आहे. सध्या पुण्याहून छत्रपती संभाजीनगरला जाण्यासाठी सहा ते साडेसहा तास लागतात. दरम्यान, या नवीन महामार्गामुळे तुम्ही फक्त २ तासांत हा प्रवास करू शकतात. त्यामुळे प्रवासाचा कालावधी ३-४ तासांनी कमी होणार आहे, असा दावा नितीन गडकरी यांनी केला.
याचसोबत मुंबई-नागपूर या महामार्गाला जळगाव जोडण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत झाला. सध्या जळगावरून अजिंठा, सिल्लोडमार्गे छत्रपती संभाजीनगरला जावे लागते. त्यासाठी अडीच तास लागतात. दरम्यान, हा रस्ता समृद्धी महामार्गाला जोडला जाणार आहे.


त्यापूर्वी जळगाव ते छत्रपती संभाजीनगर असा एक्स्प्रेस हायवे बांधण्यात येणार आहे. यामुळे हा कालावधी फक्त १ तासावर येणार आहे. जळगाव-छत्रपती संभाजी नगर असा १ तास प्रवास आणि तिथून पुढे छत्रपती संभाजीनगर ते पुणे असे दोन तास गृहीत धरले तर तुमचा प्रवास फक्त तीन तासांचा होणार आहे. जळगाववरुन पुण्याला फक्त ३ तासात पोहोचता येणार आहे.


पुणे ते छत्रपती संभाजीनगर या महामार्गासाठी १६ कोटी ३१८ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. हा महामार्ग आत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील औद्योगिक, व्यापारी आणि सामाजिक विकासाला चालना मिळणार आहे.

Comments
Add Comment

मुंबईतील जन्म, मृत्यू प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेचे ऑडिट, भाजपाने का केली मागणी?

मुंबई: मुंबईत बोगस जन्म प्रमाणपत्रे दिली जात असल्याचे प्रकार निदर्शनास आल्याने जन्म नोंदणी व जन्म प्रमाणपत्र

कडक शिस्तीच्या महापौर बाई, जेव्हा सभागृहात किशोरी पेडणेकर यांना चिडीचूप करतात तेव्हा...

मुंबई: मुंबई महापालिकेत उबाठाला आता २५ वर्षांनंतर विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आली आहे. मात्र, या विरोधी बाकांवर

इराणप्रश्नी भारताने ठाम भूमिका घ्यायला हवी होती; राज ठाकरेंचे वक्तव्य

मुंबई: "इराणने दीर्घकाळ भारताला साथ दिली. आता त्या देशावर हल्ले होत असताना भारतानेही ठामपणे पाठिंबा द्यायला हवा

महाराष्ट्रात गेमिंग, क्रिएटर इकॉनॉमी आणि पायाभूत सुविधा उभारण्यावर भर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कंटेंट क्रिएटर्ससोबत संवाद

मुंबई: महाराष्ट्रात गेमिंग, क्रिएटर इकॉनॉमी, शिक्षण आणि डिजिटल पायाभूत सुविधा उभारण्यासाठी शासन सक्षम वातावरण

ठाणे पूर्व येथील श्री जय अंबे माता नवरात्रोत्सव मंडळाच्या देवीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न; उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली सहकुटुंब देवीची पूजा

ठाणे: चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे

फिलिपाईन्समधील भारतीय समाजाचे सेवा आणि व्यावसायिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान; मनिला येथे मंत्री जयकुमार रावल यांचा मराठी बांधवांशी संवाद

मुंबई: मराठी समाज जगभर पसरलेला असला तरी मातृभूमीशी त्यांचे नाते अतूट आहे. फिलिपाईन्समधील भारतीय समाज संख्येने