पुणे- जळगाव नवा जलदगती मार्ग; ३ तासांत प्रवास

पुणे ते छत्रपती संभाजीनगर शहरांना जोडणारा आत्याधुनिक महामार्ग


पुणे : पुणे ते छत्रपती संभाजीनगरला जोडण्यासाठी एक्स्प्रेस हायवे उभारण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. नितीन गडकरी यांनी याबाबत माहिती दिली आहे. हा नवीन एक्स्प्रेस हायवे आत्याधुनिक असणार आहे. हा महामार्ग पूर्ण झाल्यावर जळगाववरून पुण्याचा प्रवास सुसाट होणार आहे. फक्त २ तासांत पुणे ते छत्रपती संभाजीनगर हा प्रवास करता येणार आहे.


पुणे ते छत्रपती संभाजीनगर या दोन शहरांना जोडणारा हा आत्याधुनिक आणि चांगला महामार्ग असणार आहे. यामुळे दोन्ही शहरांमधील प्रवासाचा वेळ फार कमी होणार आहे. यामुळे पुणे ते जळगाव अंतरदेखील कमी होणार आहे. सध्या पुण्याहून छत्रपती संभाजीनगरला जाण्यासाठी सहा ते साडेसहा तास लागतात. दरम्यान, या नवीन महामार्गामुळे तुम्ही फक्त २ तासांत हा प्रवास करू शकतात. त्यामुळे प्रवासाचा कालावधी ३-४ तासांनी कमी होणार आहे, असा दावा नितीन गडकरी यांनी केला.
याचसोबत मुंबई-नागपूर या महामार्गाला जळगाव जोडण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत झाला. सध्या जळगावरून अजिंठा, सिल्लोडमार्गे छत्रपती संभाजीनगरला जावे लागते. त्यासाठी अडीच तास लागतात. दरम्यान, हा रस्ता समृद्धी महामार्गाला जोडला जाणार आहे.


त्यापूर्वी जळगाव ते छत्रपती संभाजीनगर असा एक्स्प्रेस हायवे बांधण्यात येणार आहे. यामुळे हा कालावधी फक्त १ तासावर येणार आहे. जळगाव-छत्रपती संभाजी नगर असा १ तास प्रवास आणि तिथून पुढे छत्रपती संभाजीनगर ते पुणे असे दोन तास गृहीत धरले तर तुमचा प्रवास फक्त तीन तासांचा होणार आहे. जळगाववरुन पुण्याला फक्त ३ तासात पोहोचता येणार आहे.


पुणे ते छत्रपती संभाजीनगर या महामार्गासाठी १६ कोटी ३१८ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. हा महामार्ग आत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील औद्योगिक, व्यापारी आणि सामाजिक विकासाला चालना मिळणार आहे.

Comments
Add Comment

फ्लाइट टिकट रद्द करण्यावर आता शुल्क लागणार नाही; डीजीसीएने केला रिफंड नियमांमध्ये मोठा बदल

नवी दिल्ली :  विमान प्रवाशांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. आता विमान प्रवाशांना प्रवासी बुकिंगच्या ४८ तासांच्या

महावितरणचा 'आयपीओ' येणार - उत्पन्न वाढीसाठी मुख्यमंत्र्यांनी केली सूचना; 'कॉर्पोरेट गव्हर्नन्स' चा अंमल करणार

मुंबई : ऊर्जा क्षेत्रात कार्यरत असलेल्या बाजारपेठेचा लाभ उठवित महावितरणने आयपीओ (इनिशियल पब्लिक ऑफरिंग) आणत

राज्यात लवकरच ‘धर्मांतरबंदी कायदा’ - गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचे संकेत; मदरशांची होणार सखोल पडताळणी

मुंबई : प्रलोभने दाखवून किंवा बळजबरीने केल्या जाणाऱ्या धर्मांतराच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी राज्य सरकार

राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची अशी झाली निवड

मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी राष्ट्रवादी

शुभमंगल सावधान! अखेर दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा आणि रश्मीका मंदाना यांचा विवाहसोहळा संपन्न झाला

मुंबई : मनोरंजन क्षेत्रातील सर्वांची आवडती जोडी आणि चाहते ज्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत होते असे

सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष, आवाजी मतदानाने निवड

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची मुंबईत वरळीच्या डोममधील हॉलमध्ये बैठक झाली. या