पंजाबमध्ये निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर गोळीबार, आप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री


पंजाबमधील ब्लॉक कमिटी निवडणुकीत 'आप'ला मोठे यश मिळाले. पण या विजयाच्या आनंदाला हिंसेचे गालबोट लागले. आम आदमी पार्टी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये हिंसक संघर्ष झाला. पंजाबमध्ये मिरवणुकीदरम्यान झालेल्या वादातून हिंसाचार आणि गोळीबार झाला. गोळीबारात तीन जण गंभीर जखमी झाले. ही घटना लुधियानातील गिल परिसरातील बचितर नगरमध्ये घडली. पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत आणि तपास करत आहेत. दोन्ही पक्षांनी हिंसेसाठी एकमेकांवर आरोप केले आहेत.


गोळीबारात जखमी झालेल्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. जखमी कार्यकर्त्यांची नावं आम आदमी पार्टीने जाहीर केली आहे. काँग्रेसकडून झालेल्या गोळीबारात गुरुमुख सिंग (६५), रविंदर सिंग (४४) आणि मनदीप सिंग (३६) जखमी झाल्याचे आम आदमी पार्टीने सांगितले.


पंजाबमध्ये झालेल्या पंचायत निवडणुकीत आम आदमी पार्टीने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या दणदणीत विजयानंतर आम आदमी पार्टीने ठिकठिकाणी मिरवणुका काढल्या. अशीच एक विजयी मिरवणूक लुधियानातील गिल परिसरातील बचितर नगरमधून जात होती. या मिरवणुकीवर स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांनी गोळीबार केला असा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.


Comments
Add Comment

VIRAL VIDEO : सावधान! देवभूमीचा ट्रिप प्लॅन करताय? हा थरारक व्हिडिओ पाहून तुमचेही पाय लटपटतील!

देहराडून : उत्तराखंडमधील प्रसिद्ध सिद्धपीठ माता धारी देवी मंदिराजवळ नदीपात्रात दोन बोटींची समोरासमोर भीषण धडक

India AI Impact Summit 2026 : एआय समिटमध्ये महाराष्ट्राचा डंका! कृषी विकासासाठी 'महाॲग्री एआय' ठरणार गेमचेंजर - मुख्यमंत्री फडणवीस

नवी दिल्ली : कृषी क्षेत्रात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या सहाय्याने अन्न सुरक्षितता, वातावरणातील बदलाला सामोरे

Nitesh Rane : नवी दिल्लीतील ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट’मध्ये मंत्री नितेश राणे यांचा सहभाग

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील 'डिजिटल इंडिया'ला आता कृत्रिम बुद्धिमत्तेची (एआय) जोड देऊन

AI Authenticity Label : एआय-निर्मित डिजिटल कंटेंटसाठी ‘ऑथेंटिसिटी लेबल’ आजपासून अनिवार्य

केंद्र सरकारने एआयच्या मदतीने तयार होणाऱ्या डिजिटल कंटेंटबाबत कडक मार्गदर्शक तत्त्वे लागू केली आहेत. १०

Patna High Court: बिहार विधानसभा अध्यक्षांसह ४२ आमदारांना हायकोर्टाची नोटीस

- निवडणूक प्रतिज्ञापत्रांमध्ये खोटी माहिती दिल्याचा आरोप बिहारच्या राजकारणात एक मोठी कायदेशीर घडामोड समोर आली

चोरीला गेलेले फोन मिळणार परत, दिल्ली पोलिसांचे मिशन रीकनेक्ट ३.० नेमकं आहे तरी काय?

दिल्ली: दिल्लीमध्ये मोबाईल फोन चोरीच्या वाढत्या घटनांमध्ये, दिल्ली पोलिसांच्या ट्रान्सपोर्ट रेंजने मिशन